शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

नवीन वसाहतींमध्ये नागरी सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:48 IST

नवीन वसाहती स्थापन होऊन गावांचा विकास होऊ लागला आहे. परिणामी, ग्रा.पं. प्रशासनाचे उत्पन्नही वाढीस लागले आहे;

नाचणगावातील प्रकार : रस्ते, प्रकाश व्यवस्थेकडे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : नवीन वसाहती स्थापन होऊन गावांचा विकास होऊ लागला आहे. परिणामी, ग्रा.पं. प्रशासनाचे उत्पन्नही वाढीस लागले आहे; पण त्या प्रमाणात सुविधा पुरविल्या जात नसल्याची ओरड सर्वत्र आहे. लगतच्या नाचणगाव या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या १७ सदस्यीय ग्रा.पं. मध्येही हा प्रकार पाहावयास मिळत आहे. नागरी सुविधा नसल्याने कर अदा करणाऱ्या नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. नाचणगाव ग्रा.पं. चे क्षेत्र वाढत असतानाच ग्रामस्थांच्या समस्या व तक्रारीही वाढत आहे. ग्रा.पं. ला सर्वाधिक वार्षिक महसूल देणारा भाग म्हणजे पुलगाव शहरालगत असणाऱ्या वसाहती होय. या भागातील ग्रामस्थांना सार्वजनिक आरोग्य सेवा, स्वच्छता, दळणवळण, पाणी पुरवठा, प्रकाश व्यवस्था आदी मुलभूत सेवा पुरविणे हे ग्रा.पं. प्रशासनाचे कर्तव्य आहे; पण मागील काही महिन्यांपासून या नवीन वसाहतीतील ग्रामस्थांना प्रकाश व्यवस्था व दळणवळणाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. याकडे ग्रा.पं. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे. या ग्रा.पं. क्षेत्रातील बिरे ले-आऊट, विजयश्री कॉलनी (साबळे ले-आऊट), मुंधडा कॉलनी, मिरा कॉलनी (ले-आऊट), गाडगेनगर या भागातून द्रुतगती मार्गाकडे रस्ता काढण्यात आलेला आहे. दशकापूर्वी या नवीन वसाहतीमध्ये ५५ लाख रुपये खर्चाचे जवळपास ४५ जोडरस्ते काढण्यात आले होते; पण त्यातील बहुतेक रस्त्यांचे खडीकरण करण्यात आले होते. पावसाळ्यात या मार्गातील मुरूम वाहून गेल्यामुळे रस्ते खड्ड्यांनी व्यापले होेते. पैकी काही रस्त्यांचे डांबरीकरण व सिमेंटीकरण करण्यात आले होते; पण पावसामुळे या रस्त्यांनी आपले अंतरंग उघड केले आहे. या भागातून साई मंदिर, रामदेव बाबा मंदिर, कला व विज्ञान महाविद्यालय, इंडियन स्कूल आॅफ स्कॉलर्स, फॉर्मसी कॉलेज शारीरिक शिक्षण महाविद्यालय, विवेकानंद विद्यालयासह शिकवणी वर्गांकडे विद्यार्थ्यांची व ग्रामस्थांची ये-जा असते; पण गिट्टी उघडी पडलेले व ्नखड्ड्यांचे रस्ते आणि त्यावर साचलेले पाण्याचे डबके यामुळे अनेक समस्यांना तोंडे द्यावे लागत आहे. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने दुर्गंधीही पसरली आहे. या नवीन वसाहतीच्या प्रभागात सहा ग्रामपंचायत सदस्य आहेत. या सदस्यांसह ग्रा.पं. प्रशासनाकडे अनेकदा नागरिकांनी तक्रारी केल्यात; पण कुठलीही उपाययोजना करण्यात आली नाही. ग्रा.पं. प्रशासनाने या भागातील समस्यांकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे. कुणीही, कधीही करतात पथदिवे सुरू-बंद नाचणगाव ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या नवीन वसाहतींच्या भागात विद्युत खांब तथा पथदिवे आहेत; पण रात्री हे दिवे बंद असतात. यामुळे ग्रामस्थांना काळोखातून मार्ग काढावा लागत असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करतात. हे पथदिवे कधीही आणि कुणीही सुरू करतात. बरेचदा दिवसाही पथदिवे सुरूच असतात. मग, कुणाच्या लक्षात आल्यास ते ग्रामस्थ आपले कर्तव्य बजावतात. हा प्रकार रोखून कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.