शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
3
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
6
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
7
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
8
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
9
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
10
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
11
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
12
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
13
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
14
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
15
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
16
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
17
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
18
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
19
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
20
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद

पदोन्नतीसाठी साझ्यांचे काम ठप्प

By admin | Updated: February 4, 2015 23:20 IST

जिल्ह्यात तलाठी साझे अधिक आणि तलाठी कमी, अशी स्थिती आहे़ यामुळे एका तलाठ्याला दोन साझ्यांचा कार्यभार सांभाळावा लागतो़ जिल्ह्यात २९१ तलाठ्यांची पदे मंजूर असून २८२ तलाठी

वर्धा : जिल्ह्यात तलाठी साझे अधिक आणि तलाठी कमी, अशी स्थिती आहे़ यामुळे एका तलाठ्याला दोन साझ्यांचा कार्यभार सांभाळावा लागतो़ जिल्ह्यात २९१ तलाठ्यांची पदे मंजूर असून २८२ तलाठी कार्यरत आहे़ यातही तलाठ्यांनी पदोन्नतीची मागणी करीत साझ्यांचेच काम बंद करण्याचा इशारा दिला़ यामुळे प्रशासनाची गोची झाली आहे़ जिल्ह्यात २९१ तलाठ्यांची पदे मंजूर असून वर्धा तालुक्यात ४१ पदे आहेत़ एकूण ९ पदे रिक्त असून वर्धा तालुक्यातीलच चार पदे रिक्त आहेत़ शिवाय अन्य तालुक्यातीलही पदे रिक्त असल्याने ग्रामस्थांना आपल्या कामांसाठी भटकंती करावी लागते़ सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे़ या समस्यांशी दोन हात करण्याकरिता शेतकऱ्यांना शासनाने थोडाफार मदतीचा हात दिला आहे़ यातील माहिती तलाठ्याकडे असून तेच नसल्याने शेतकरी हतबल आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे़(कार्यालय प्रतिनिधी)तलाठ्यांचे अतिरिक्त साझ्यांचे काम बंद; शेतकरी त्रस्तकारंजा (घाडगे) - तलाठ्यांनी अतिरिक्त साझ्याचे काम बंद केल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे़ तालुक्यातील पाच तलाठी साझे सध्या तलाठ्याविना आहेत़ याकडे तहसील कार्यालयासह जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची ओरड होत आहे़ पाच तलाठी साझ्यांची तलाठी पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत़ शिवाय कोतवाल मंडळ अधिकारी ही पदेही रिक्त आहेत़ जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़कारंजा तालुक्यातील पाच तलाठी साझ्यांमध्ये धर्ती, बोटोणा, चंदेवाणी, पांजरागोंडी, हेटीकुंडीचा समावेश आहे़ या साझ्यांतील तलाठी पदे रिक्त आहेत़ या साझ्यांचा अतिरिक्त कार्यभार ज्या तलाठ्यांकडे देण्यात आला होता, त्यांनी अतिरिक्त साझ्यांचे काम करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे़ विदर्भ पटवारी संघाच्यावतीने वारंवार लेखी निवेदने देऊनही आणि विनंती करूनही तलाठ्यांच्या मागण्यांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्यानेही तलाठ्यांनी हा निर्णय घेतला आहे़