शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

कपाशीवर लाल्याचे तर तुरीवर अळ्यांचे आक्रमण

By admin | Updated: November 2, 2016 00:41 IST

यंदा भरपूर पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण तो खोटा ठरला.

शेतकरी संकटात : वेचणीच्या वेळेवर आलेल्या रोगामुळे उत्पादन घटण्याची शक्यतावर्धा : यंदा भरपूर पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण तो खोटा ठरला. असे असले तरी पिकांच्या दृष्टीने योग्य पाऊस आला. सोयाबीनला परतीच्या पावसाचा फटका बसला; पण शेतकऱ्यांना काही प्रमाणात पीक हाती लागले. या पावसाचा फटका कपाशीला मात्र सहन करावा लागत असल्याचे दिसते. ओलसरपणा आणि थंडीची चाहुल यामुळे कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केल्याचे दिसून येते. परिणामी, कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाच्या कमी-अधिक प्रमणाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसतो. प्रारंभी दुबार-तिबार पेरणी केल्यानंतर काही प्रमाणात सोयाबीन हाती लागले. यातही उताऱ्यामध्ये मोठी तफावत दिसून येते. कुणाला एकरी दहा ते बारा पोते तर काही शेतकऱ्यांना केवळ दोन ते तीन पोटे सोयाबीन झाल्याचे दिसे. या प्रकारामुळे शेतकरी हताश होते. हेच सोयाबीन दिवाळी सणाच्या कामी आले. सध्या कपाशीवर लाल्याने तर तुरीवर अळ्यांनी आक्रमण केले आहे. परिणामी, दोन्ही पिके संकटात सापडली आहेत़ कपाशी व तूर या पिकांतून काही प्रमाणात लावलेला खर्च निघेल, अशी अपेक्षा आहे; पण कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केल्याने कपाशी लाल पडून वाळू लागली आहे. तुरीवर अळ्यांचा मोठा प्रमाणात प्रादुर्भाव दिसत असल्याने ते ही उत्पन्न संकटात सापडले आहे. थंडी पडल्यास तूर पीक वाचू शकते; पण अळ्यांच्या बंदोबस्ताकरिता शेतकऱ्यांना उपाययोजना करणे गरजेचे आहे. लाल्यामुळे कपाशीचे २५ टक्के उत्पन्न तरी घटणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते. शिवाय भावही पाहिजे त्या प्रमाणात मिळणार नाही. यामुळे खर्च भरून निघणार की नाही, अशी शंका शेतकरी उपस्थित करीत आहेत. तुरीवर अळ्यांनी आक्रमण केल्याने उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)