शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’ ठरले ‘उपयुक्त’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:52 IST

मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आला. या अभियानात पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत मोठ्या प्रमाणात पैसाही जिरला. असे असले तरी वर्धेत या अभियानातून लाभच झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देपाण्याच्या पातळीत वाढ : सिंचनाचा लाभ, नव्या वर्षात १३८ गावांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आला. या अभियानात पाणी अडवा पाणी जिरवा म्हणत मोठ्या प्रमाणात पैसाही जिरला. असे असले तरी वर्धेत या अभियानातून लाभच झाल्याचे समोर आले आहे. यामुळेच वर्धेत जलयुक्त चांगलेच उपयुक्त ठरल्याचे बोलले जात आहे.या अभियानातून मोठ्या प्रमाणात छोटे-मोठे नाले, नदी खोलीकरणासह आदी कामे हातात घेऊन ती प्रभावीपणे केली गेल्याने जिल्ह्यातील भूगर्भातील पाणी पातळीत सुमारे दीड मिटरने वाढल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्याचा शेतकºयांसह नागरिकांना फायदा होत असून सिंचनाच्या क्षेत्रातही वाढ झाल्याचे दिसत आहे.पाण्याची वाढती समस्या लक्षात घेवून ५ डिसेंबर २०१४ पासून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात जलयुक्त शिवार योजना राबविण्याचे निश्चित झाले. त्यासाठी कृषी विभाग, वन विभाग, लघु सिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा आदींचा ताळमेळ जुळवत नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला. यात काही जलतज्ज्ञांचेही मार्गदर्शन घेण्यात आले.सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून करण्यात आली. जिल्ह्यात प्रथम वर्षाला २१४ गावांची निवड करून पावसाचे पाणी ठिकठिकाणी कसे अडविता येईल व त्याचे संवर्धन कसे करता येईल यादृष्टीने एकूण ३ हजार ३०० कामे करण्यात आली. त्यावर ७२.३१ कोटींचा निधी खर्च करण्यात आला. तर सन २०१६-१७ मध्ये २१२ गावांची निवड करून ६६.८१ कोटींचा निधी खर्च करून २ हजार २४४ कामे पूर्णत्वास आली. दोन वर्ष सतत ढाळीचे बांधबंदिस्ती, सलग समतल चर, सिमेंट नाला बांधणे, नाला खोली करण, नदी पात्रांचे खोलीकरण, गावतलावांची दुरूती तसेच खोलीकरण आदी कामे करून न थांबता यंदाच्या वर्षी १३८ गावांची निवड करीत ६७ कामे हाती घेण्यात आली. त्या कामांवर २.४ कोटींचा खर्च होणार असून बहूतांश कामे पूर्णत्वास नेण्यात आली आहे. तर जी कामे अर्धवट स्थितीत आहेत ती पूर्णत्वास नेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.९७ हजार हेक्टरला संरक्षित सिंचनजलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जिल्ह्यात ९७ हजार ५८५ हेक्टरला संरक्षित सिंचनाचा लाभ मिळाला आहे. या कामांमुळे ४८ हजार ३७५ दश हजार घनमिटर पाणी साठविण्यास मदत झाली.राज्यात दोन मॉडेल राबविणारजिल्ह्यातील दोन मॉडेल राज्य सरकारने जलसंवर्धनाच्या हेतूने उपयुक्त असल्याने ते राज्यभºयात राबविण्याचे निश्चित केले आहे. हे दोन्ही मॉडेल कसे उपयुक्त आहेत त्याबाबतची माहिती जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी राज्य सरकारला वेळोवेळी दिली आहे. सदर मॉडेलला केंद्रस्थानी ठेऊन राज्यभºयात कामे होणार असल्याने वर्धा जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा नाविण्यपूर्ण कार्याबद्दल राज्यभरात पोहोचले आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार