शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 23:01 IST

देशातील गरिबांना आजच्या महागाईच्या काळात चांगले उपचार घेणे सोयीस्कर व्हावे म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी योजना देशातील गरिबांना समर्पित केली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे देशातील आणि जिल्ह्यातील गरिबांना चांगल्या आरोग्य सेवा मिळून त्यांना निरोगी आयुष्य जगता येईल, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.

ठळक मुद्देरामदास तडस : १ लक्ष २९ हजार लाभार्थीना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशातील गरिबांना आजच्या महागाईच्या काळात चांगले उपचार घेणे सोयीस्कर व्हावे म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी योजना देशातील गरिबांना समर्पित केली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे देशातील आणि जिल्ह्यातील गरिबांना चांगल्या आरोग्य सेवा मिळून त्यांना निरोगी आयुष्य जगता येईल, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.विकास भवन येथे रविवारी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ खासदार तडस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषद आरोग्य सभापती जयश्री गफाट, नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, सेवाग्राम हेल्थ सोसायटी अध्यक्ष डॉ.बी.एस. गर्ग उपस्थित होते.मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी बोलताना म्हणाले की, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ झाल्यावर अनेक गरिबांनी वर्षानुवर्षे जखडलेल्या व्याधीवर उपचार करून घेतले आहेत. त्या योजनेचा जसा लाभ अनेक रूग्णांनी घेतला तसाच आयुष्यमान भारत योजना रूग्णांसाठी वरदान ठरेल. सामाजिक जाणीवेच्या भावनेतून ही योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आरोग्य सभापती जयश्री गफाट यांनी सर्व अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांना सदर योजना गावातील गरिबांना समजावून सांगण्याचे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना तडस म्हणाले, या योजनेचा जिल्ह्यातील १ लक्ष २९ हजार १०९ लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे. एका वर्षात एका कुटुंबाला ५ लक्ष रूपयांचा आरोग्य विमा या योजनेद्वारे मिळणार आहे.यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते निवडक लाभार्थ्यांना ई-कार्डाचे वाटप करण्यात आले. रांची येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या योजनेच्या कार्यक्रमाचे प्रसारण सभागृहात दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांनी तर आभार अजय डवले यांनी मानले.