शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

ऐन उन्हाळ्यात लिंबू खातोय भाव; आर्वी बाजारात १ किलो लिंबाची किंमत ३०० रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 17:14 IST

सध्या आर्वीच्या बाजारात लिंबाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देसामान्यांचा घसा पडला कोरडा

आर्वी (वर्धा) : उन्हाळा म्हटलं कीं, सर्वत्र थंडपेयाची दुकाने लागतात. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी शीतपेय व इतरांकडून सध्या मोठ्या प्रमाणावर लिंबांची मागणी वाढल्याने आर्वी बाजारात लिंबाचा भाव प्रतिकिलो ३०० रुपयांवर पोहोचला असून किरकोळ भाजीविक्रेते १० रुपयांचे एक लिंबू या भावाने विक्री करीत आहे.

उन्हाळ्यात सर्वत्र थंड शीतपेयाच्या दुकानांत लिंबांची मागणी वाढल्याने व यातच लग्नसराई सुरू झाल्याने लिंबाचे भाव वधारले आहेत. उन्हाळ्यात लिंबांच्या झाडाला बहर येऊन त्याला लिंबू लागण्याचा हंगाम असतो. पण, यावर्षी अतिउष्ण तापमानामुळे लिंबांच्या झाडाला यावर्षी बहरच आला नसल्याने आर्वी बाजारपेठेत लिंबाला मोठी मागणी आहे.

सध्या आर्वीत अमरावती, नागपूर व आर्वी तालुक्यातील काही गावांत लिंबू उत्पादक शेतकरी आहेत. परंतु, यावर्षी त्यांनाही फटका बसला आहे. निसर्गाचा लहरीपणा व वाढते तापमान लिंबासाठी हानिकारक ठरत असल्याचे अनुभवी शेतकरी सांगतात. 

प्रवासादरम्यान सामान्य नागरिक लिंबाची मागणी करतात. परंतु, त्यांनाही लिंबू बाजारात सहज उपलब्ध होत नाही. या वाढलेल्या लिंबाच्या भावाचा नेटकऱ्यांकडून चांगलाच समाचार घेतला जात आहे. सध्या आर्वीच्या बाजारात लिंबाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्याचे चित्र आहे.

सध्या आर्वीच्या बाजारात मोठ्या प्रमाणात लिंबाचा तुटवडा असून बाहेरगावाहून लिंबू विक्रीसाठी येत आहे. लिंबाचे भाव अचानक वाढल्याने चिल्लर भाजीविक्रेते लिंबू विकण्यासाठी घेत नाहीत.

राजेश पोकळे, भाजी विक्रेता

टॅग्स :agricultureशेतीarvi-acआर्वी