शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

गावकऱ्यांनी केले तलावाचे पाणी कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 16:02 IST

कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाण्याची चोरी व अपव्यय टाळण्यासाठी तलावाचे पाणी कुलूपबंद केले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व जाणून उचललेले हे पाऊल इतरांसाठीही दिशादर्शक ठरणारे आहे.

ठळक मुद्देवर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील घटनाग्रामपंचायत व शेतकºयांनी लढविली युक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात दुष्काळाची गडद छाया असल्याने शासनाने दुष्काळसदृष्य तालुके जाहीर केले असून त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे या तालुक्यात पाणीबाणी निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने भविष्यकालीन उपाययोजना म्हणून दृष्काळसदृष्य कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाण्याची चोरी व अपव्यय टाळण्यासाठी तलावाचे पाणी कुलूपबंद केले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व जाणून उचललेले हे पाऊल इतरांसाठीही दिशादर्शक ठरणारे आहे.वर्ध्याच्या कारंजा तालुक्याचा समावेश दुष्काळाच्या यादीत करण्यात आला आहे. या तालूक्यातील नागपूर-अमरावती महामार्गावर वसलेल्या ठाणेगावात जिल्हा परिषदच्या लघूसिंचन विभागाने सुमारे ४० वर्षापूर्वी पाणी साठवण तलावाची निर्मिती केली. या दिर्घ कालावधीत तलावाचा कालवा अनेक ठिकाणी बुजला आणि नादुरुस्तही झाला होता. त्यामुळे या तलावाची २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवार योजनेतून दुरूस्ती करण्यात आली. ४ किलोमीटर कालव्याचे खोलीकरण करण्यात आले. तलावाचे देखील खोदकाम करून गाळ उपसण्यात आला. या तलावात ५८२ सहस्त्र घनमीटर इतकी पाणी साठवण क्षमता असून आज तलावात अंदाजे ५५० सहस्त्र घनमीटर म्हणजे आॅक्टोबर महिन्यात ९० टक्के पाणी शिल्लक आहे. जे यंदा रबी पिकाला फायदा देणारे ठरणार आहे. या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा असल्याने गावकुसाबाहेर असलेल्या तलावाचा व्हॉल्व कुणीही उघडून पाणी चोरी करण्याची अथवा पाणी वाया घालवण्याची भीती आहे. म्हणून पाण्याचे महत्व जाणत ग्रामपंचायत व शेतकऱ्यांनी पुढकार घेत लघूसिंचन विभागाच्या सूचनेनुसार हेड रेग्यूलेटरलाच कुलूप लावले. त्यामुळे आता पाण्याची गळती व चोरी थांबून दुष्काळाला रोखण्यास मदत होणार आहे.

पाण्याचे नियोजन ग्रामपंचायतकडेलघूसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतने स्वत: खर्च करत तलावाचे पाणी कालव्यात सोडण्याचे ठिकाण म्हणजेच हेड रेग्यूलेटर व्हॉल्वला लोखंडी पेटी लावली. सोबतच त्या पेटीला २ कुलूप लावण्यात आले. या कुलुपांची चावी ग्रामपंचायतने स्वत:कडे ठेवली आहे. त्यामुळे हेड रेग्यूलेटरला कुलूप लावल्याने पाणी चोरी, अपव्ययाला आळा बसण्यास मदत झाली. हा तलाव ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात आला असून पाणी वाटपाचे नियोजन ग्रामपंचायत मागणीनुसार करणार आहे.

पहिल्यांदाच कुलूपंबद विमोचकाची व्यवस्थाच्ठाणेगाव लघुसिंचन तलावाचे जलयुक्त शिवार अभियान २०१६-१७ अंतर्गत दुरुस्ती काम केले आहे. या तलावाची साठवण क्षमता ५८२ स.घ.मी. असून १०० हेक्टर सिंचन क्षेत्र पुनर्जीवित केले आहे. अपुऱ्या पावसामुळे पुढील काळामध्ये उद्भवणाºया परिस्थितीचा सामना करण्यासाठी व उपलब्ध पाण्याचा काटकसरीने तंटामुक्त उपयोग करण्यासाठी कुलूप बंद विमोचकाची व्यवस्था केलेली आहे. कुलूप बंद विमोचकाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन पहिल्यांदाच केल्याने इतर लघु सिंचन प्रकल्पांवर देखील अशाप्रकारे पाण्याचा काटकसरीने वापर करणे क्रमप्राप्त ठरेल.

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी