शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
5
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
6
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
7
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
8
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
9
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
10
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
11
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
12
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
13
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
14
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
15
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
16
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
17
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती
18
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
19
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
20
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला

‘त्या’ नऊ सदस्यांच्या हाती सत्तेची किल्ली

By admin | Updated: September 20, 2014 23:54 IST

जिल्हा परिषदेच्या नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक होत आहे. यात नव्या अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आघाडीतील नऊ सदस्य आघाडीपासून अंतर ठेवून आहे.

आज नेत्यांची कसोटी : सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेची अध्यक्षपदी वर्णी लागणारवर्धा : जिल्हा परिषदेच्या नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी रविवारी निवडणूक होत आहे. यात नव्या अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आघाडीतील नऊ सदस्य आघाडीपासून अंतर ठेवून आहे. या सदस्यांच्याच हातात सत्तेची किल्ली असली तरी आघाडी सत्ता टिकविण्यात यश मिळविते वा भाजप पहिल्यांदा जिल्हा परिषदेवर भगवा फडकावते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.५१ सदस्य संख्या असून बहुमताकरिता २६ चा आकडा जुळवावा लागणार आहे. ही जुळवाजुळव करण्यासाठी आघाडीतील नेते प्रयत्नरत आहेत. मात्र काही तब्बल नऊ सदस्य अद्यापही संपर्कात नसल्यामुळे चांगलीच कोंडी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत काँग्रेस-१६, राष्ट्रवादी-८, अपक्ष-१ असे संख्याबळ असून शेतकरी संघटनेनेही वाटाघाटीनंतर आघाडीच्या मांडीला मांडी लावून लावून बसण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यामुळे पुन्हा एकदा आघाडीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नऊ सदस्य सहलीवर गेलेले असून ते आघाडीच्या संपर्कात नसल्याने बहुमत असूनही सत्ता स्थापनेत खोडा येण्याची शक्यता आहे.भाजप नेत्यांनी यंदा कोणत्याही परिस्थितीत जि.प.वर झेंडा फडकविण्याचा निर्धार केला आहेत. यासाठी पळवापळवीचे राजकारण सुरू झालेले आहेत. अशातच सहलीला गेलेले आघाडीतील नऊ जि.प. सदस्य भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. या सदस्यांनी भाजपशी हात मिळवणी केली असल्याचीही चर्चा आता सर्वसामान्य झाली आहे. ही मंडळी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास आघाडीला मोठा हादरा बसणार आहे. हिच संधी साधून भाजपने जि.प. वर आपला झेंडा फडकाविण्याची रणनिती आखली आहे. या राजकीय हालचालीमुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे. भाजपाच्या खेम्यात भाजप १८, शिवसेना-१, अपक्ष-४ चार असे संख्याबळ आहे. बहुमतासाठी पुन्हा तीन जागांची गरज आहे. मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही सदस्य गैरहजर भाजपचा अध्यक्ष होईल, असे गणित मांडले जात आहे. एकूणच ही निवडणूक भाजप आणि आघाडीतील सदस्यांना वाटते तितकी सोपी राहिलेली नाही. यात दोन्ही गटातील नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागलेली आहे. यात कोण बाजी मारतो, याचे रहस्य उलगडण्याकरिता काही तासांचाच अवधी शिल्लक आहे.(जिल्हा प्रतिनिधी)