शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

अण्णाभाऊ साठेंच्या नावे कामगार भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:18 IST

औद्योगिक कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हक्काची जागा असणे गरजेचे आहे. रात्री कंपनीमधून जाण्यासाठी वाहन राहत नाही. यामुळे कामगारांना अडचणीला सामोरे जावे लागते. शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कामगार चळवळीत मोठे योगदान आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : कामगारांचा मेळावा

ऑनलाईन लोकमतदेवळी : औद्योगिक कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हक्काची जागा असणे गरजेचे आहे. रात्री कंपनीमधून जाण्यासाठी वाहन राहत नाही. यामुळे कामगारांना अडचणीला सामोरे जावे लागते. शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कामगार चळवळीत मोठे योगदान आहे. यामुळे औद्योगिक कामगारांना हक्काची जागा म्हणून शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने कामगार भवन बांधून देण्याची ग्वाही देतो. या भवनाची देखरेख व व्यवस्था दिलीप उटाणे यांनी घ्यावी, असे खा. रामदास तडस यांनी सांगितले.आयटक जनरल इन्डस्ट्रिज कामगार युनियनच्यावतीने ३१ जानेवारी रोजी आयटक जिल्हा संघटक असलम पठाण यांच्या अध्यक्षतेत देवळी औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी कामगार मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. उदघाटन खा. तडस यांच्या हस्ते महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.कामगारांच्या निवेदनावर खा. तडस म्हणाले की, कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आयटकने सुरू केलेला उपक्रम योग्य आहे. मी कामगारांच्या मागण्यांसोबत आहे, असे सांगितले.शहरात प्रथमच लालझेंडा संघटनेने कामगारांची विशाल मोटर सायकल रॅली काढली.आयटकचे राज्य सचिव उटाणे यांनी आयटक ही देशातील पहिली कामगार संघटना आहे. ३१ आॅक्टोबर १९२० रोजी मुंबईत लाला लजपत रॉय यांच्या अध्यक्षतेत स्थापन करण्यात आली. कामगार चळवळीचा मोठा इतिहास संघटनेला आहे. देवळी औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कंपन्या आहे. तेथील कामगारांच्या समस्या असून वेतन स्लीप मिळत नाही. इएसआयचे पैसे कापले जातात; पण कार्ड दिले जात नाही. पिएफचे पैसे वेतनातून कपात होतात; पण खात्यात वेळेवर भरले जात नाही. अनेक वर्षे होऊनही बोनस दिला जात नाही. सुरक्षेसाठी हेल्मेट, शुज गॉगल आदी साहित्य दिले जात नाही. कामगार कायद्याप्रमाणे सुविधा नाही, असे सांगितले. संविधानातील कामगार कायद्यात होणारे बदल, सरकारचे कामगार विरोधी धोरण आदी विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी मनोहर पचारे, वामन भेंडे, गौतम पोपटकर, किरण ठाकरे यांनी कामगारांच्या मागण्यांना पाठींबा दिला. मेळाव्यात महालक्ष्मी, गॅमन, व्हिल्स इंडिया, गृप्ता पॉवर आदी कंपन्यांतील कामगार सहभागी झाले होते. संचालन नाल्हे यांनी केले.एमआयडीसीतील कामगारांना आधारऔद्योगिक विकास महामंडळातील कंपन्यांमध्ये कार्यरत कामगारांच्या समस्या सोडविण्याकरिता अनेक संघटना पूढे आल्या; पण कामगारांचे प्रश्न सुटले नाहीत. आता आयटकने पुढाकार घेत कामगारांचे प्रश्न समजून घेण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले. यात लोकप्रतिनिधींनीही मार्गदर्शन केल्याने तथा मदतीची ग्वाही दिल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे. आयटकच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न सुटावेत, अशी अपेक्षाही मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.