शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी व्हावी

By admin | Updated: February 9, 2015 23:19 IST

दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासह जनसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे दिले.

वर्धा : दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासह जनसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा शाखेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष प्रभा घंगारे यांच्या नेतृत्वात निवेदन पाठविण्यात आले. जिल्ह्यात १९७२ पासून दारूबंदी कायदा अमलात आला. मात्र हा कायदा आज कागदोपत्रीच उरला आहे. एकदाचे प्यायला पाणी मिळणार नाही; मात्र दारू कुठेही आणि केव्हाही सहज उपलब्ध होते. जिल्ह्यासह शहरातील बहुतांश भागात राजरोसपणे दारूचे व्यवसाय सुरू आहेत. जिल्ह्याच्या सीमालगत असलेल्या वाइन शॉप, बारमधून मोठ्या प्रमाणात चोरट्या मार्गाने दारूसाठा येतो, हे सर्वश्रुत आहे. दारूबंदीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आहे. मात्र हा विभागही बघ्याची भूमिका घेऊन आहे. पोलीस विभागामार्फत दररोज कुठे ना कुठे धाडसत्र राबविले जाते, मात्र तीळमात्रही दारू हद्दपार झाली नाही. शहरातील बेरोजगार युवकांनी नोकऱ्याच मिळत नसल्याच्या कारणावरून दारूविक्री व्यवसाय थाटला आहे. अनेक रस्त्यांवर मद्यपी पडलेले असल्याचे चित्रही नित्याचे झाले आहे. दारूबंदीच्या कामात हातभार लावणाऱ्या महिलांवरच हल्ले होतात. त्यामुळे हे चित्र थांबविण्यासाठी कथोर कायदे करण्याची मागणी संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. शिष्टमंडळात प्रभा घंगारे, संजय भगत, शबनम शेख, शारदा गजभिये, वंदना कातोरे, बेबी मन्ने यांच्यासह महिलांनी सहभाग नोंदविला.(शहर प्रतिनिधी)