शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सहेलीतील रोपटी मोजताय अखेरची घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 00:14 IST

यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे जलशयांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नाही. अशातच सध्या विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत असून हरित महाराष्ट्र या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून लावण्यात आलेली रोपटी आता पाण्याअभावी अखेरची घटका मोजत असल्याचे नजीकच्या सहेली येथे दिसते.

ठळक मुद्देग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष : पाणीटंचाईच्या झळा

लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे जलशयांमधील पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नाही. अशातच सध्या विहिरींच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत असून हरित महाराष्ट्र या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून लावण्यात आलेली रोपटी आता पाण्याअभावी अखेरची घटका मोजत असल्याचे नजीकच्या सहेली येथे दिसते. त्यामुळे वृक्षलागवड उपक्रमाच्या उद्देशालाच बगल मिळत असून संबंधितांनी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सुरूवातीला शेतकऱ्यांना सहन करावा लागला. तर आता हिवाळ्याच्या दिवसातच जलसंकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नळयोजनेद्वारे ग्रामस्थांना सध्या तीन ते चार दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केल्या जात आहे. त्यातच सहेली येथे ग्रा.पं.च्यावतीने लावण्यात आलेली रोपटे पाण्याअभावी करपत असल्याचे बघावयास मिळते. मोठा निधी खर्च करून सदर रोपटे लावण्यात आली. मात्र, आता ती अखेरची घटका मोजत आहे. याबाबत ग्रामसेवक धुर्वे यांना विचारणा केली असता रोपट्यांना जगविण्यासाठी पाणीच नसल्याचे व पाण्या अभावी रोपटे करतप असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वृक्ष संवर्धनाच्या उद्देशालाच बगळ मिळत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग