शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

जिल्ह्यातील ३६ एचआयव्हीसह टीबी ग्रस्तांनी हरविले कोविड-१९ विषाणूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ५७६ टीबीग्रस्त आहेत. त्यापैकी ३५२ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर २८ व्यक्तीचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. या २८ कोविड बाधितांपैकी २७ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर एका टीबीग्रस्त कोविड बाधिताचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. 

ठळक मुद्देलक्षण आढळताच केली जातेय कोविड चाचणी

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  कोरोनाचा धोका मोठा असल्याने टीबी आणि एचआयव्ही सोबत जगणाऱ्या व्यक्तींचीही जिल्ह्यात कोविड चाचणी केली जात आहे. एखादी एचआयव्ही तसेच टीबीग्रस्ताला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान होताच त्याला चांगली आरोग्य सेवा दिली जात आहे. आतापर्यंत ३७ टीबी आणि एचआयव्ही ग्रस्तांना कोरोना संसर्ग झाला असून त्यापैकी ३६ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविला आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात ५७६ टीबीग्रस्त आहेत. त्यापैकी ३५२ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर २८ व्यक्तीचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. या २८ कोविड बाधितांपैकी २७ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर एका टीबीग्रस्त कोविड बाधिताचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात २ हजार १०० व्यक्ती एचआयव्ही सोबत जीवन जगत आहेत. त्यापैकी ३१८ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर नऊ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला. या एचआयव्ही ग्रस्तांना वेळीच औषधोपचार मिळाल्याने ते कोविडमुक्त झाले आहे.

लक्षण आढळताच केली जातेय कोविड चाचणीनियमित औषधोपचार घेण्यासाठी रुग्णालयात आल्यावर एचआयव्ही सोबत जीवन जगणाऱ्या व्यक्तीची तातडीने कोविड चाचणी केली जाते. तर टीबी सोबत जीवन जगणाऱ्या व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्याची तातडीने कोविड चाचणी केली जात आहे.

अतिजोखिमेच्या व्यक्तींवर अधिकाऱ्यांची करडी नजरजिल्ह्यात २ हजार १०० व्यक्ती एचआयव्हीसोबत तर ५७६ व्यक्ती टीबीसोबत जीवन जगत आहेत. या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती पूर्वीच कमी राहत असल्याने त्यांना कोरोना संकटाच्या काळात अतिजोखीमीची व्यक्ती म्हणून निश्चित करण्यात आले आहे. असे असले तरी तालुका स्तरासह जिल्हा स्थळावरील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी या व्यक्तींवर करडी नजर ठेवून असल्याचे सांगण्यात आले. 

ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसुत्री संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्याचा आरोग्य विभाग तसेच यंत्रणेतील प्रत्येक व्यक्ती कोविडशी लढा देत आहे. आतापर्यंत एचआयव्ही व टीबीसोबत जीवन जगणाऱ्या ३७ व्यक्तींचा कोरोना संसर्ग झाला असला तरी त्यापैकी ३६ व्यक्ती कोविडमुक्त झाले आहेत. डॅा. अजय डवले,जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Healthआरोग्य