शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
3
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
4
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
5
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
6
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
7
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
8
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
9
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
10
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
11
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
12
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
13
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
14
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
15
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
16
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
17
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
18
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
19
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
20
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली

लाखो लिटर पाणी जाते वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:48 IST

रबी हंगामासाठी कालव्याचे पाणी सोडण्यात आले आहे; पण उपकालवा आणि पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम व डागडुजी करण्यात आली नाही.

ठळक मुद्देसदोष पाटचऱ्यांचा परिपाक : साफसफाई तथा दुरूस्तीकडे विभागाचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/सेवाग्राम : रबी हंगामासाठी कालव्याचे पाणी सोडण्यात आले आहे; पण उपकालवा आणि पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम व डागडुजी करण्यात आली नाही. परिणामी, पिकांऐवजी अन्य वनस्पतीचे संवर्धन होत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय लाखो लिटर पाणी दररोज वाया जात असल्याचे दिसून येत आहे.सेवाग्राम-हमदापूर मार्गाजवळून महाकाली धरणाचा कालवा गेला आहे. या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. तरोडा शिवार आणि मधे येणाºया गावांतील शेतीला या पाण्यामुळे फायदा झाला. शेतकरी कपाशी, तूर, हरभरा आणि गहू या पिकांना पाणी देतात. कालव्याच्या पाण्यामुळेच शेतकऱ्यांना रबी पिके घेण्याची संधी मिळाली आणि आर्थिक उत्पन्नात भर पडू लागली. सध्या तरी कापसाचे उत्पन्न समाधानकारक नसल्याने शेतकºयांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. हरभरा आता शेतात असून शेतकरी कालव्याचे पाणी देत आहेत. पाणी पिकांसाठी संजीवनी असल्याने त्याचा उपयोग महत्त्वाचा आहे; पण लघु पाटबंधारे विभाग कालवा, उपकालवा आणि पाटचºयांबाबत गंभीर नसल्याचेच दिसून येत आहे. कालव्यातून पाणी सोडण्यात आले. उपकालवा व पाटचऱ्यांतून शेतात पाणी आले; पण उपकालवा व पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम, दुरूस्तीकडे लक्ष नसल्याने पाणी अस्ताव्यस्त पसरत असल्याचे दिसून येत आहे. सखल भाग, खड्डे यातून पाणी भरून वाहत असल्याने पिकांपेक्षा रानगवताचेच संवर्धन होत असल्याचे खरांगणा गोडे परिसरात दिसून येत आहे. नादुरूस्ती पाटचऱ्या, उपकालव्यांमुळे शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.निधीचे रडगाणे सुरूचजिल्ह्यातील सिंचन व्यवस्था सांभाळता यावी म्हणून पाटबंधारे विभागाची निर्मिती करण्यात आली. प्रत्येक विभागातील प्रकल्प एकेका कार्यालयाला विभागून देण्यात आले. शिवाय कालवे विभागांचीही निर्मिती करण्यात आली; पण या विभागांना निधीच दिला जात नसल्याची ओरड तेथील अधिकारी करतात. परिणामी, कालवे, उपकालवे, पाटचऱ्यां यांची देखभाल, दुरूस्ती होत नसल्याचेच दिसून येत आहे. पाणी वापर संस्थाही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसते. परिणामी, शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळत नसून ते भलतीकडेच वाहून जात असल्याचे दिसते. हा प्रकार टाळणे गरजेचे झाले आहे.