शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जिल्ह्यात ३ लाख ११ हजार हेक्टरवर खरिपातील पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

जिल्ह्यात रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्रात यावेळी समाधानकारक पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे वेळेवर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणीची कामे आटोपली. कोरोना विषाणू संसर्गामुळे कापूस घरातच लॉकडाऊन होता. सीसीआयचे खरेदी केंद्रही उशिराने सुरू झाले. त्यातही कापूस गाड्या खरेदीची मर्यादा असल्याने खरिपाच्या तोंडावर कापूस घरातच होता.

ठळक मुद्देकृषी विभाग : ४ लाख २८ हजार क्षेत्रावर होते नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात रोहिणी आणि मृग नक्षत्रात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तब्बल ३ लाख ११ हजार ८६५ हेक्टरवर खरिपातील पेरण्या आटोपल्या आहेत. यंदाच्या हंगामात ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर पेरणीचे नियोजन होते, सरासरी एकूण ७०.४३ टक्के पेरणी झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षकांनी दिली.जिल्ह्यात रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्रात यावेळी समाधानकारक पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे वेळेवर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणीची कामे आटोपली. कोरोना विषाणू संसर्गामुळे कापूस घरातच लॉकडाऊन होता. सीसीआयचे खरेदी केंद्रही उशिराने सुरू झाले. त्यातही कापूस गाड्या खरेदीची मर्यादा असल्याने खरिपाच्या तोंडावर कापूस घरातच होता. जवळ पै-पैसा नसताना उसनवारी आणि पीककर्ज काढून कपाशी, तूर, सोयाबीन आदीची शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, २०-२२ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोवळ्या रोपांनी उष्णतामानामुळे माना टाकल्याचे चित्र आहे. तर पेरणीनंतर जिल्ह्यात अनेक भागात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, त्यांनी कसेबसे पीक जगविले. मात्र, सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत पावसाअभावी भर पडली आहे. जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या ७०.४३ टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. पावसाने दडी मारल्याने सर्वच शेतकºयांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे लावे लागेल, अशी सद्यस्थिती आहे.पावसाच्या दडीने वाढविली शेतकऱ्यांची चिंतारोहिणी आणि मृग नक्षत्रात पाऊस झाल्यानंतर शेतकºयांनी पेरणी केली. मात्र, मागील २० ते २२ दिवसांपासून पावसाने डोळे वटारले आहेत.जुलै महिना उजाडूनही पावसाचा पत्ता नसून प्रखर ऊन आणि वातावरणात कमालीचा उकाडा आहे. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास तिबार पेरणी करावी लागेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती