शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

भू-दिव्यांचे पॅनल गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 23:45 IST

सुरक्षित वाहतुकीकरिता सिमेंट तथा डांबरी रस्त्याला खिळ्यांनी ठोकून अ‍ॅक्टीव्ह लाईट अर्थात रेडीयमयुक्त दिशा निर्देशन करणारे सोलर पॅनलचे भू-दिवे तीन महिन्यांपूर्वी लावले होते. त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक पॅनेल्स आला रस्त्यावरून गायब झाले आहे.

ठळक मुद्देरेल्वे उड्डाणपुलावरील प्रकार : अपघाताची शक्यता पुन्हा बळावली

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सुरक्षित वाहतुकीकरिता सिमेंट तथा डांबरी रस्त्याला खिळ्यांनी ठोकून अ‍ॅक्टीव्ह लाईट अर्थात रेडीयमयुक्त दिशा निर्देशन करणारे सोलर पॅनलचे भू-दिवे तीन महिन्यांपूर्वी लावले होते. त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक पॅनेल्स आला रस्त्यावरून गायब झाले आहे. ते काढून नेले असल्याची शक्यता आहे. ते कसे गायब झाले, हा संशोधनाचा विषय ठरत आहे.सुमारे ४०० पैकी आता अर्धेधिक पॅनेल्स रस्त्यावर नाहीत. यामुळे दिवस-रात्र चमकत राहणारे हे दिशानिर्देशन देणारी एक साखळी दिव्याची रांग आता तुटक स्वरूपात आली आहे. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीकोनातून लावलेले दिवेच गायब झाल्याने त्या विचारालाच हरताळ फासला गेल्याचे दिसून येत आहे. या विषयाकडे अद्याप संबंधित विभागाने लक्ष न घातल्याने दुर्लक्षितच राहील आहे.शहरातील मुख्य रस्ता तुकडोजी चौकातून रेल्वे उड्डाणपूलावरून शहराबाहेर जातो. नांदगाव चौकाकडे जाणारा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ ला जुळतो. नांदगाव, वर्धा, पांढरकवडा आणि तालुक्याच्या ग्रामीण भागाला ये-जा करण्यासाठी दुचाकीधारक, कार व हलकी-मध्यम वाहतूक करणारी असंख्य वाहनांची मोठी वर्दळ सतत या पुलावरून सुरू असते. हा पूल वळणाचा असल्याने अनेकांची वाहने वळण घेताना उंचवटा असलेल्या पादचारी मार्गाला धडकल्याचे लक्षात येते. यामुळेच तेथे रस्त्याच्या दोन्ही कडेला रेडीयमचे दिवस-रात्र चमकणारे अ‍ॅक्टीव्ह लाईट रस्त्यावर खिळ्याद्वारे ठोकण्यात आले होते. वळणाची योग्य दिशा त्वरित लक्षात यावी आणि अचूक अंदाजाने वाहने वळती व्हावी, हा यामागील हेतू होता. हे घुटक्यासाखे दिसणारे भू-दिवे साधारणत: ५ फुटांवर दोन-तीन महिन्यांपूर्वी लावण्यात आले होते; पण आता अर्ध्यापेक्षा कमीच रेडीयम दिवे शिल्लक राहिले आहेत. सुमारे ४०० दिव्यांपैकी १५० दिवेच राहिल्याने तेथील सुरक्षित वाहतूक या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. उर्वरित दिवेही गायब होणार नाही, हे सांगता येणे कठीणच आहे. या प्रश्नाकडे संबंधित विभागाने फारसे लक्ष दिले नसल्याने तो दुर्लक्षितच राहिला आहे.या पुलावर आतापर्यंत अनेक अपघात झालेत. यात अनेकांना मरण पत्करावे लागले तर अनेकांना अपंगत्व आले. याच मार्गावरून परिसरातील विद्यार्थी, पालक, नागरिक यांची मोठी गर्दी असते. शिवाय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी वाहनेही याच रस्त्याने ये-जा करतात. परिसरात दोन मोठ्या शाळा असल्याने विद्यार्थी व पालकांची चांगलीच गर्दी असते. यापूर्वी झालेले अपघात व त्यातील मृतकांची संख्याही लक्षणीय आहे. यामुळेच सुरक्षित वाहतुकीसाठी हे भू-दिवे लावण्यात आले होते; पण अर्ध्याधिक दिवे बेपत्ता झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हे दिवे कुणी चोरले तर नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. संबंधित विभागाने ही बाब गांभीर्याने घेत पुन्हा रेडियमचे दिवे लावणे गरजेचे झाले आहे. अपघात टाळण्याकरिता किमान उड्डाण पुलावर तरी अ‍ॅक्टीव्ह लाईट लावून दिलासा देणे गरजेचे झाले आहे.सुरक्षित वाहतुकीकरिता अ‍ॅक्टीव्ह लाईटची गरजशहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, पुलावर होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण मिळविता यावे, विद्यार्थी, पालकांच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून तुकडोजी चौक, रेल्वे उड्डाणपूल तथा अन्य मार्गांवर अ‍ॅक्टीव्ह लाईट लावण्यात आले होते; पण यातील बहुतांश लाईट चोरीस गेले आहेत. यामुळे सुरक्षित वाहतुकीचा उद्देश्यच लयास गेल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाचे अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पुन्हा अपघात बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.