शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

लेंडी नाला उठला जीवावर ४५० कुटुंबांना धोका

By admin | Updated: February 12, 2015 01:35 IST

गत २२ वर्षांपासून शहीदभूमीच्या ४५० कुटुंबांची अवहेलना सुरू आहे. लेंडी नदीच्या काठावरील दोन्ही बाजुला असलेल्या वस्तीमध्ये दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुराचे पाणी जाते़ ...

अमोल सोटे आष्टी (श़)गत २२ वर्षांपासून शहीदभूमीच्या ४५० कुटुंबांची अवहेलना सुरू आहे. लेंडी नदीच्या काठावरील दोन्ही बाजुला असलेल्या वस्तीमध्ये दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुराचे पाणी जाते़ यामुळे नागरिक त्रस्त आहेत़ वस्तीमध्ये जायला धड रस्ता नाही. मधोमध एकमेव असलेला पूलही जीर्ण झाला आहे. शासनाकडे वारंवार प्रस्ताव पाठवूनही दखल घेतली जात नसल्यासने संरक्षण भिंतीचे घोडे अडले आहे़रंगारपेढ नाल्यापासून वाहणारे पाणी लेंडी नदीला मिळते. याठिकाणी पाण्याचा प्रवाह कमी-अधिक होत असतो़ यामुळे उपलब्ध जागेतून पाणी जात असल्याने ऐनवेळी पाण्याचा धोका उद्भवतो. नदीला लागूनच वस्ती आहे. परिस्थिती जेमतेम असलेली ही कुटुंबे येथे वास्तव्याला आहे. दोन वेळच्या जेवण्याची चिंता असलेल्या कुटुंबांना आपल्या निवाऱ्याला सुरक्षा भिंत बांधण्याची सोय नाही. यामुळे शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे; पण शासकीय उदासिनता आड येत आहे़ या नदीची सिमा दीड किमी गावातून गेली आहे. नदीकाठावर एकूण ४५० कुटुंब असून लोकसंख्या १३०० आहे. आदिवासी व मुस्लीम समाजाचे वास्तव्य आहे. १९९२ मध्ये लेंडी नदीला मोठा पूर आला होता. त्यानंतर २००६ मध्ये पुराने प्रचंड नुकसान झाले. नदीच्या पात्रात धोप्याची पाने व गवत वाढले होते. याची साफसफाई ग्रा़पं़ प्रशासनाने केली होती. काही प्रमाणात नाल्याचे खोलीकरण व नदीचे पात्रही खोल केले होते; पण कालौघात पाण्याच्या प्रवाहाने पात्र पूर्णत: बुजले़या भागातील नागरिक ग्रा़पं़ व पंचायत समितीकडे वारंवार संरक्षण भिंत बांधण्याची मागणी करतात; पण प्रशासन अपूऱ्या निधीमुळे बांधकाम करू शकत नसल्याचे कारण पूढे रेटत आहे़ या परिसराला वॉर्ड क्रमांक दोनचा पुर्व भाग लागून आहे. सध्या या वॉर्डच्या महिला संगीता कौरती आष्टीच्या सरपंच आहेत़ यापूर्वीही शालिनी इरपाची, सुशिला कोडापे या महिला सदस्यांनी वॉर्डाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांनीही प्रशासनाकडे संरक्षण भिंतीच्या कामासाठी निधीची मागणी केली आहे. शासनाने पूर संरक्षण निधीतून दीड किमी लांबीची भिंत त्वरित बांधून देणे गरजेचे आहे. संघर्ष सरकार दरबारी मांडणारया वॉर्डातील वसंत बोरेकर, रामेश्वर जाधव, अनिल कोडापे, देविदास कोकाटे, महादेव राऊत, सहादेव शेंदरे, जमीला बी, रामदास माने, हफीजा बी, परविन निसा, शेख शकील, शालिनी इरपाची, सुशिला कोडापे यांच्यासह अनेक नागरिक वारंवार प्रशासन दरबारी समस्या मांडत आहेत; पण त्यांच्या निवेदनांना भिक घातली जात नसल्याचेच दिसते़आमदारांनी दिले होते आश्वासनलेंडी नदीच्या काठावरील वस्तीला पुरापासून मुक्त करण्यासाठी पूर संरक्षण भिंतीचे बांधकाम व जीर्ण झालेल्या पूल मोडीत काढून नवीन बांधकाम करून देण्यासाठी शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवून काम मंजूर करून आणणार असल्याचे आश्वासन आमदार अमर काळे यांनी नागरिकांना दिले होते. आता या आश्वासनाची पूर्ती कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़