शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हास्थळावरून मोजक्याच ‘रातराणी’

By admin | Updated: January 19, 2017 00:14 IST

जिल्ह्याचे स्थळ असल्याने वर्धा बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. येथून जिल्ह्यातील गाव-खेड्यात व जिल्ह्याबाहेर

रात्री १० नंतर उडते प्रवाशांची तारांबळ : वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज महेश सायखेडे  वर्धा जिल्ह्याचे स्थळ असल्याने वर्धा बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी असते. येथून जिल्ह्यातील गाव-खेड्यात व जिल्ह्याबाहेर नियोजित ठिकाणी जाण्यासाठी नागरिक येथून बसमध्ये चढतात. परिणामी, दिवसभर येथे प्रवाशांसह विद्यार्थ्यांची चांगलीच रेलचेल असते. जिल्ह्याच्या स्थळावरून बोटावर मोजण्या इतक्याच रातराणी बसेस सोडल्या जात असून रात्री १० नंतर अनेक ठिकाणी जाण्यासाठी बसेसच उपलब्ध नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडते. सदर प्रकाराकडे लक्ष देत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाही करणे गरजेचे आहे. रापमच्यावतीने प्रवाशांच्या सुविधेसाठी विविध योजना राबविल्या जात असल्या तरी जिल्ह्यात अनेक भंगार बसेसच धावतात. यामुळे रापमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ अशी कागदोपत्री हाकाटीच राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने नेहमी केली जात असल्याची ओरड प्रवाशांतून होत आहे. रात्रीच्या सुमारास जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांना सुविधा देणे क्रमप्राप्त असताना बोटावर मोजण्या इतक्याच रातराणी धावतात. परिणामी, रात्री १० नंतर प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडते. नागपूरकडे जाण्यासाठी पंढपूर-नागपूर, सोलापूर-नागपूर, लातुर-नागपूर, बुलढाणा-नागपूर, नांदेड-नागपूर, परळी-नागपूर या सहा रातराणी बसेस वेगवेगळ्या वेळेत वर्धा बस स्थानकावरून प्रवाशांच्या सेवेसाठी सोडल्या जातात; पण वर्धा बसस्थानकावरून इतर ठिकाणी जाण्यासाठी रात्री १० नंतर रातराणी बसेस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे रापमचेही नुकसान होते. रात्री उशारापर्यंत बसेसच नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे रापमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे. यवतमाळची रात्री १२ नंतर बसच नाही नागपूर आगाराकडून प्रवाशांच्या सेवेसाठी नागपूर-पंढरपूर ही बस कार्यरत आहे. सदर बस वर्धा बस स्थानकावर मध्यरात्री १२.०५ वाजाताच्या सुमारास येते. या बसनंतर यवतमाळकडे जाण्यासाठी थेट सकाळी ६ वाजता नागपूर-उमरखेड ही बसफेरी आहे. नागपूर-पंढरपूर बसनंतर दिवस उजाडेपर्यंत कुठलीच बस वर्धा बसस्थानकातून यवतमाळच्या दिशेने धावत नसल्याने प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकदा तर प्रवाशांना बसस्थानकावरच रात्र घालवावी लागते. अमरावतीसाठी सुटते ८.३० वाजता शेवटची लालपरी वर्धा बसस्थानक येथून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे; पण रात्री ८.३० वाजताच्या अहेरी-अमरावती या बसनंतर कुठलीही बस वर्धा बस स्थानकातून अमरावतीसाठी सुटत नाही. परिणामी, अनेक प्रवाशांना रेल्वे वा खासगी बसचा प्रवास करून आपले नियोजित स्थळ गाठावे लागत आहे. प्रवाशांची समस्या लक्षात घेता या मार्गावर रात्री उशीरापर्यंत बससेवा देण्याची मागणी आहे.