शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

काटाेलच्या प्राध्यापकाची वर्धा नदीत आत्महत्या; २० तासानंतर १३ किमी अंतरावर सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 15:51 IST

अवघ्या काही दिवसांवर त्यांचा विवाह असून, त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्या केल्याने या मागाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

तळेगाव (श्याम.पंत) (वर्धा) : नागपूर-अमरावती महामार्गालगत कार उभी करून काटाेलच्या नबीरा महाविद्यालयाच्या प्राध्यापकाने वर्धा नदीपात्रात उडी घेतली होती. तब्बल वीस तासांनंतर घटनास्थळापासून १३ किलोमीटर अंतरावर निंबोली (शेंडे) येथे शुक्रवारी सायंकाळी मृतदेह आढळून आला. अवघ्या काही दिवसांवर त्यांचा विवाह असून, त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्या केल्याने या मागाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

प्रा. डॉ. विनोद बागवाले (५२, रा. यवतमाळ, ह.मु. काटाेल, जि. नागपूर) असे मृताचे नाव आहे. ते काटोल येथील नबीरा महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ते एमएच-४०/एआर-३०५२ क्रमांकाच्या कारने नागपूर-अमरावती महामार्गावरील खडका या गावाजवळ आले. त्यांनी महामार्गाच्या बाजूला कार उभी करून लगतच्या वर्धा नदीपात्रात उडी घेतली. हा प्रकार काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत याची माहिती तळेगाव (श्याम.पंत) पोलिसांना दिली. पोलिसांनी लागलीच विविध पथके तयार करून त्यांचा नदीपात्रात शोध घेतला. अखेर शुक्रवारी सायंकाळी घटनास्थळापासून १३ किलोमीटर अंतरावरील निंबोली (शेंडे) येथे त्यांचा मृतदेह आढळून आला.

कारण गुलदस्त्यात

डॉ. विनोद बागवाले यांचा अमरावती येथील मुलीशी विवाह ठरला होता. काही दिवसांवर हा विवाह सोहळा संपन्न होणार होता. परंतु त्यापूर्वीच आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत असून आत्महत्येचे खरे कारण गुलदस्त्यात आहे. याप्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून, पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये करीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूwardha-acवर्धा