शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अन् मविआला नव्या भिडूची गरज नाही; मनसेला सोबत घेण्यास हर्षवर्धन सपकाळांचा नकार
2
‘लाडकी बहीण’चा फटका; ‘आनंदाचा शिधा’ विसरा
3
'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!
4
PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट
5
कफ सिरप मृत्यू प्रकरणात मध्य प्रदेशात डॉक्टरला अटक; IMA आक्रमक, थेट सरकारलाच दिला इशारा!
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; PSU Stocks मध्ये आजही खरेदी
7
'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
8
९.१ कोटी नोकऱ्यांची मोठी संधी, तीन नोकऱ्यांपैकी एक नोकरी या क्षेत्रातून येणार...
9
गाढ झोपेतच काळाने घातला घाला! ४ वर्षीय चिमुकलीसह मावशीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टर निलंबित
10
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
11
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
12
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
13
दिवाळीत मोठ्या खरेदीसाठीसाठी 'क्रेडिट कार्ड'नं पैसे देणं योग्य आहे का?; 'या' गोष्टी लक्षात ठेवा
14
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
15
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
16
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
17
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
18
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
19
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
20
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 

भू-दिव्यांचे पॅनल गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:45 IST

सुरक्षित वाहतुकीकरिता सिमेंट तथा डांबरी रस्त्याला खिळ्यांनी ठोकून अ‍ॅक्टीव्ह लाईट अर्थात रेडीयमयुक्त दिशा निर्देशन करणारे सोलर पॅनलचे भू-दिवे तीन महिन्यांपूर्वी लावले होते. त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक पॅनेल्स आला रस्त्यावरून गायब झाले आहे.

ठळक मुद्देरेल्वे उड्डाणपुलावरील प्रकार : अपघाताची शक्यता पुन्हा बळावली

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सुरक्षित वाहतुकीकरिता सिमेंट तथा डांबरी रस्त्याला खिळ्यांनी ठोकून अ‍ॅक्टीव्ह लाईट अर्थात रेडीयमयुक्त दिशा निर्देशन करणारे सोलर पॅनलचे भू-दिवे तीन महिन्यांपूर्वी लावले होते. त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक पॅनेल्स आला रस्त्यावरून गायब झाले आहे. ते काढून नेले असल्याची शक्यता आहे. ते कसे गायब झाले, हा संशोधनाचा विषय ठरत आहे.सुमारे ४०० पैकी आता अर्धेधिक पॅनेल्स रस्त्यावर नाहीत. यामुळे दिवस-रात्र चमकत राहणारे हे दिशानिर्देशन देणारी एक साखळी दिव्याची रांग आता तुटक स्वरूपात आली आहे. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीकोनातून लावलेले दिवेच गायब झाल्याने त्या विचारालाच हरताळ फासला गेल्याचे दिसून येत आहे. या विषयाकडे अद्याप संबंधित विभागाने लक्ष न घातल्याने दुर्लक्षितच राहील आहे.शहरातील मुख्य रस्ता तुकडोजी चौकातून रेल्वे उड्डाणपूलावरून शहराबाहेर जातो. नांदगाव चौकाकडे जाणारा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ ला जुळतो. नांदगाव, वर्धा, पांढरकवडा आणि तालुक्याच्या ग्रामीण भागाला ये-जा करण्यासाठी दुचाकीधारक, कार व हलकी-मध्यम वाहतूक करणारी असंख्य वाहनांची मोठी वर्दळ सतत या पुलावरून सुरू असते. हा पूल वळणाचा असल्याने अनेकांची वाहने वळण घेताना उंचवटा असलेल्या पादचारी मार्गाला धडकल्याचे लक्षात येते. यामुळेच तेथे रस्त्याच्या दोन्ही कडेला रेडीयमचे दिवस-रात्र चमकणारे अ‍ॅक्टीव्ह लाईट रस्त्यावर खिळ्याद्वारे ठोकण्यात आले होते. वळणाची योग्य दिशा त्वरित लक्षात यावी आणि अचूक अंदाजाने वाहने वळती व्हावी, हा यामागील हेतू होता. हे घुटक्यासाखे दिसणारे भू-दिवे साधारणत: ५ फुटांवर दोन-तीन महिन्यांपूर्वी लावण्यात आले होते; पण आता अर्ध्यापेक्षा कमीच रेडीयम दिवे शिल्लक राहिले आहेत. सुमारे ४०० दिव्यांपैकी १५० दिवेच राहिल्याने तेथील सुरक्षित वाहतूक या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. उर्वरित दिवेही गायब होणार नाही, हे सांगता येणे कठीणच आहे. या प्रश्नाकडे संबंधित विभागाने फारसे लक्ष दिले नसल्याने तो दुर्लक्षितच राहिला आहे.या पुलावर आतापर्यंत अनेक अपघात झालेत. यात अनेकांना मरण पत्करावे लागले तर अनेकांना अपंगत्व आले. याच मार्गावरून परिसरातील विद्यार्थी, पालक, नागरिक यांची मोठी गर्दी असते. शिवाय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी वाहनेही याच रस्त्याने ये-जा करतात. परिसरात दोन मोठ्या शाळा असल्याने विद्यार्थी व पालकांची चांगलीच गर्दी असते. यापूर्वी झालेले अपघात व त्यातील मृतकांची संख्याही लक्षणीय आहे. यामुळेच सुरक्षित वाहतुकीसाठी हे भू-दिवे लावण्यात आले होते; पण अर्ध्याधिक दिवे बेपत्ता झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे दिवे कुणी चोरले तर नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. संबंधित विभागाने ही बाब गांभीर्याने घेत पुन्हा रेडियमचे दिवे लावणे गरजेचे झाले आहे. अपघात टाळण्याकरिता किमान उड्डाण पुलावर तरी अ‍ॅक्टीव्ह लाईट लावून दिलासा देणे गरजेचे झाले आहे.सुरक्षित वाहतुकीकरिता अ‍ॅक्टीव्ह लाईटची गरजशहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, पुलावर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळविता यावे, विद्यार्थी, पालकांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून तुकडोजी चौक, रेल्वे उड्डाणपूल तथा अन्य मार्गांवर अ‍ॅक्टीव्ह लाईट लावण्यात आले होते; पण यातील बहुतांश लाईट चोरीस गेले आहेत. यामुळे सुरक्षित वाहतुकीचा उद्देश्यच लयास गेल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाचे अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पुन्हा अपघात बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.