शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
3
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
4
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
5
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
6
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
7
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
8
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
9
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
10
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
11
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
12
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
13
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
14
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
15
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
16
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
17
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
18
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
19
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
20
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान

महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By admin | Updated: January 2, 2016 08:35 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, पत्र लिहून आत्महत्या करणाऱ्या विदर्भाच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, डिमांड

वर्धा : शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, पत्र लिहून आत्महत्या करणाऱ्या विदर्भाच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, डिमांड भरूनही कृषिपंपाना वीज जोडणी नाही असे अनेक आरोप करीत महात्मा फुले समता परिषदेच्यातीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे दिले. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांची माहिती देणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या सुपूर्द केले. निवेदनानुसार, जिल्ह्यात ५० पैसेपेक्षा कमी नजरअंदाज सुधारित पैसेवारी असल्यामुळे हा जिल्हा दुष्काळी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस पिकाच्या नुकसानी पोटी एकरी १० हजार रुपयांची मदत मिळावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींना शाळा कॉलेजची फी व एसटीची पास माफ करावी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकाला अनुकंपा तत्वाचे निकष लावून सरकारी नोकरी द्यावी, ओबीसी विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अशा दुष्काळी स्थितीतीत तत्काळ देण्यात यावी, अशा मागण्या या धरणे आंदोलन दरम्यान करण्यात आल्या. धरणे आंदोलनाचे शेवटी जिल्हाधिकारी यांना मुख्यामंत्र्यांना देण्यासाठी निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनात महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, विजय मुळे, निळकंठ राऊत, सुधीर पांगुळ, अंबादास चौधरी, केशव तितरे, सुरेश सातोकर, अभय पुसदेकर, संजय म्हस्के, संजय भगत उपस्थित होते.(प्रतिनिधी) शासनकर्त्यांवर आरोप ४कापसाच्या भावाबद्दन विरोधी पक्ष म्हणून आंदोलन करणारे आज सत्तेत असताना त्यांच्याकडूनही शेतमालाला दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबद आकडेमोड करणारे देवेंद्र फडणवीस आता संपूर्ण कर्जमाफीबाबत नकार देत असल्याचा आरोप करीत त्यांचा येथे निषेध नोंदविण्यात आला. वर्धा जिल्ह्यात पाच हजार शेतकऱ्यांनी चार वर्षांपूर्वी डिमांड भरून कृषी पंपाकरिता वीज जोडणी मागितली. ती अद्यापही मिळाली नाही.