शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

जरा हटके! क्षणार्धात जुळल्या ऋृणानुबंधाच्या गाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 21:19 IST

मुलाकडील मंडळी वर्ध्यातील मुलीच्या पाहणीकरिता आले अन् विवाह करून घेऊन गेले. एकाच दिवसात दोन परिवारातील ऋणानुबंध दृढ झाल्याने हा विवाह आदर्शच ठरला आहे.

ठळक मुद्देउच्चशिक्षितांचा आदर्श विवाह पहायला आले आणि विवाह करूनच गेले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आई-वडिलांचे छत्र हरविल्यानंतर बहिणींचा सांभाळ करण्याची जबाबदारी भावावर येऊन पडली. मोठ्या बहिणीचा विवाह झाल्यानंतर धाकट्या बहिणीच्या विवाहाची चिंता होती. पण, अशातच मुलाचा निरोप आला आणि पाहणीची तारीखही ठरली. मुलीच्या भावाने परिवारातील वडीलधाऱ्या माणसांसह नातेवाईकांना कळविले. ठरल्या दिवशी मुलाकडील मंडळी मुलीच्या पाहणीकरिता आले अन् विवाह करून घेऊन गेले. एकाच दिवसात दोन परिवारातील ऋणानुबंध दृढ झाल्याने हा विवाह आदर्शच ठरला आहे.सर्वांच्या सहमतीने विवाह करायचा म्हटला तर वेळ आणि पैशाची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होते. इच्छित वर-वधूचा शोध घेण्यातच मोठा कालावधी लोटतो. त्यानंतरही विवाह जुळल्यानंतर इतर सोपस्कार पार पाडण्यासाठी परिवाराची मोठी कसोटी लागते. विवाह करण्यासाठीही खिसा चांगलाच रिता करावा लागतो. या साऱ्या गोष्टींचा विचार करून वर्ध्यातील शिंपी समाजातील नानोटे व अकोला येथील बानाईत परिवाराने या साऱ्या गोष्टीला फाटा देत पाहणी, साक्षगंध, हळद आणि विवाह एकाच दिवशी उरकविला. वर्ध्यातील शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष अविनाश नानोटे यांची पुतणी व स्व. संतोषराव नानोटे यांची कन्या रोशनी हिचा विवाह अकोला येथील नंदकिशोर बानाईत यांचा मुलगा आशिषसोबत झाला. रोशनी आणि आशिष हे दोघेही उच्चशिक्षित असून लग्नावर होणारा अवास्तव खर्च, त्यात जाणारा वेळ या सर्व गोष्टींचा विचार करुन दोघांनीही पहिल्याच भेटीत हा निर्णय घेत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

तास-दोन तासात झाल्या घडामोडीसध्याच्या युगात मुलाला योग्य मुलगी मिळत नाही तर मुलीला योग्य मुलगा मिळत नाही, अशी ओरड आहे. त्यातही मुलांना मुली मिळणे कठीण झाल्याने ‘तुम्ही फक्त मुलगी द्या, आम्ही दोन्ही बाजूचा खर्च करतो’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी मुलांकडून मुलीला हुंडा दिल्याचेही ऐकिवात आहे. अशा स्थितीत जास्त वेळ व पैसा खर्च न करता आशिषने घेतलेल्या निर्णयाला रोशनीनेही होकार दिला. दोघांचीही सहमती मिळताच लगेच लग्नाचा पुरावा म्हणून तासाभरात पत्रिका छापल्या. उपस्थित नातेवाईकांच्या साक्षीने शुभमंगलही उरकवून टाकले. तास-दोन तासातच साऱ्या घडामोडी होऊन पाहणीकरिता आलेली मंडळी सायंकाळी सहा वाजता वरात घेऊनच अकोल्याकडे निघाली.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके