शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी व्हावी

By admin | Updated: February 9, 2015 23:19 IST

दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासह जनसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे दिले.

वर्धा : दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासह जनसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष प्रभा घंगारे यांच्या नेतृत्वात निवेदन पाठविण्यात आले. जिल्ह्यात १९७२ पासून दारूबंदी कायदा अमलात आला. मात्र हा कायदा आज कागदोपत्रीच उरला आहे. एकदाचे प्यायला पाणी मिळणार नाही; मात्र दारू कुठेही आणि केव्हाही सहज उपलब्ध होते. जिल्ह्यासह शहरातील बहुतांश भागात राजरोसपणे दारूचे व्यवसाय सुरू आहेत. जिल्ह्याच्या सीमालगत असलेल्या वाइन शॉप, बारमधून मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने दारूसाठा येतो, हे सर्वश्रुत आहे. दारूबंदीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे. मात्र हा विभागही बघ्याची भूमिका घेऊन आहे. पोलीस विभागामार्फत दररोज कुठे ना कुठे धाडसत्र राबविले जाते, मात्र तीळमात्रही दारू हद्दपार झाली नाही. शहरातील बेरोजगार युवकांनी नोकऱ्याच मिळत नसल्याच्या कारणावरून दारूविक्री व्यवसाय थाटला आहे. अनेक रस्त्यांवर मद्यपी पडलेले असल्याचे चित्रही नित्याचे झाले आहे. दारूबंदीच्या कामात हातभार लावणाऱ्या महिलांवरच हल्ले होतात. त्यामुळे हे चित्र थांबविण्यासाठी कथोर कायदे करण्याची मागणी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. शिष्टमंडळात प्रभा घंगारे, संजय भगत, शबनम शेख, शारदा गजभिये, वंदना कातोरे, बेबी मन्ने यांच्यासह महिलांनी सहभाग नोंदविला.(शहर प्रतिनिधी)