शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

कपाशीसह तूरही धोक्यात

By admin | Updated: November 15, 2015 01:27 IST

परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सध्या जमिनीत ओल नाही. याचा विपरीत परिणाम तूर, कपाशीवर होत असल्याचे दिसून येत आहे.

जमिनीत ओलाव्याचा अभाव : पहिल्या वेच्यानंतर दुसऱ्याची आशा नाही वर्धा : परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सध्या जमिनीत ओल नाही. याचा विपरीत परिणाम तूर, कपाशीवर होत असल्याचे दिसून येत आहे. उत्पन्न निघण्याच्या ऐन काळात ही पिके वाळू लागली आहेत. सध्या तूर फुलांवर आली असून शेंगा येणे सुरू झाले आहे. कपाशीची बोंडे मोठी होण्याची वेळ आहे. निसर्गाच्या होत असलेल्या अवकृपेमुळे ही दोन्ही पिके शेतात अपरिपक्व अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. उसनवारी व कर्ज काढून शेतकऱ्यानी खरीप हंगामात पेरणी केली. यात सोयाबीनने धोका दिल्याने त्यांच्या आशा आता कपाशी व तुरीवर आहेत. जिल्ह्यात या दोन पिकांची लागवड पारंपारिक पीक म्हणून करण्यात येते. या दोन पिकांच्या आधारावर शेतकऱ्यांचे बजेट असल्याचा इतिहास आहे; मात्र पावसाने दगा दिल्याने ही पिके धोक्यात आली आहेत. पावसाअभावी जमिनीत ओल कमी असल्याने दोनही पिके धोक्यात आली आहे. अशात परतीचा पाऊस येईल असे वाटत असताना शेतकऱ्यांना मोठी हुलकावणी मिळाली. यामुळे तूर, कपाशीचे पीक वेळेपूर्वीच वाळत आहे. शेतात असलेला कापूस वेचण्याचे काम सुरू झाले आहे. यात पहिला वेचा संपण्याची वेळ आली आहे. काही दिवसानंतर शेतकऱ्यांकडून दुसरा वेचा केल्या जातो. या दुसऱ्या वेच्यात त्यांच्या हाती कापूस येईल अथवा नाही हे सांगणे कठीण झाले आहे. कपाशीची झाडे पूर्णत: वाळत चालली आहेत तर काही ठिकाणी लाल्या आला आहे. (प्रतिनिधी)