शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

चाकूच्या धाकावर लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

मालवाहू चालक अनिल सुखदेव पाटील रा. सानेवाडी हा एम.एच.३२ क्यू. २०४६ क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून ४०० लिटर डिझेल, १० लिटर पेट्राेल घेऊन म्हसाळा नजीकच्या बायपास रस्त्याने जात असताना दरोडेखोरांनी कार आडवी लावून चाकूचा धाकावर त्याचे अपहरण करीत कारमध्ये बसवून कान्होलीबारा येथील जंगलात सोडून देत मालवाहू वाहन आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मालवाहू चालकाचे अपहरण करुन त्याला जंगलात सोडून चाकूचा धाक दाखवून वाहनासह डिझेल असा एकूण २ लाख ९५ हजार ४२० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून नेला होता. याप्रकरणाचा संयुक्त तपास सेवाग्राम पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा करीत असतानाच पोलिसांनी अवघ्या ४८ तासांच्या आत दरोडेखोरांचा शोध लावून तब्बल चौघांना बेड्या ठोकल्या तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिली. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये सूरज सहदेव चव्हाण रा. आमगाव खडकी, सोमेश वसंत उईके रा. महाबळा, विकास ऊर्फ जितू नामदेव चामलाटे रा. पंजाब कॉलनी वर्धा, सागर अरविंद वाघाडे रा. गजानन नगर, वर्धा यांचा समावेश असून दोन अल्पवयीनांना ही ताब्यात घेतले आहे. मालवाहू चालक अनिल सुखदेव पाटील रा. सानेवाडी हा एम.एच.३२ क्यू. २०४६ क्रमांकाच्या मालवाहू वाहनातून ४०० लिटर डिझेल, १० लिटर पेट्राेल घेऊन म्हसाळा नजीकच्या बायपास रस्त्याने जात असताना दरोडेखोरांनी कार आडवी लावून चाकूचा धाकावर त्याचे अपहरण करीत कारमध्ये बसवून कान्होलीबारा येथील जंगलात सोडून देत मालवाहू वाहन आणि इतर साहित्य असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेला होता. याचा समांतर तपास गुन्हे शाखा आणि सेवाग्राम पोलीस करीत असतानाच त्यांना गुन्हा करताना एम.एच. ३१ ए. ई. ९५९९ क्रमांकाच्या कारचा वापर झाल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तपासाला गती दिली आणि चार आरोपींना बेड्या ठोकून दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, निरंजन वरभे, गजानन लामसे, रणजित काकडे, यशवंत गोल्हर, राजेंद्र जयसिंगपुरे, रितेश शर्मा, अभिजीत वाघमारे, प्रदीप वाघ, गोपाल बावणकर, अमोल ढोबाळे यांनी केली.

६.७४ लाखांचा माल अमरावती जिल्ह्यातून ‘रिकव्हर’-    आरोपींना ताब्यात घेत पोलिसी हिसका दाखविला असता त्यांनी सर्व मुद्देमाल अमरावती येथे विकल्याचे सांगितले. पोलीस पथक अमरावतीला रवाना झाले असता गुन्ह्यात वापरलेली कार, चार मोबाईल, तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपी दीपक सहदेव चव्हाण, सुनील पुंडलिक बारबुद्धे दोन्ही रा. गुरुकुंज मोझरी जि. अमरावती यांच्याकडून ४०० लिटर डिझेल जप्त करुन आर्वी सावळापूर शिवारात सोडलेला मालवाहू, बॅटरी असा एकूण ६ लाख ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना सेवाग्राम पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिस