शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात पक्षाच्या मेळाव्याकडे आमदारासह नेत्यांनी फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 14:29 IST

भाजपच्या सिंदी शहर समितीतर्फे १० मार्चला आयोजित शक्ती केंद्र, बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात काही जणांचा अपवाद वगळता बहुतेकांनी दांडी मारली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: भाजपच्या सिंदी शहर समितीतर्फे १० मार्चला आयोजित शक्ती केंद्र, बुथप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात काही जणांचा अपवाद वगळता बहुतेकांनी दांडी मारली. स्वत:च्याच पक्षाच्या आयोजनाला दिलेली बगल पाहता भाजपमध्ये सर्व काही आलबेल नाही, हे स्पष्ट झाले आहे.मेळाव्याला आपसांतील गटबाजीमुळे अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आमदार समीर कुणावार, जिल्हा विस्तारक जयंत उर्फ गुंडू कावळे, अर्चना वानखेडे, भाजपचे स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी यांनी मेळाव्यात येण्याचे टाळले. या घटनाक्रमाने भाजपमधील गटबाजीच्या चर्चेला उधाण आले आहे.या मेळाव्यात शहरातील दोन शक्ती प्रमुखापैकी सुनील शेंडे हे एकच शक्तीप्रमुख उपस्थित होते. नगरसेवक प्रकाश मेंढे, प्रकाश सिरसे, नरेंद्र सेलूकर, नगरसेवक अमोल बोंगाडे, इम्रान पठाण, अमोल गवळी, पंकज पराते, प्रभाकर तुमाणे, अनिल साखळे हे शहरातील १० बूथप्रमुख आहेत. ते प्रामुख्याने गैरहजर होते. भाजपचे शहर अध्यक्ष सुधाकर घवघवे वगळता सरचिटणीस सुनील वाणकर, प्रशांत बोरीकर, संघटक जयंत बडवाईक, कोषाध्यक्ष संजय इटनकर, ओमप्रकाश राठी, मधुकर गुल्हाने, प्रवीण सिर्सिकर यांनी अनुपस्थित राहून रोष व्यक्त केला.भाजपच्या गटनेत्या तथा नगरसेविका अजया साखळे, बांधकाम सभापती बबिता तुमाणे, वंदना सेलूकर, पुष्पा सिरसे, चंदा बोरकर, अमोल बोंगाडे, प्रकाश मेंढे या भाजपच्या नगरसेवकांनीही मेळाव्याकडे पाठ फिरविली. या मेळाव्यात १६ कार्यकर्ते, नगराध्यक्ष संगीता शेंडे, उपाध्यक्षा वंदना डकरे, भाजपचे विस्तारक पवन परियाल, शहर अध्यक्ष सुधाकर घवघवे यांचीच उपस्थिती होती.हॉलमध्ये प्रमुख पाहुण्यांकरिता लावलेला स्टेज संख्येअभावी खाली घेण्याची नामुष्की भाजपवर ओढवली. या सर्व घटनेची माहिती आमदार समीर कुणावार यांना मिळाल्याने मेळाव्याचे प्रमुख असूनही ते इकडे फिरकले नाही.भाजपची नगरपालिकेत सत्ता आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि आठ नगरसेवक, शहरातील पतसंस्था, सोसायट्यांमध्ये पक्षाचे अनेक संचालक आहेत. पक्षाच्या विविध शाखांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची लांबच लांब फळी असतानाही मेळावा अपयशी ठरला. सध्या सभोवतालच्या २५ पेक्षा अधिक गावांत ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे, तर लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. अशा स्थितीत भाजपातील दुफळी चर्चेचा विषय ठरत आहे.

टॅग्स :BJPभाजपा