शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

उधारीमुळे शेतकऱ्यांवर बाजारपेठेत तोंड लपविण्याची वेळ

By admin | Updated: January 31, 2015 01:55 IST

कपाशी, सोयाबीन व तूर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या पिकांना यंदा निसर्गाचा व अल्प हमीदरांचा फटका बसला.

सेलू : कपाशी, सोयाबीन व तूर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या पिकांना यंदा निसर्गाचा व अल्प हमीदरांचा फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले़ बाजारातील शेतकऱ्यांची पत धोक्यात आली. कृषी केंद्र, किराणा, कापड व इतर वस्तू वर्षभर उधारीवर घेण्याची सवय असलेला शेतकरी आता त्याचे खाते चुकता करू शकत नाही. यामुळे बाजारात येऊन नाईलाजाने तोंड लपविण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे़ सततच्या नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. घरात खाणारे तोंड वाढत आहे. घर खर्चही वाढतच आहे. महागाई शिखरावर पोहोचत आहे; पण शेतकऱ्यांना सतत नापिकी व भावबाजीचा फटका सहन करावा लागत आहे. कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचा उतारा नाममात्र असून यंदा भावही पडले आहेत़ बाजारातील उधारी वाढली आहे. दुकानदार उधारी वसुलीचा तगादा लावत आहेत़ बाजारपेठेत आल्यानंतर शेतकरी खिसा रिकामा असल्याने उधारी फेडू शकत नाही. यामुळे शेतकऱ्यावर दुकानदाराजवळून जाताना तोंड लपवून जाण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. अनेक गावांतील सधन शेतकरीही मेटाकुटीस आले आहेत़ इच्छा असतानाही उधारी फेडता येत नसल्याचे दु:ख शेतकऱ्यांना सलत आहे़ बाजारात त्याची असलेली पत जात असल्याचे काही शेतकऱ्यांनी बोलून दाखविले. यामुळे शेतकरी वैफलग्रस्त होण्याचे प्रयाण वाढत असल्याचे दिसते़(तालुका प्रतिनिधी)