शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

पदोन्नतीसाठी साझ्यांचे काम ठप्प

By admin | Updated: February 4, 2015 23:20 IST

जिल्ह्यात तलाठी साझे अधिक आणि तलाठी कमी, अशी स्थिती आहे़ यामुळे एका तलाठ्याला दोन साझ्यांचा कार्यभार सांभाळावा लागतो़ जिल्ह्यात २९१ तलाठ्यांची पदे मंजूर असून २८२ तलाठी

वर्धा : जिल्ह्यात तलाठी साझे अधिक आणि तलाठी कमी, अशी स्थिती आहे़ यामुळे एका तलाठ्याला दोन साझ्यांचा कार्यभार सांभाळावा लागतो़ जिल्ह्यात २९१ तलाठ्यांची पदे मंजूर असून २८२ तलाठी कार्यरत आहे़ यातही तलाठ्यांनी पदोन्नतीची मागणी करीत साझ्यांचेच काम बंद करण्याचा इशारा दिला़ यामुळे प्रशासनाची गोची झाली आहे़ जिल्ह्यात २९१ तलाठ्यांची पदे मंजूर असून वर्धा तालुक्यात ४१ पदे आहेत़ एकूण ९ पदे रिक्त असून वर्धा तालुक्यातीलच चार पदे रिक्त आहेत़ शिवाय अन्य तालुक्यातीलही पदे रिक्त असल्याने ग्रामस्थांना आपल्या कामांसाठी भटकंती करावी लागते़ सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे़ या समस्यांशी दोन हात करण्याकरिता शेतकऱ्यांना शासनाने थोडाफार मदतीचा हात दिला आहे़ यातील माहिती तलाठ्याकडे असून तेच नसल्याने शेतकरी हतबल आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)तलाठ्यांचे अतिरिक्त साझ्यांचे काम बंद; शेतकरी त्रस्तकारंजा (घाडगे) - तलाठ्यांनी अतिरिक्त साझ्याचे काम बंद केल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे़ तालुक्यातील पाच तलाठी साझे सध्या तलाठ्याविना आहेत़ याकडे तहसील कार्यालयासह जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे़ पाच तलाठी साझ्यांची तलाठी पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत़ शिवाय कोतवाल मंडळ अधिकारी ही पदेही रिक्त आहेत़ जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़कारंजा तालुक्यातील पाच तलाठी साझ्यांमध्ये धर्ती, बोटोणा, चंदेवाणी, पांजरागोंडी, हेटीकुंडीचा समावेश आहे़ या साझ्यांतील तलाठी पदे रिक्त आहेत़ या साझ्यांचा अतिरिक्त कार्यभार ज्या तलाठ्यांकडे देण्यात आला होता, त्यांनी अतिरिक्त साझ्यांचे काम करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे़ विदर्भ पटवारी संघाच्यावतीने वारंवार लेखी निवेदने देऊनही आणि विनंती करूनही तलाठ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्यानेही तलाठ्यांनी हा निर्णय घेतला आहे़