शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
2
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
3
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
4
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
5
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
6
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
7
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 
8
पत्नीला १७ वर्षांच्या मुलासोबत त्या अवस्थेत पाहिलं, पतीचं डोकं भडकलं, सिलेंडर उचलला आणि....
9
जगात भारी... Mumbai Indiansच्या जसप्रीत बुमराहने IPL मध्ये केला सर्वात 'जम्बो' विक्रम, 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच क्रिकेटर
10
चाललंय तरी काय? रोहित- विराटनंतर आणखी एका स्टार खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
11
'राईचा पर्वत केला'; सरन्यायाधीश गवईंनी प्रोटोकॉल प्रकरणात याचिका करणाऱ्या वकिलाला झापले
12
पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल
13
Astrology: जून देणार 'या' पाच राशींच्या नशिबाला गती, येणार अच्छे दिन, बदलणार स्थिती!
14
IPL 2025 Final वरून मोठा राडा ! BCCI च्या निर्णयावर बंगाल सरकारचा घणाघाती आरोप
15
‘७५ वर्षं जगला, खूप झालं, आता पाकिस्तानचे फार दिवस उरलेले नाहीत’, योगी आदित्यनाथ यांचा इशारा 
16
IPL 2025: शुभमन गिल- ऋषभ पंतमध्ये वाद सुरू? मैदानातील व्हिडीओ समोर आल्यानंतर चर्चांना उधाण
17
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
18
Shani Dosha: शनि महादशेचा त्रास तान्ह्या बाळांनाही होतो का? काय आहे त्यावर उपाय? जाणून घ्या!
19
राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता; महावितरणकडून ‘हाय अलर्ट’ जारी
20
रोहित- विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली? गंभीरनं एका वाक्यात दिलं उत्तर!

अतिजलद रेल्वे गाड्यांचा पुलगावाला खो

By admin | Updated: June 14, 2015 02:24 IST

येथील रेल्वे स्थानकावर अतिजलद रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी गत अनेक वर्षांपासून होत आहे.

रेल्वे मंत्र्यांना साकडे : माजी सैनिक संघाचे निवेदन पुलगाव : येथील रेल्वे स्थानकावर अतिजलद रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी गत अनेक वर्षांपासून होत आहे. या मागणीकरिता अनेक वेळा निवेदने रेल्वे प्रशासनाला दिली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत एकाही अतिजलद गाडीला येथे थांबा दिला नाही. या गाड्यांना थांबा देण्याची मागणी येथील माजी सैनिक संघटनेच्यावतीने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना नव्याने करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून पुलगाव रेल्वे स्थानकावर अतिजलद रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी विविध संघटनासह प्रवासी संघटनांनाही रेल्वे मंत्रालयाकडे केली. ५० हजार लोकसंख्येचे सैनिक व कामगारांचे शहर संबोधल्या जाणाऱ्या या शहरात केंद्रीय दारुगोळा भांडार आहे. या दारूगोळा भांडारात देशाच्या विविध भागातील सैनिक व त्याची कुटूंब आहेत. त्यांना गावी जाण्याकरिता याच रेल्वे स्थानकावर उतरावे लागते व परत ते ओझे घेवून मायदेशाकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्याकडे जावे लागते. देशाचे संरक्षणार्थ असलेल्या या सैनिकांची पायपीट रेल्वे मंत्रालयाच्या उदासीन धोरणामुळे होत असल्याचे दिसून येत आहे. उत्तर, दक्षिणकडे किंवा राजस्थान व गुजरातकडे जाणाऱ्या गाड्या या स्थानकावर थांबत नसल्याने अडचण होत आहे. या शहरातून नागपूर- अमरावती-चंद्रपूरकडे हजारो प्रवाशी कर्मचारी विद्यार्थी, व्यापारी, सैनिक यांचे आवागमन होते. मद्रास, दिल्ली, अहमदाबादकडे जाणारे शेकडो सैनिक व व्यापारी या शहरात आहेत. त्यांना थेट रेल्वे गाडी नाही. त्यामुळे या प्रवाश्यांची मोठी पायपीट होते. रेल्वे मंत्रालयाने रोज येणारी नवजीवन एक्सप्रेस, आझाद हिंद एक्सप्रेस, बिलासपूर-पुणे, चैन्नई जोधपूर, ओकापूरी तसे किमान दोन तीन तरी सुपर फास्ट रेल्वे गाड्यांना पुलगाव स्थानकावर थांबा देण्याची मागणी आहे. निवदेन देतेवेळी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष मनोहर जवळकर, सचिव विनोद राऊत यांच्यासह सदस्यांनी दिले.(तालुका प्रतिनिधी)