शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

कपाशीवर लाल्याचे तर तुरीवर अळ्यांचे आक्रमण

By admin | Updated: November 2, 2016 00:41 IST

यंदा भरपूर पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण तो खोटा ठरला.

शेतकरी संकटात : वेचणीच्या वेळेवर आलेल्या रोगामुळे उत्पादन घटण्याची शक्यतावर्धा : यंदा भरपूर पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता; पण तो खोटा ठरला. असे असले तरी पिकांच्या दृष्टीने योग्य पाऊस आला. सोयाबीनला परतीच्या पावसाचा फटका बसला; पण शेतकऱ्यांना काही प्रमाणात पीक हाती लागले. या पावसाचा फटका कपाशीला मात्र सहन करावा लागत असल्याचे दिसते. ओलसरपणा आणि थंडीची चाहुल यामुळे कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केल्याचे दिसून येते. परिणामी, कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाच्या कमी-अधिक प्रमणाचा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसतो. प्रारंभी दुबार-तिबार पेरणी केल्यानंतर काही प्रमाणात सोयाबीन हाती लागले. यातही उताऱ्यामध्ये मोठी तफावत दिसून येते. कुणाला एकरी दहा ते बारा पोते तर काही शेतकऱ्यांना केवळ दोन ते तीन पोटे सोयाबीन झाल्याचे दिसे. या प्रकारामुळे शेतकरी हताश होते. हेच सोयाबीन दिवाळी सणाच्या कामी आले. सध्या कपाशीवर लाल्याने तर तुरीवर अळ्यांनी आक्रमण केले आहे. परिणामी, दोन्ही पिके संकटात सापडली आहेत़ कपाशी व तूर या पिकांतून काही प्रमाणात लावलेला खर्च निघेल, अशी अपेक्षा आहे; पण कपाशीवर लाल्या रोगाने आक्रमण केल्याने कपाशी लाल पडून वाळू लागली आहे. तुरीवर अळ्यांचा मोठा प्रमाणात प्रादुर्भाव दिसत असल्याने ते ही उत्पन्न संकटात सापडले आहे. थंडी पडल्यास तूर पीक वाचू शकते; पण अळ्यांच्या बंदोबस्ताकरिता शेतकऱ्यांना उपाययोजना करणे गरजेचे आहे. लाल्यामुळे कपाशीचे २५ टक्के उत्पन्न तरी घटणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जाते. शिवाय भावही पाहिजे त्या प्रमाणात मिळणार नाही. यामुळे खर्च भरून निघणार की नाही, अशी शंका शेतकरी उपस्थित करीत आहेत. तुरीवर अळ्यांनी आक्रमण केल्याने उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)