शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अण्णाभाऊ साठेंच्या नावे कामगार भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:18 IST

औद्योगिक कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हक्काची जागा असणे गरजेचे आहे. रात्री कंपनीमधून जाण्यासाठी वाहन राहत नाही. यामुळे कामगारांना अडचणीला सामोरे जावे लागते. शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कामगार चळवळीत मोठे योगदान आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : कामगारांचा मेळावा

ऑनलाईन लोकमतदेवळी : औद्योगिक कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हक्काची जागा असणे गरजेचे आहे. रात्री कंपनीमधून जाण्यासाठी वाहन राहत नाही. यामुळे कामगारांना अडचणीला सामोरे जावे लागते. शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कामगार चळवळीत मोठे योगदान आहे. यामुळे औद्योगिक कामगारांना हक्काची जागा म्हणून शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने कामगार भवन बांधून देण्याची ग्वाही देतो. या भवनाची देखरेख व व्यवस्था दिलीप उटाणे यांनी घ्यावी, असे खा. रामदास तडस यांनी सांगितले.आयटक जनरल इन्डस्ट्रिज कामगार युनियनच्यावतीने ३१ जानेवारी रोजी आयटक जिल्हा संघटक असलम पठाण यांच्या अध्यक्षतेत देवळी औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी कामगार मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. उदघाटन खा. तडस यांच्या हस्ते महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.कामगारांच्या निवेदनावर खा. तडस म्हणाले की, कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आयटकने सुरू केलेला उपक्रम योग्य आहे. मी कामगारांच्या मागण्यांसोबत आहे, असे सांगितले.शहरात प्रथमच लालझेंडा संघटनेने कामगारांची विशाल मोटर सायकल रॅली काढली.आयटकचे राज्य सचिव उटाणे यांनी आयटक ही देशातील पहिली कामगार संघटना आहे. ३१ आॅक्टोबर १९२० रोजी मुंबईत लाला लजपत रॉय यांच्या अध्यक्षतेत स्थापन करण्यात आली. कामगार चळवळीचा मोठा इतिहास संघटनेला आहे. देवळी औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कंपन्या आहे. तेथील कामगारांच्या समस्या असून वेतन स्लीप मिळत नाही. इएसआयचे पैसे कापले जातात; पण कार्ड दिले जात नाही. पिएफचे पैसे वेतनातून कपात होतात; पण खात्यात वेळेवर भरले जात नाही. अनेक वर्षे होऊनही बोनस दिला जात नाही. सुरक्षेसाठी हेल्मेट, शुज गॉगल आदी साहित्य दिले जात नाही. कामगार कायद्याप्रमाणे सुविधा नाही, असे सांगितले. संविधानातील कामगार कायद्यात होणारे बदल, सरकारचे कामगार विरोधी धोरण आदी विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी मनोहर पचारे, वामन भेंडे, गौतम पोपटकर, किरण ठाकरे यांनी कामगारांच्या मागण्यांना पाठींबा दिला. मेळाव्यात महालक्ष्मी, गॅमन, व्हिल्स इंडिया, गृप्ता पॉवर आदी कंपन्यांतील कामगार सहभागी झाले होते. संचालन नाल्हे यांनी केले.एमआयडीसीतील कामगारांना आधारऔद्योगिक विकास महामंडळातील कंपन्यांमध्ये कार्यरत कामगारांच्या समस्या सोडविण्याकरिता अनेक संघटना पूढे आल्या; पण कामगारांचे प्रश्न सुटले नाहीत. आता आयटकने पुढाकार घेत कामगारांचे प्रश्न समजून घेण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले. यात लोकप्रतिनिधींनीही मार्गदर्शन केल्याने तथा मदतीची ग्वाही दिल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे. आयटकच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सुटावेत, अशी अपेक्षाही मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.