शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

पदोन्नतीसाठी साझ्यांचे काम ठप्प

By admin | Updated: February 4, 2015 23:20 IST

जिल्ह्यात तलाठी साझे अधिक आणि तलाठी कमी, अशी स्थिती आहे़ यामुळे एका तलाठ्याला दोन साझ्यांचा कार्यभार सांभाळावा लागतो़ जिल्ह्यात २९१ तलाठ्यांची पदे मंजूर असून २८२ तलाठी

वर्धा : जिल्ह्यात तलाठी साझे अधिक आणि तलाठी कमी, अशी स्थिती आहे़ यामुळे एका तलाठ्याला दोन साझ्यांचा कार्यभार सांभाळावा लागतो़ जिल्ह्यात २९१ तलाठ्यांची पदे मंजूर असून २८२ तलाठी कार्यरत आहे़ यातही तलाठ्यांनी पदोन्नतीची मागणी करीत साझ्यांचेच काम बंद करण्याचा इशारा दिला़ यामुळे प्रशासनाची गोची झाली आहे़ जिल्ह्यात २९१ तलाठ्यांची पदे मंजूर असून वर्धा तालुक्यात ४१ पदे आहेत़ एकूण ९ पदे रिक्त असून वर्धा तालुक्यातीलच चार पदे रिक्त आहेत़ शिवाय अन्य तालुक्यातीलही पदे रिक्त असल्याने ग्रामस्थांना आपल्या कामांसाठी भटकंती करावी लागते़ सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे़ या समस्यांशी दोन हात करण्याकरिता शेतकऱ्यांना शासनाने थोडाफार मदतीचा हात दिला आहे़ यातील माहिती तलाठ्याकडे असून तेच नसल्याने शेतकरी हतबल आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)तलाठ्यांचे अतिरिक्त साझ्यांचे काम बंद; शेतकरी त्रस्तकारंजा (घाडगे) - तलाठ्यांनी अतिरिक्त साझ्याचे काम बंद केल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे़ तालुक्यातील पाच तलाठी साझे सध्या तलाठ्याविना आहेत़ याकडे तहसील कार्यालयासह जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे़ पाच तलाठी साझ्यांची तलाठी पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत़ शिवाय कोतवाल मंडळ अधिकारी ही पदेही रिक्त आहेत़ जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़कारंजा तालुक्यातील पाच तलाठी साझ्यांमध्ये धर्ती, बोटोणा, चंदेवाणी, पांजरागोंडी, हेटीकुंडीचा समावेश आहे़ या साझ्यांतील तलाठी पदे रिक्त आहेत़ या साझ्यांचा अतिरिक्त कार्यभार ज्या तलाठ्यांकडे देण्यात आला होता, त्यांनी अतिरिक्त साझ्यांचे काम करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे़ विदर्भ पटवारी संघाच्यावतीने वारंवार लेखी निवेदने देऊनही आणि विनंती करूनही तलाठ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्यानेही तलाठ्यांनी हा निर्णय घेतला आहे़