शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

निवडणूक जाहीर होताच राजकारण्यांची धावपळ

By admin | Updated: October 2, 2015 06:49 IST

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नवनिर्मित नगर पंचायती, नगर परिषदेच्या निवडणुका व काही पोटनिवडणुकांचा

सेलू : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नवनिर्मित नगर पंचायती, नगर परिषदेच्या निवडणुका व काही पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकारण्यांच्या धावपळीला वेग आल्याचे सध्या दिसून येत आहे. १ नोव्हेंबरला मतदान होणार असल्याने राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. नगर पंचायतीच्या पहिला प्रमुखाचा मान कुणाला मिळणार, यासाठीही चढाओढ सुरू झाल्याचे दिसते.सेलू ग्रामपंचायत असताना जयस्वाल गटाची सत्ता होती. हा गट काँग्रेसशी जुळलेला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचा स्थानिक जयस्वाल गट आणि शेखर शेंडे यांच्या गटाने वैर मिटवून एकत्र येत माजी आमदार सुरेश देशमुख यांच्याशी युती करून त्रिकुट तयार केले. यात भाजपाला सरळ लढत देत त्यांना एकही जागा मिळू दिली नाही. यानंतर झालेल्या सभापती-उपसभापती पदाच्या निवडणुकीत जयस्वाल गट वगळला गेला होता. नगरपंचायतीमध्ये जयस्वाल गटाविरूद्ध भाजपा, शिवसेना आणि अपक्ष, असे अनेकजण लढणार आहे. यामुळे ही निवडणूक कुणालाही सोपी राहणार नाही. ऐन वेळेपर्यंत नेमकी काय स्थिती निर्माण होते, यावर सर्वांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. यासाठी सर्वच कंबर कसणार असल्याचे दिसते.(तालुका प्रतिनिधी)नगर पंचायत रचनेमध्ये १७ वॉर्ड व तेवढेच सदस्यभाजप, शिवसेना, जयस्वाल व शेखर शेंडे गट आणि काही अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात राहणार आहेत. नगरपंचायत रचनेमध्ये १७ वॉर्ड आणि १७ सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. यामुळे कुणाची किती राजकीय ताकद आहे, हे या निवडणुकीत सिद्ध होणार आहे. ग्रामपंचायत असताना सहा वॉर्ड आणि एका वॉर्डातून तीन उमेदवार निवडून द्यावयाचे होते. यात गटनिहाय फायदा होत होता. उमेदवारांना गटनिहाय निवडून येणेही सोपे होते; पण आता एक वॉर्ड एक सदस्य असल्याने खरी लढत होणार आहे. सत्तारूढ जयस्वाल गटाविरूद्ध सर्वच स्थानिक गट एकत्र येऊन पाच वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणूक लढले होते. त्यावेळी १७ पैकी १३ सदस्य जयस्वाल गटाचे निवडून आले होते. आता नगर पंचायतीच्या निवडणुकीत कोणती खेळी खेळली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. राजकीय उलथापालथीमुळे दूरगामी परिणामबाजार समितीच्या निवडणुकीत झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे नगरपंचायत निवडणुकीवर दूरगामी परिणाम होणार आहे. शिवाय उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत. आता काँग्रेसच्या गटाची पुन्हा पूर्वीप्रमाणे विभागणी झाल्याने जयस्वाल विरूद्ध शेंडे गट, अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.