शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

जिल्ह्यातील ३६ एचआयव्हीसह टीबी ग्रस्तांनी हरविले कोविड-१९ विषाणूला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ५७६ टीबीग्रस्त आहेत. त्यापैकी ३५२ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर २८ व्यक्तीचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. या २८ कोविड बाधितांपैकी २७ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर एका टीबीग्रस्त कोविड बाधिताचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. 

ठळक मुद्देलक्षण आढळताच केली जातेय कोविड चाचणी

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  कोरोनाचा धोका मोठा असल्याने टीबी आणि एचआयव्ही सोबत जगणाऱ्या व्यक्तींचीही जिल्ह्यात कोविड चाचणी केली जात आहे. एखादी एचआयव्ही तसेच टीबीग्रस्ताला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान होताच त्याला चांगली आरोग्य सेवा दिली जात आहे. आतापर्यंत ३७ टीबी आणि एचआयव्ही ग्रस्तांना कोरोना संसर्ग झाला असून त्यापैकी ३६ व्यक्तींनी कोरोनावर विजय मिळविला आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात ५७६ टीबीग्रस्त आहेत. त्यापैकी ३५२ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर २८ व्यक्तीचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला होता. या २८ कोविड बाधितांपैकी २७ कोविड बाधितांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर एका टीबीग्रस्त कोविड बाधिताचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात २ हजार १०० व्यक्ती एचआयव्ही सोबत जीवन जगत आहेत. त्यापैकी ३१८ व्यक्तींची कोविड चाचणी केल्यावर नऊ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आला. या एचआयव्ही ग्रस्तांना वेळीच औषधोपचार मिळाल्याने ते कोविडमुक्त झाले आहे.

लक्षण आढळताच केली जातेय कोविड चाचणीनियमित औषधोपचार घेण्यासाठी रुग्णालयात आल्यावर एचआयव्ही सोबत जीवन जगणाऱ्या व्यक्तीची तातडीने कोविड चाचणी केली जाते. तर टीबी सोबत जीवन जगणाऱ्या व्यक्तीला ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्याची तातडीने कोविड चाचणी केली जात आहे.

अतिजोखिमेच्या व्यक्तींवर अधिकाऱ्यांची करडी नजरजिल्ह्यात २ हजार १०० व्यक्ती एचआयव्हीसोबत तर ५७६ व्यक्ती टीबीसोबत जीवन जगत आहेत. या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती पूर्वीच कमी राहत असल्याने त्यांना कोरोना संकटाच्या काळात अतिजोखीमीची व्यक्ती म्हणून निश्चित करण्यात आले आहे. असे असले तरी तालुका स्तरासह जिल्हा स्थळावरील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी या व्यक्तींवर करडी नजर ठेवून असल्याचे सांगण्यात आले. 

ट्रेस, टेस्ट आणि ट्रिट या त्रिसुत्री संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्याचा आरोग्य विभाग तसेच यंत्रणेतील प्रत्येक व्यक्ती कोविडशी लढा देत आहे. आतापर्यंत एचआयव्ही व टीबीसोबत जीवन जगणाऱ्या ३७ व्यक्तींचा कोरोना संसर्ग झाला असला तरी त्यापैकी ३६ व्यक्ती कोविडमुक्त झाले आहेत. डॅा. अजय डवले,जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Healthआरोग्य