शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सहेलीतील रोपटी मोजताय अखेरची घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:14 IST

यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे जलशयांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नाही. अशातच सध्या विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत असून हरित महाराष्ट्र या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून लावण्यात आलेली रोपटी आता पाण्याअभावी अखेरची घटका मोजत असल्याचे नजीकच्या सहेली येथे दिसते.

ठळक मुद्देग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष : पाणीटंचाईच्या झळा

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे जलशयांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नाही. अशातच सध्या विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत असून हरित महाराष्ट्र या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून लावण्यात आलेली रोपटी आता पाण्याअभावी अखेरची घटका मोजत असल्याचे नजीकच्या सहेली येथे दिसते. त्यामुळे वृक्षलागवड उपक्रमाच्या उद्देशालाच बगल मिळत असून संबंधितांनी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सुरूवातीला शेतकऱ्यांना सहन करावा लागला. तर आता हिवाळ्याच्या दिवसातच जलसंकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नळयोजनेद्वारे ग्रामस्थांना सध्या तीन ते चार दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केल्या जात आहे. त्यातच सहेली येथे ग्रा.पं.च्यावतीने लावण्यात आलेली रोपटे पाण्याअभावी करपत असल्याचे बघावयास मिळते. मोठा निधी खर्च करून सदर रोपटे लावण्यात आली. मात्र, आता ती अखेरची घटका मोजत आहे. याबाबत ग्रामसेवक धुर्वे यांना विचारणा केली असता रोपट्यांना जगविण्यासाठी पाणीच नसल्याचे व पाण्या अभावी रोपटे करतप असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वृक्ष संवर्धनाच्या उद्देशालाच बगळ मिळत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग