शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वसतिगृहात सुविधांचा अभाव

By admin | Updated: December 22, 2016 00:28 IST

उमरी (मेघे) येथील अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध वसतिगृहात विविध ठिकाणचे विद्यार्थी प्रवेशित आहे;

विद्यार्थी हतबल : शैक्षणिक भवितव्य धोक्यात, कारवाईची मागणी वर्धा : उमरी (मेघे) येथील अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध वसतिगृहात विविध ठिकाणचे विद्यार्थी प्रवेशित आहे; पण येथे अनेक विषय शिकविण्यासाठी शिक्षकच नाहीत. यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. आठवड्यात कधी-कधीच तासिका होतात. यामुळे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. शिवाय अनेक सुविधांचा अभाव असल्याने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवासी शाळा असताना वसतिगृहात रात्री विद्यार्थीच असतात. कोणतेही कर्मचारी निवासी राहत नाहीत. गार्ड कधी राहतात तर कधी रात्री १० वाजता निघून जातात. गृहपालाचे पद रिक्त आहे. मुख्याध्यापक जबाबदारीने राहत नाहीत. रात्री केवळ विद्यार्थ्यांवर संपूर्ण इमारत सोपविलेली असते. निवासी शाळेतील विद्यार्थी संख्या १४५ आहे; पण एकही शारीरिक शिक्षक नेमलेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांना खेळांपासून मुकावे लागत आहे. त्यांची पीटी घेतली जात नाही. खेळण्याचे साहित्य नाही. शैक्षणिक सत्र संपत असताना अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आला नाही. विद्यार्थी आपल्या घरून आणलेल्या कपड्यावरच शिक्षण घेत आहे. विद्यार्थी आजारी असल्यास त्यांची काळजी घेतली जात नाही. त्यांना पाणी पिऊन झोपण्याचा वा वर्गात बसण्याचा सल्ला दिला जातो. नियमित आरोग्य तपासणी होत नाही. वेळापत्रकानुसार जेवण दिले जात नाही. शिवाय भोजनाचा दर्जाही व्यवस्थित नाही. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यास तुमच्या घरच्यापेक्षा येथील जेवण चांगले आहे, असा धमकीवजा समज देत त्यांना शांत केले जाते. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक नाही; पण कंत्राटी पद्धतीने सफाई कर्मचारी आठ व सुरक्षा कर्मचारी नऊ नेमण्यात आले. एकूण १७ कंत्राटी कर्मचारी आहेत. एवढ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची गरज आहे काय, असे असल्यास विषयासंबंधी शिक्षक, पीटीआय व गृहपाल का नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळा सकाळी राष्ट्रगीत व प्रार्थनेने सुरू होते. एकंदरीत देशातील सर्वच शाळांत ही पद्धती आहे; पण येथे राष्ट्रगीत, प्रार्थना सुरू असताना मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित राहत नाही. कंत्राटी कर्मचारी त्यांची जबाबदारी पार पाडतात. शाळेत प्रयोगशाळा व सहायकही नाही. या अनियमितता, अवस्थेमुळे १४५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे. जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अरविंद खैरकार यांनी निवेदनातून दिला आहे.(कार्यालय प्रतिनिधी) अन्नाचा दर्जाही निकृष्ट निवासी शाळा, वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना योग्य पोषण आहार मिळावा म्हणून शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते; पण त्या तुलनेत विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नाही, हे सर्वश्रूत आहे. असाच प्रकार उमरी मेघे येथील निवासी शाळेत घडत असून येथील जेवणाचा दर्जाही निकृष्ट असल्याचा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने केला आहे. या प्रकरणी कार्यवाहीची मागणी केली आहे.