शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

जिल्ह्यात ३ लाख ११ हजार हेक्टरवर खरिपातील पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

जिल्ह्यात रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्रात यावेळी समाधानकारक पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे वेळेवर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणीची कामे आटोपली. कोरोना विषाणू संसर्गामुळे कापूस घरातच लॉकडाऊन होता. सीसीआयचे खरेदी केंद्रही उशिराने सुरू झाले. त्यातही कापूस गाड्या खरेदीची मर्यादा असल्याने खरिपाच्या तोंडावर कापूस घरातच होता.

ठळक मुद्देकृषी विभाग : ४ लाख २८ हजार क्षेत्रावर होते नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात रोहिणी आणि मृग नक्षत्रात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने तब्बल ३ लाख ११ हजार ८६५ हेक्टरवर खरिपातील पेरण्या आटोपल्या आहेत. यंदाच्या हंगामात ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर पेरणीचे नियोजन होते, सरासरी एकूण ७०.४३ टक्के पेरणी झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षकांनी दिली.जिल्ह्यात रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्रात यावेळी समाधानकारक पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे वेळेवर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणीची कामे आटोपली. कोरोना विषाणू संसर्गामुळे कापूस घरातच लॉकडाऊन होता. सीसीआयचे खरेदी केंद्रही उशिराने सुरू झाले. त्यातही कापूस गाड्या खरेदीची मर्यादा असल्याने खरिपाच्या तोंडावर कापूस घरातच होता. जवळ पै-पैसा नसताना उसनवारी आणि पीककर्ज काढून कपाशी, तूर, सोयाबीन आदीची शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, २०-२२ दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोवळ्या रोपांनी उष्णतामानामुळे माना टाकल्याचे चित्र आहे. तर पेरणीनंतर जिल्ह्यात अनेक भागात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, त्यांनी कसेबसे पीक जगविले. मात्र, सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत पावसाअभावी भर पडली आहे. जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या ७०.४३ टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. पावसाने दडी मारल्याने सर्वच शेतकºयांना दुबार-तिबार पेरणीला सामोरे लावे लागेल, अशी सद्यस्थिती आहे.पावसाच्या दडीने वाढविली शेतकऱ्यांची चिंतारोहिणी आणि मृग नक्षत्रात पाऊस झाल्यानंतर शेतकºयांनी पेरणी केली. मात्र, मागील २० ते २२ दिवसांपासून पावसाने डोळे वटारले आहेत.जुलै महिना उजाडूनही पावसाचा पत्ता नसून प्रखर ऊन आणि वातावरणात कमालीचा उकाडा आहे. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास तिबार पेरणी करावी लागेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचे धास्तावले आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती