शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
4
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
5
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
6
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
7
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
8
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
9
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
10
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
11
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
12
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
13
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
14
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
15
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
16
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
17
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
18
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
19
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
20
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...

वसतिगृहात सुविधांचा अभाव

By admin | Updated: December 22, 2016 00:28 IST

उमरी (मेघे) येथील अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध वसतिगृहात विविध ठिकाणचे विद्यार्थी प्रवेशित आहे;

विद्यार्थी हतबल : शैक्षणिक भवितव्य धोक्यात, कारवाईची मागणी वर्धा : उमरी (मेघे) येथील अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध वसतिगृहात विविध ठिकाणचे विद्यार्थी प्रवेशित आहे; पण येथे अनेक विषय शिकविण्यासाठी शिक्षकच नाहीत. यामुळे अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. आठवड्यात कधी-कधीच तासिका होतात. यामुळे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. शिवाय अनेक सुविधांचा अभाव असल्याने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. निवासी शाळा असताना वसतिगृहात रात्री विद्यार्थीच असतात. कोणतेही कर्मचारी निवासी राहत नाहीत. गार्ड कधी राहतात तर कधी रात्री १० वाजता निघून जातात. गृहपालाचे पद रिक्त आहे. मुख्याध्यापक जबाबदारीने राहत नाहीत. रात्री केवळ विद्यार्थ्यांवर संपूर्ण इमारत सोपविलेली असते. निवासी शाळेतील विद्यार्थी संख्या १४५ आहे; पण एकही शारीरिक शिक्षक नेमलेला नाही. यामुळे विद्यार्थ्यांना खेळांपासून मुकावे लागत आहे. त्यांची पीटी घेतली जात नाही. खेळण्याचे साहित्य नाही. शैक्षणिक सत्र संपत असताना अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आला नाही. विद्यार्थी आपल्या घरून आणलेल्या कपड्यावरच शिक्षण घेत आहे. विद्यार्थी आजारी असल्यास त्यांची काळजी घेतली जात नाही. त्यांना पाणी पिऊन झोपण्याचा वा वर्गात बसण्याचा सल्ला दिला जातो. नियमित आरोग्य तपासणी होत नाही. वेळापत्रकानुसार जेवण दिले जात नाही. शिवाय भोजनाचा दर्जाही व्यवस्थित नाही. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यास तुमच्या घरच्यापेक्षा येथील जेवण चांगले आहे, असा धमकीवजा समज देत त्यांना शांत केले जाते. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक नाही; पण कंत्राटी पद्धतीने सफाई कर्मचारी आठ व सुरक्षा कर्मचारी नऊ नेमण्यात आले. एकूण १७ कंत्राटी कर्मचारी आहेत. एवढ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची गरज आहे काय, असे असल्यास विषयासंबंधी शिक्षक, पीटीआय व गृहपाल का नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शाळा सकाळी राष्ट्रगीत व प्रार्थनेने सुरू होते. एकंदरीत देशातील सर्वच शाळांत ही पद्धती आहे; पण येथे राष्ट्रगीत, प्रार्थना सुरू असताना मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित राहत नाही. कंत्राटी कर्मचारी त्यांची जबाबदारी पार पाडतात. शाळेत प्रयोगशाळा व सहायकही नाही. या अनियमितता, अवस्थेमुळे १४५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे. जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अरविंद खैरकार यांनी निवेदनातून दिला आहे.(कार्यालय प्रतिनिधी) अन्नाचा दर्जाही निकृष्ट निवासी शाळा, वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना योग्य पोषण आहार मिळावा म्हणून शासनाकडून मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते; पण त्या तुलनेत विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नाही, हे सर्वश्रूत आहे. असाच प्रकार उमरी मेघे येथील निवासी शाळेत घडत असून येथील जेवणाचा दर्जाही निकृष्ट असल्याचा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने केला आहे. या प्रकरणी कार्यवाहीची मागणी केली आहे.