शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

प्रचार अंतिम टप्प्यात, प्रलोभनांचा पाऊस सुरू

By admin | Updated: October 11, 2014 23:11 IST

प्रचाराचे युद्ध आता अंतिम टप्प्यात येवून पोहचले असून रॅलीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनावर उमेदवारांनी अधिक भर दिल्याचे दिसून येते. वर्धेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस, आर्वीत काँग्रेस, भाजप

रॅलीतून शक्तिप्रदर्शन : प्रमुख राजकीय पक्षांची प्रचारात सरशीराजेश भोजेकर - वर्धाप्रचाराचे युद्ध आता अंतिम टप्प्यात येवून पोहचले असून रॅलीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शनावर उमेदवारांनी अधिक भर दिल्याचे दिसून येते. वर्धेत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस, आर्वीत काँग्रेस, भाजप व एक अपक्ष, देवळीत काँग्रेस, भाजप तर हिंगणघाटात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि बसपाने आघाडी घेतली आहे. ही आघाडी मतदानाच्या दिवसापर्यंत कायम राहते वा हे चित्रही पालटते, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे. देवळीत काँग्रेस आणि भाजपात, हिंगणघाटात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस, आर्वीत काँग्रेस आणि भाजपात, तर वर्धेत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड चुरस बघायला मिळत आहे. ही लढत या राजकीय पक्षांमध्ये होईल, असे एकंदर चित्र आहे.पहिल्यांदाच या निवडणुकीत नामांकन दाखल करण्याच्या दिवसापर्यंत राजकीय पक्षांचे उमेदवार ठरले नव्हते. परिणामी भाजप, काँग्रेस, राकाँ आणि शिवसेना या चारही प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना प्रचाराला संधीच मिळाली नव्हती. हातात पक्षाचा ‘एबी’ फार्म मिळाल्यानंतर नामांकन दाखल करण्यासाठी धावपळ करावी लागली. प्रचार साहित्याची जुळवाजुळव करण्यातही बरेच दिवस निघून गेले. ज्यांना युती आणि आघाडी कायम राहील आणि आपल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. अशांनी प्रचार साहित्याची जुळवाजुळव करुन ठेवली होती. मात्र त्यांचेही अंदाज चुकले. त्यांना ऐनवेळी ‘आघाडी’ वा ‘युती’ हे शब्द प्रचार साहित्यातून वगळण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. अडचणीची बाब म्हणजे, प्रचार करण्यासाठी वाहनांकरिता परवानग्या घेण्यातही प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. उमेदवारांची अंतिम यादी झाल्यापासून खऱ्या अर्थाने प्रचाराच्या तोफा धडाडायला सुरुवात झाली. आता प्रचाराला गती आली आहे. ही आघाडी कोण कायम ठेवतो, याकडे लक्ष लागले आहे.