शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सावकारीला शिल्लकच्या पीककर्जाची ‘झालर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

सध्या खरीप हंगामाची धामधूम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीची झालर मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांना बँकांचे पीककर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. कर्जमाफी अटी, शर्थी व निकषांच्या फेऱ्यात अनेकांची पीककर्ज रखडल्याने बँकांनी त्या खऱ्या गरजू लाभार्थ्यांना बँकांची दारे बंद केली आहे.

ठळक मुद्देखरे शेतकरी वंचितच। पीककर्जातून ‘धनदांडग्यां’ची वरकमाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आधीच वेल सेटल्ड...नामधारी नावाला शेती...पण, आयकर वाचविण्यासाठी कोट्यवधींनी सर्वात पुढे हजेरी लावून पीककर्ज काढत अडचणीतील शेतकऱ्यांच्या मदतीला धावत भरमसाठ व्याजातून पैसे वाटण्याची नामी संधी शोधली आहे. त्यामुळे खरा गरजू शेतकरी पीककर्जासाठी जातो, पण, त्याला वेळेवर कर्जमाफी मिळत नसल्याने तो याच हक्काच्या पीककर्जापासून वंचित ठरत आला आहे.सध्या खरीप हंगामाची धामधूम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीची झालर मिळू शकली नाही. त्यामुळे त्यांना बँकांचे पीककर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. कर्जमाफी अटी, शर्थी व निकषांच्या फेऱ्यात अनेकांची पीककर्ज रखडल्याने बँकांनी त्या खऱ्या गरजू लाभार्थ्यांना बँकांची दारे बंद केली आहे. तर दुसरीकडे ज्यांना पीककर्जाची किंवा कोणत्याही माफीची गरज नसलेल्या धनदांडग्या व्यक्तींना ज्यांच्या नावे शेती आहे व ते शेती न पाहता ठेक्या बटाईने किंवा नफ्याची शेती शेतमजुराला वाहण्यास देतात अशांची फार मोठी गर्दी सध्या बँकांत वाढली असून कमी व्याजदर असल्याने पीककर्ज घेऊन हेच महाभाग कर्जबाजारी शेतकऱ्यांना अव्वाच्या सव्वा दराने व्याजाने पैसे वाटप करून आपली वरकमाई करत आहेत. तसेही अशा ‘धनदांडग्या’ शेतकऱ्यांजवळ मोठ्या प्रमाणात पैसा असल्याने व्याजाच्या धंद्याला शिल्लकच्य पीककर्जाची झालर मिळत असल्याने अतिरिक्त नफा मिळविण्याच्या दृष्टीने पीककर्जाच्या नावाखाली बँकांतून शेतकरी असल्याचे दाखवून अडचणीतील शेतकऱ्यांच्याच कर्जाच्या बोझ्यात बंदिस्त करीत आहेत.सातबाराचे शेतकरी असल्याने बँकांचेही चालेनाव्यापारी, राजकारणी, नोकरदार यांनी मागील काही वर्षांपासून शेतीत आर्थिक गुंतवणूक करून सातबाऱ्याची शेती वाहणे सुरू केले आहे. त्यामुळे आयकर तर वाचतोच त्याही पलीकडे हीच शेती एखाद्या शेतमजुराला ठेक्याने बटाईने किंवा नफ्याचे देऊन त्यातूनही दोन पैसे कमण्यिासोबतच वर्षात दाम दुपटीने शेती विकल्या जाणार या हेतूने ही गुंतवणूक केलेली असते. सध्या खरीप हंगाम सुरू सर्व शेतकऱ्यांना कर्जबाजारी, नसलेल्यांना सक्तीने पीककर्ज वाटपाच्या शासनाच्या सूचना असल्याने हे सातबाऱ्याचे शेतकरी (सर्वच नाही) कमी व्याज असलेले पीककर्ज काढून गरजू शेतकºयांना अव्वाच्या सव्वा व्याजदराने पैसे वाटून आपल्या कमाईला धारदार बनवत आहेत.आर्थिक बाजू तपासूनच पीककर्ज हवेखरंच ज्या शेतकऱ्याची हंगामी पिकाची पेरणी करण्यास आर्थिक अडचण भासत आहे. अशाच गरजू शेतकºयांना शासनाने बीनव्याजी पीककर्ज देणे गरजेचे आहे. यासाठी वाटल्यास तसा शासनाने सर्व्हे करावा किंवा आधार लिंक असल्याने बँक बॅलन्स किंवा प्रॉपर्टी तपासून हे कर्ज द्यावे, वाटल्यास इतर शेतकऱ्यांना त्यांच्या मर्यादा ठरवून हवे तसे त्या त्या टक्केवारीनुसार कर्ज वाटप करण्याची गरज आहे.

टॅग्स :agricultureशेती