शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
2
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
3
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
4
सापांचा राजा...! किंग कोब्राच्या १८८ वर्षांच्या रहस्यावरून पडदा हटला; डीएनए घेतला अन्...
5
'माझ्याशी लग्न कर नाही तर तुरुंगात जा!', भर लग्नातून नववधूची पोलिसांकडे धाव; नवरदेवानं काय केलं ऐकाच... 
6
डाबर च्यवनप्राशची बदनामी; रामदेव बाबाच्या पंतजलीला कोर्टाचा दणका! काय दिले आदेश?
7
कोल्डड्रिंक पिऊन बेशुद्ध झाला, ५ दिवसांनी शुद्ध येताच मोठा धक्का बसला! तरुणासोबत काय झालं ऐकून होईल थरकाप
8
Gold Silver Price 3 July: सोन्याच्या दरात पुन्हा मोठी तेजी, चांदीही १००० रुपयांपेक्षा अधिक महागली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
१५ तास लागत होते, आता विठुरायाचे दर्शन ५ तासांत! लाखो भाविक पंढरपुरात, हा चमत्कार झाला कसा?
10
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना दिलासा, मुंबई पोलिसांची हायकोर्टात महत्त्वाची माहिती
11
ITR भरताना सावधान! यंदा नियम खूप कडक, 'या' चुका केल्यास थेट तुरुंगात जावं लागेल
12
५ अद्भूत योगात आषाढी एकादशी: ७ राशींना विठुराया पावेल, अपार कृपा; भरघोस भरभराट, शुभ-लाभ काळ!
13
'चला हवा येऊ द्या'च्या एका एपिसोडसाठी लाखोंमध्ये मानधन घ्यायचा निलेश साबळे, आकडा वाचून झोप उडेल
14
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
15
"बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी संस्थांमध्ये यापुढे केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश’’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा
16
Ashadhi Ekadashi 2025: वेद पुराणात न सापडणारा पांडुरंग पंढरपुरात आला कुठून? वाचा त्याचे कूळ आणि मूळ!
17
चीनला पाहावलं नाही! भारतातील आयफोनच्या उत्पादनाला झटका? परत बोलावले चिनी इंजिनिअर्स
18
अद्भूत आणि जादूई! रणबीर कपूर-यशच्या 'रामायण' सिनेमाची पहिली झलक, डोळ्यांचं पारणं फेडणारा टीझर
19
बदल्याची आग! डबल मर्डरने दिल्ली हादरली; घरातील नोकराने केली आई आणि मुलाची हत्या
20
Viral Video: कॉफी पिण्यासाठी एक्स्ट्रा कप न दिल्याने कर्मचाऱ्याला मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:01 IST

देशातील गरिबांना आजच्या महागाईच्या काळात चांगले उपचार घेणे सोयीस्कर व्हावे म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी योजना देशातील गरिबांना समर्पित केली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे देशातील आणि जिल्ह्यातील गरिबांना चांगल्या आरोग्य सेवा मिळून त्यांना निरोगी आयुष्य जगता येईल, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : १ लक्ष २९ हजार लाभार्थीना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील गरिबांना आजच्या महागाईच्या काळात चांगले उपचार घेणे सोयीस्कर व्हावे म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी योजना देशातील गरिबांना समर्पित केली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे देशातील आणि जिल्ह्यातील गरिबांना चांगल्या आरोग्य सेवा मिळून त्यांना निरोगी आयुष्य जगता येईल, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.विकास भवन येथे रविवारी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ खासदार तडस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषद आरोग्य सभापती जयश्री गफाट, नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, सेवाग्राम हेल्थ सोसायटी अध्यक्ष डॉ.बी.एस. गर्ग उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी बोलताना म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ झाल्यावर अनेक गरिबांनी वर्षानुवर्षे जखडलेल्या व्याधीवर उपचार करून घेतले आहेत. त्या योजनेचा जसा लाभ अनेक रूग्णांनी घेतला तसाच आयुष्यमान भारत योजना रूग्णांसाठी वरदान ठरेल. सामाजिक जाणीवेच्या भावनेतून ही योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आरोग्य सभापती जयश्री गफाट यांनी सर्व अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांना सदर योजना गावातील गरिबांना समजावून सांगण्याचे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना तडस म्हणाले, या योजनेचा जिल्ह्यातील १ लक्ष २९ हजार १०९ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. एका वर्षात एका कुटुंबाला ५ लक्ष रूपयांचा आरोग्य विमा या योजनेद्वारे मिळणार आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते निवडक लाभार्थ्यांना ई-कार्डाचे वाटप करण्यात आले. रांची येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या योजनेच्या कार्यक्रमाचे प्रसारण सभागृहात दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी तर आभार अजय डवले यांनी मानले.