शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

गावकऱ्यांनी केले तलावाचे पाणी कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 16:02 IST

कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाण्याची चोरी व अपव्यय टाळण्यासाठी तलावाचे पाणी कुलूपबंद केले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व जाणून उचललेले हे पाऊल इतरांसाठीही दिशादर्शक ठरणारे आहे.

ठळक मुद्देवर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील घटनाग्रामपंचायत व शेतकºयांनी लढविली युक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्यात दुष्काळाची गडद छाया असल्याने शासनाने दुष्काळसदृष्य तालुके जाहीर केले असून त्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे या तालुक्यात पाणीबाणी निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने भविष्यकालीन उपाययोजना म्हणून दृष्काळसदृष्य कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाण्याची चोरी व अपव्यय टाळण्यासाठी तलावाचे पाणी कुलूपबंद केले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्व जाणून उचललेले हे पाऊल इतरांसाठीही दिशादर्शक ठरणारे आहे.वर्ध्याच्या कारंजा तालुक्याचा समावेश दुष्काळाच्या यादीत करण्यात आला आहे. या तालूक्यातील नागपूर-अमरावती महामार्गावर वसलेल्या ठाणेगावात जिल्हा परिषदच्या लघूसिंचन विभागाने सुमारे ४० वर्षापूर्वी पाणी साठवण तलावाची निर्मिती केली. या दिर्घ कालावधीत तलावाचा कालवा अनेक ठिकाणी बुजला आणि नादुरुस्तही झाला होता. त्यामुळे या तलावाची २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवार योजनेतून दुरूस्ती करण्यात आली. ४ किलोमीटर कालव्याचे खोलीकरण करण्यात आले. तलावाचे देखील खोदकाम करून गाळ उपसण्यात आला. या तलावात ५८२ सहस्त्र घनमीटर इतकी पाणी साठवण क्षमता असून आज तलावात अंदाजे ५५० सहस्त्र घनमीटर म्हणजे आॅक्टोबर महिन्यात ९० टक्के पाणी शिल्लक आहे. जे यंदा रबी पिकाला फायदा देणारे ठरणार आहे. या दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा असल्याने गावकुसाबाहेर असलेल्या तलावाचा व्हॉल्व कुणीही उघडून पाणी चोरी करण्याची अथवा पाणी वाया घालवण्याची भीती आहे. म्हणून पाण्याचे महत्व जाणत ग्रामपंचायत व शेतकऱ्यांनी पुढकार घेत लघूसिंचन विभागाच्या सूचनेनुसार हेड रेग्यूलेटरलाच कुलूप लावले. त्यामुळे आता पाण्याची गळती व चोरी थांबून दुष्काळाला रोखण्यास मदत होणार आहे.

पाण्याचे नियोजन ग्रामपंचायतकडेलघूसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतने स्वत: खर्च करत तलावाचे पाणी कालव्यात सोडण्याचे ठिकाण म्हणजेच हेड रेग्यूलेटर व्हॉल्वला लोखंडी पेटी लावली. सोबतच त्या पेटीला २ कुलूप लावण्यात आले. या कुलुपांची चावी ग्रामपंचायतने स्वत:कडे ठेवली आहे. त्यामुळे हेड रेग्यूलेटरला कुलूप लावल्याने पाणी चोरी, अपव्ययाला आळा बसण्यास मदत झाली. हा तलाव ग्रामपंचायतीकडे सोपवण्यात आला असून पाणी वाटपाचे नियोजन ग्रामपंचायत मागणीनुसार करणार आहे.

पहिल्यांदाच कुलूपंबद विमोचकाची व्यवस्थाच्ठाणेगाव लघुसिंचन तलावाचे जलयुक्त शिवार अभियान २०१६-१७ अंतर्गत दुरुस्ती काम केले आहे. या तलावाची साठवण क्षमता ५८२ स.घ.मी. असून १०० हेक्टर सिंचन क्षेत्र पुनर्जीवित केले आहे. अपुऱ्या पावसामुळे पुढील काळामध्ये उद्भवणाºया परिस्थितीचा सामना करण्यासाठी व उपलब्ध पाण्याचा काटकसरीने तंटामुक्त उपयोग करण्यासाठी कुलूप बंद विमोचकाची व्यवस्था केलेली आहे. कुलूप बंद विमोचकाद्वारे पाण्याचे व्यवस्थापन पहिल्यांदाच केल्याने इतर लघु सिंचन प्रकल्पांवर देखील अशाप्रकारे पाण्याचा काटकसरीने वापर करणे क्रमप्राप्त ठरेल.

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी