शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

तलाठ्याला मुख्यालयी राहण्याची अ‍ॅलर्जी\

By admin | Updated: January 18, 2015 23:16 IST

शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती शासनाने केली आहे. अध्यादेश काढून नियमावलीची अंमलबजावणी व्हावी म्हणून आदेश दिले असले तरी या आदेशाला कर्मचाऱ्यांकडून केराची

वर्धा : शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती शासनाने केली आहे. अध्यादेश काढून नियमावलीची अंमलबजावणी व्हावी म्हणून आदेश दिले असले तरी या आदेशाला कर्मचाऱ्यांकडून केराची टोपली दाखविण्याचा प्रकार अनेकदा घडतो. या सर्वांत नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याचा प्रत्यय कवठा (रेल्वे) येथील नागरिकांना येत आहे. त्रस्त झालेल्या नागरिकांनी तलाठ्याची बदली करण्याची मागणी केली आहे. कवठा (रेल्वे) येथील तलाठी राऊत हे मुख्यालयी राहत नाही. अनेकदिवस कार्यालयात राहत नसल्याने कागदपत्रांसाठी अनेक दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. ग्रामस्थ कार्यालयात प्रमाणपत्रे घेण्यासाठी जातात, मात्र तलाठी राहत नसल्याने आल्यापावली परतावे लागते. शेतीचा सातबारा काढण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार कार्यालयात येरझारा माराव्या लागतात. ग्रामस्थांनी यापूर्वी येथील तलाठ्यांबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली होती. मात्र तलाठी कार्यालयात गैरहजरच असतात. ग्रामस्थांसोबत अरेरावी करून धमकावणी केली जाते. शेतकरी, विद्यार्थी यांना कार्यालयातून आल्यापावली परतावे लागत असल्याने कार्यवाहीची मागणी होत आहे. महत्वाच्या प्रमाणपत्रांसह विविध शासकीय योजनेच्या लाभापासून गावकरी वंचित आहेत. तलाठी गावात येत नसल्याने योजनेची माहिती ग्रामस्थांना होत नाही. दुष्काळ मदत निधी आल्यास तो देखील कधी वेळेवर मिळत नाही. या सततच्या प्रकाराने ग्रामपंचायत प्रशासनाने ठराव घेऊन तलाठ्याची बदली करावी अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)