शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

‘धाम’मधून सोडणार अखेरचे उपयुक्त जल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 23:44 IST

महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून वर्धा नगर परिषद तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन संस्था वर्धा शहरातील व परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करतात. असे असले तरी सध्या याच धाम प्रकल्पात ३ दलघमी इतकाच नाममात्र उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्दे३ दलघमी पाणी : मृतसाठ्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून वर्धा नगर परिषद तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन संस्था वर्धा शहरातील व परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करतात. असे असले तरी सध्या याच धाम प्रकल्पात ३ दलघमी इतकाच नाममात्र उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. तो येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सोडण्यात येणाऱ्या पाण्याची या दोन्ही संस्थांनी वेळीच साठवणूक करणे तसेच नागरिकांकडूनही पाण्याचा काटकसरीनेच वापर होणे गरजेचे आहे.आर्थिक वर्ष २०१७-१८ व २०१८-१९ च्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने महाकाळी येथील धाम प्रकल्पाच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नाही. त्यातच मार्च महिन्यात भूगर्भातील पाणी पातळीत झपाट्याने घट झाल्याने अनेक विहिरी व बोअरवेल कोरड्या होण्यास सूरूवात झाली. परिणामी, पाण्याचा प्रश्न पेटत गेला. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन करण्यात आले. शिवाय सिंचनासाठी कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पातील पाणी सोडण्यात येणार नसल्याचे निश्चित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून धाम मधील पाणी जून अखेरपर्यंत महिन्यातून एकदाच सोडण्याचा निर्णयही घेण्यात आला. शिवाय त्यावर वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने प्रभावीपणे अंमलबजावणीही करण्यात आली. सध्या स्थितीत वर्धा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी फायद्याच्या ठरणाºया धाम प्रकल्पात केवळ ३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. हा उपयुक्त जलसाठा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सदर प्रकल्पातून सोडण्यात येणार आहे. सोडण्यात येणारे पाणी सुमारे १५ दिवस या दोन्ही संस्थांना पुरेल असा अंदाज आहे. तर जून च्या दुसºया आठवड्यापर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास धाम प्रकल्पातील मृत जलसाठ्याचा उपसा करण्याचे जिल्हा प्रशासनासह वर्धा पाटबंधारे विभागाच्या विचाराधीन आहे. धाम मधील मृत जलसाठ्याचा उपसा करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून तो मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेला नसल्याचे सांगण्यात येते. तर कुठला लोकप्रतिनिधी हा विषय तातडीने मार्गी काढण्यासाठी पुढाकार घेतो याकडे साºयांचे लक्ष लागले आहे.उद्योगांच्या मागणीला लावली ६० टक्क्यांनी कात्रीधाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल वर्धा न.प. व मजिप्रा प्रशासन, उत्तम गाल्वा कंपनी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वर्धा, मध्य रेल्वे प्रशासन व जामणी येथील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रिज अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि.मि. या संस्था करतात. नाममात्र पाणी जलाशयात असल्याने त्यांच्या मागणीपेक्षा ६० टक्के पाणी कमी दिले जात आहे.३४ हजार कुटुंबांची भागविली जाते पाण्याची गरजधाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची येळाकेळी व पवनार येथील धाम नदीपात्रातून उचल करून वर्धा नगरपरिषद प्रशासन त्यांच्या कार्यक्षेत्रातील तब्बल १६ हजार कुटुंबीयांना नळयोजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करते. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धा शहराशेजारील १३ गावांसह आंजी (मोठी) या गावातील १८ हजार कुटुंबाला धाम मधून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा करते. एकूणच धाम प्रकल्प सुमारे ३४ हजारांवर कुटुंबांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवते.जूनच्या पहिल्या आठवड्यात सोडणार पाणीधाम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठ्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यानुसार आता जूनच्या पहिल्या आठवड्यात पाणी सोडले जाईल.७ हजार ३२ घनमीटर काढला गाळभविष्यातील जलसंकटावर मात करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवत महाकाळी येथील धाम प्रकल्प गाळमुक्त करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे.१ मे रोजी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या हस्ते या कामाचा श्रीगणेशाही करण्यात आला आहे.सद्यस्थितीत धाम प्रकल्पातून ७ हजार ३२ घ.मी.च्यावर गाळ काढण्यात आल्याचे सांगण्यात येते.