शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
3
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
4
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
5
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
6
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
7
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
9
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
10
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
11
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
12
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
13
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
14
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
15
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
16
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
17
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
19
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
20
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला

महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

By admin | Updated: January 2, 2016 08:35 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, पत्र लिहून आत्महत्या करणाऱ्या विदर्भाच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, डिमांड

वर्धा : शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, पत्र लिहून आत्महत्या करणाऱ्या विदर्भाच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, डिमांड भरूनही कृषिपंपाना वीज जोडणी नाही असे अनेक आरोप करीत महात्मा फुले समता परिषदेच्यातीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे दिले. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांची माहिती देणारे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या सुपूर्द केले. निवेदनानुसार, जिल्ह्यात ५० पैसेपेक्षा कमी नजरअंदाज सुधारित पैसेवारी असल्यामुळे हा जिल्हा दुष्काळी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन व कापूस पिकाच्या नुकसानी पोटी एकरी १० हजार रुपयांची मदत मिळावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींना शाळा कॉलेजची फी व एसटीची पास माफ करावी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकाला अनुकंपा तत्वाचे निकष लावून सरकारी नोकरी द्यावी, ओबीसी विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अशा दुष्काळी स्थितीतीत तत्काळ देण्यात यावी, अशा मागण्या या धरणे आंदोलन दरम्यान करण्यात आल्या. धरणे आंदोलनाचे शेवटी जिल्हाधिकारी यांना मुख्यामंत्र्यांना देण्यासाठी निवेदन देण्यात आले. या धरणे आंदोलनात महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक दिवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, विजय मुळे, निळकंठ राऊत, सुधीर पांगुळ, अंबादास चौधरी, केशव तितरे, सुरेश सातोकर, अभय पुसदेकर, संजय म्हस्के, संजय भगत उपस्थित होते.(प्रतिनिधी) शासनकर्त्यांवर आरोप ४कापसाच्या भावाबद्दन विरोधी पक्ष म्हणून आंदोलन करणारे आज सत्तेत असताना त्यांच्याकडूनही शेतमालाला दर मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबद आकडेमोड करणारे देवेंद्र फडणवीस आता संपूर्ण कर्जमाफीबाबत नकार देत असल्याचा आरोप करीत त्यांचा येथे निषेध नोंदविण्यात आला. वर्धा जिल्ह्यात पाच हजार शेतकऱ्यांनी चार वर्षांपूर्वी डिमांड भरून कृषी पंपाकरिता वीज जोडणी मागितली. ती अद्यापही मिळाली नाही.