शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’ ठरले ‘उपयुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:52 IST

मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आला. या अभियानात पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत मोठ्या प्रमाणात पैसाही जिरला. असे असले तरी वर्धेत या अभियानातून लाभच झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देपाण्याच्या पातळीत वाढ : सिंचनाचा लाभ, नव्या वर्षात १३८ गावांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आला. या अभियानात पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत मोठ्या प्रमाणात पैसाही जिरला. असे असले तरी वर्धेत या अभियानातून लाभच झाल्याचे समोर आले आहे. यामुळेच वर्धेत जलयुक्त चांगलेच उपयुक्त ठरल्याचे बोलले जात आहे.या अभियानातून मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे नाले, नदी खोलीकरणासह आदी कामे हातात घेऊन ती प्रभावीपणे केली गेल्याने जिल्ह्यातील भूगर्भातील पाणी पातळीत सुमारे दीड मिटरने वाढल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्याचा शेतकºयांसह नागरिकांना फायदा होत असून सिंचनाच्या क्षेत्रातही वाढ झाल्याचे दिसत आहे.पाण्याची वाढती समस्या लक्षात घेवून ५ डिसेंबर २०१४ पासून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात जलयुक्त शिवार योजना राबविण्याचे निश्चित झाले. त्यासाठी कृषी विभाग, वन विभाग, लघु सिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा आदींचा ताळमेळ जुळवत नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला. यात काही जलतज्ज्ञांचेही मार्गदर्शन घेण्यात आले.सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून करण्यात आली. जिल्ह्यात प्रथम वर्षाला २१४ गावांची निवड करून पावसाचे पाणी ठिकठिकाणी कसे अडविता येईल व त्याचे संवर्धन कसे करता येईल यादृष्टीने एकूण ३ हजार ३०० कामे करण्यात आली. त्यावर ७२.३१ कोटींचा निधी खर्च करण्यात आला. तर सन २०१६-१७ मध्ये २१२ गावांची निवड करून ६६.८१ कोटींचा निधी खर्च करून २ हजार २४४ कामे पूर्णत्वास आली. दोन वर्ष सतत ढाळीचे बांधबंदिस्ती, सलग समतल चर, सिमेंट नाला बांधणे, नाला खोली करण, नदी पात्रांचे खोलीकरण, गावतलावांची दुरूती तसेच खोलीकरण आदी कामे करून न थांबता यंदाच्या वर्षी १३८ गावांची निवड करीत ६७ कामे हाती घेण्यात आली. त्या कामांवर २.४ कोटींचा खर्च होणार असून बहूतांश कामे पूर्णत्वास नेण्यात आली आहे. तर जी कामे अर्धवट स्थितीत आहेत ती पूर्णत्वास नेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.९७ हजार हेक्टरला संरक्षित सिंचनजलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जिल्ह्यात ९७ हजार ५८५ हेक्टरला संरक्षित सिंचनाचा लाभ मिळाला आहे. या कामांमुळे ४८ हजार ३७५ दश हजार घनमिटर पाणी साठविण्यास मदत झाली.राज्यात दोन मॉडेल राबविणारजिल्ह्यातील दोन मॉडेल राज्य सरकारने जलसंवर्धनाच्या हेतूने उपयुक्त असल्याने ते राज्यभºयात राबविण्याचे निश्चित केले आहे. हे दोन्ही मॉडेल कसे उपयुक्त आहेत त्याबाबतची माहिती जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी राज्य सरकारला वेळोवेळी दिली आहे. सदर मॉडेलला केंद्रस्थानी ठेऊन राज्यभºयात कामे होणार असल्याने वर्धा जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा नाविण्यपूर्ण कार्याबद्दल राज्यभरात पोहोचले आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार