शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

लाखो लिटर पाणी जाते वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:48 IST

रबी हंगामासाठी कालव्याचे पाणी सोडण्यात आले आहे; पण उपकालवा आणि पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम व डागडुजी करण्यात आली नाही.

ठळक मुद्देसदोष पाटचऱ्यांचा परिपाक : साफसफाई तथा दुरूस्तीकडे विभागाचा कानाडोळा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/सेवाग्राम : रबी हंगामासाठी कालव्याचे पाणी सोडण्यात आले आहे; पण उपकालवा आणि पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम व डागडुजी करण्यात आली नाही. परिणामी, पिकांऐवजी अन्य वनस्पतीचे संवर्धन होत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय लाखो लिटर पाणी दररोज वाया जात असल्याचे दिसून येत आहे.सेवाग्राम-हमदापूर मार्गाजवळून महाकाली धरणाचा कालवा गेला आहे. या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. तरोडा शिवार आणि मधे येणाºया गावांतील शेतीला या पाण्यामुळे फायदा झाला. शेतकरी कपाशी, तूर, हरभरा आणि गहू या पिकांना पाणी देतात. कालव्याच्या पाण्यामुळेच शेतकऱ्यांना रबी पिके घेण्याची संधी मिळाली आणि आर्थिक उत्पन्नात भर पडू लागली. सध्या तरी कापसाचे उत्पन्न समाधानकारक नसल्याने शेतकºयांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. हरभरा आता शेतात असून शेतकरी कालव्याचे पाणी देत आहेत. पाणी पिकांसाठी संजीवनी असल्याने त्याचा उपयोग महत्त्वाचा आहे; पण लघु पाटबंधारे विभाग कालवा, उपकालवा आणि पाटचºयांबाबत गंभीर नसल्याचेच दिसून येत आहे. कालव्यातून पाणी सोडण्यात आले. उपकालवा व पाटचऱ्यांतून शेतात पाणी आले; पण उपकालवा व पाटचºयांची स्वच्छता, खोदकाम, दुरूस्तीकडे लक्ष नसल्याने पाणी अस्ताव्यस्त पसरत असल्याचे दिसून येत आहे. सखल भाग, खड्डे यातून पाणी भरून वाहत असल्याने पिकांपेक्षा रानगवताचेच संवर्धन होत असल्याचे खरांगणा गोडे परिसरात दिसून येत आहे. नादुरूस्ती पाटचऱ्या, उपकालव्यांमुळे शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळत नाही. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.निधीचे रडगाणे सुरूचजिल्ह्यातील सिंचन व्यवस्था सांभाळता यावी म्हणून पाटबंधारे विभागाची निर्मिती करण्यात आली. प्रत्येक विभागातील प्रकल्प एकेका कार्यालयाला विभागून देण्यात आले. शिवाय कालवे विभागांचीही निर्मिती करण्यात आली; पण या विभागांना निधीच दिला जात नसल्याची ओरड तेथील अधिकारी करतात. परिणामी, कालवे, उपकालवे, पाटचऱ्यां यांची देखभाल, दुरूस्ती होत नसल्याचेच दिसून येत आहे. पाणी वापर संस्थाही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसते. परिणामी, शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळत नसून ते भलतीकडेच वाहून जात असल्याचे दिसते. हा प्रकार टाळणे गरजेचे झाले आहे.