शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्थळावरून मोजक्याच ‘रातराणी’

By admin | Updated: January 19, 2017 00:14 IST

जिल्ह्याचे स्थळ असल्याने वर्धा बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. येथून जिल्ह्यातील गाव-खेड्यात व जिल्ह्याबाहेर

रात्री १० नंतर उडते प्रवाशांची तारांबळ : वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज महेश सायखेडे  वर्धा जिल्ह्याचे स्थळ असल्याने वर्धा बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. येथून जिल्ह्यातील गाव-खेड्यात व जिल्ह्याबाहेर नियोजित ठिकाणी जाण्यासाठी नागरिक येथून बसमध्ये चढतात. परिणामी, दिवसभर येथे प्रवाशांसह विद्यार्थ्यांची चांगलीच रेलचेल असते. जिल्ह्याच्या स्थळावरून बोटावर मोजण्या इतक्याच रातराणी बसेस सोडल्या जात असून रात्री १० नंतर अनेक ठिकाणी जाण्यासाठी बसेसच उपलब्ध नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडते. सदर प्रकाराकडे लक्ष देत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाही करणे गरजेचे आहे. रापमच्यावतीने प्रवाशांच्या सुविधेसाठी विविध योजना राबविल्या जात असल्या तरी जिल्ह्यात अनेक भंगार बसेसच धावतात. यामुळे रापमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी कागदोपत्री हाकाटीच राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने नेहमी केली जात असल्याची ओरड प्रवाशांतून होत आहे. रात्रीच्या सुमारास जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा देणे क्रमप्राप्त असताना बोटावर मोजण्या इतक्याच रातराणी धावतात. परिणामी, रात्री १० नंतर प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडते. नागपूरकडे जाण्यासाठी पंढपूर-नागपूर, सोलापूर-नागपूर, लातुर-नागपूर, बुलढाणा-नागपूर, नांदेड-नागपूर, परळी-नागपूर या सहा रातराणी बसेस वेगवेगळ्या वेळेत वर्धा बस स्थानकावरून प्रवाशांच्या सेवेसाठी सोडल्या जातात; पण वर्धा बसस्थानकावरून इतर ठिकाणी जाण्यासाठी रात्री १० नंतर रातराणी बसेस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे रापमचेही नुकसान होते. रात्री उशारापर्यंत बसेसच नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे रापमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे. यवतमाळची रात्री १२ नंतर बसच नाही नागपूर आगाराकडून प्रवाशांच्या सेवेसाठी नागपूर-पंढरपूर ही बस कार्यरत आहे. सदर बस वर्धा बस स्थानकावर मध्यरात्री १२.०५ वाजाताच्या सुमारास येते. या बसनंतर यवतमाळकडे जाण्यासाठी थेट सकाळी ६ वाजता नागपूर-उमरखेड ही बसफेरी आहे. नागपूर-पंढरपूर बसनंतर दिवस उजाडेपर्यंत कुठलीच बस वर्धा बसस्थानकातून यवतमाळच्या दिशेने धावत नसल्याने प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकदा तर प्रवाशांना बसस्थानकावरच रात्र घालवावी लागते. अमरावतीसाठी सुटते ८.३० वाजता शेवटची लालपरी वर्धा बसस्थानक येथून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे; पण रात्री ८.३० वाजताच्या अहेरी-अमरावती या बसनंतर कुठलीही बस वर्धा बस स्थानकातून अमरावतीसाठी सुटत नाही. परिणामी, अनेक प्रवाशांना रेल्वे वा खासगी बसचा प्रवास करून आपले नियोजित स्थळ गाठावे लागत आहे. प्रवाशांची समस्या लक्षात घेता या मार्गावर रात्री उशीरापर्यंत बससेवा देण्याची मागणी आहे.