शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

सावकारीला शिल्लकच्या पीककर्जाची ‘झालर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

सध्या खरीप हंगामाची धामधूम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीची झालर मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांना बँकांचे पीककर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. कर्जमाफी अटी, शर्थी व निकषांच्या फेऱ्यात अनेकांची पीककर्ज रखडल्याने बँकांनी त्या खऱ्या गरजू लाभार्थ्यांना बँकांची दारे बंद केली आहे.

ठळक मुद्देखरे शेतकरी वंचितच। पीककर्जातून ‘धनदांडग्यां’ची वरकमाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आधीच वेल सेटल्ड...नामधारी नावाला शेती...पण, आयकर वाचविण्यासाठी कोट्यवधींनी सर्वात पुढे हजेरी लावून पीककर्ज काढत अडचणीतील शेतकऱ्यांच्या मदतीला धावत भरमसाठ व्याजातून पैसे वाटण्याची नामी संधी शोधली आहे. त्यामुळे खरा गरजू शेतकरी पीककर्जासाठी जातो, पण, त्याला वेळेवर कर्जमाफी मिळत नसल्याने तो याच हक्काच्या पीककर्जापासून वंचित ठरत आला आहे.सध्या खरीप हंगामाची धामधूम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीची झालर मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांना बँकांचे पीककर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. कर्जमाफी अटी, शर्थी व निकषांच्या फेऱ्यात अनेकांची पीककर्ज रखडल्याने बँकांनी त्या खऱ्या गरजू लाभार्थ्यांना बँकांची दारे बंद केली आहे. तर दुसरीकडे ज्यांना पीककर्जाची किंवा कोणत्याही माफीची गरज नसलेल्या धनदांडग्या व्यक्तींना ज्यांच्या नावे शेती आहे व ते शेती न पाहता ठेक्या बटाईने किंवा नफ्याची शेती शेतमजुराला वाहण्यास देतात अशांची फार मोठी गर्दी सध्या बँकांत वाढली असून कमी व्याजदर असल्याने पीककर्ज घेऊन हेच महाभाग कर्जबाजारी शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा दराने व्याजाने पैसे वाटप करून आपली वरकमाई करत आहेत. तसेही अशा ‘धनदांडग्या’ शेतकऱ्यांजवळ मोठ्या प्रमाणात पैसा असल्याने व्याजाच्या धंद्याला शिल्लकच्य पीककर्जाची झालर मिळत असल्याने अतिरिक्त नफा मिळविण्याच्या दृष्टीने पीककर्जाच्या नावाखाली बँकांतून शेतकरी असल्याचे दाखवून अडचणीतील शेतकऱ्यांच्याच कर्जाच्या बोझ्यात बंदिस्त करीत आहेत.सातबाराचे शेतकरी असल्याने बँकांचेही चालेनाव्यापारी, राजकारणी, नोकरदार यांनी मागील काही वर्षांपासून शेतीत आर्थिक गुंतवणूक करून सातबाऱ्याची शेती वाहणे सुरू केले आहे. त्यामुळे आयकर तर वाचतोच त्याही पलीकडे हीच शेती एखाद्या शेतमजुराला ठेक्याने बटाईने किंवा नफ्याचे देऊन त्यातूनही दोन पैसे कमण्यिासोबतच वर्षात दाम दुपटीने शेती विकल्या जाणार या हेतूने ही गुंतवणूक केलेली असते. सध्या खरीप हंगाम सुरू सर्व शेतकऱ्यांना कर्जबाजारी, नसलेल्यांना सक्तीने पीककर्ज वाटपाच्या शासनाच्या सूचना असल्याने हे सातबाऱ्याचे शेतकरी (सर्वच नाही) कमी व्याज असलेले पीककर्ज काढून गरजू शेतकºयांना अव्वाच्या सव्वा व्याजदराने पैसे वाटून आपल्या कमाईला धारदार बनवत आहेत.आर्थिक बाजू तपासूनच पीककर्ज हवेखरंच ज्या शेतकऱ्याची हंगामी पिकाची पेरणी करण्यास आर्थिक अडचण भासत आहे. अशाच गरजू शेतकºयांना शासनाने बीनव्याजी पीककर्ज देणे गरजेचे आहे. यासाठी वाटल्यास तसा शासनाने सर्व्हे करावा किंवा आधार लिंक असल्याने बँक बॅलन्स किंवा प्रॉपर्टी तपासून हे कर्ज द्यावे, वाटल्यास इतर शेतकऱ्यांना त्यांच्या मर्यादा ठरवून हवे तसे त्या त्या टक्केवारीनुसार कर्ज वाटप करण्याची गरज आहे.

टॅग्स :agricultureशेती