शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

जांभुळ आरोग्यासाठी पोषकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:31 IST

पावसाळ्यात विदर्भात अनेक शहरात व गावात विक्रीसाठी येणारी जांभुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी जांभळाचे सेवन करायलाच हवे.

ठळक मुद्देपावसाळ्यात भरपूर खा : आजार पळविण्यासाठी बहुगुणी फळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळ्यात विदर्भात अनेक शहरात व गावात विक्रीसाठी येणारी जांभुळे मानवी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांनी जांभळाचे सेवन करायलाच हवे. असा अभ्यासकांचा दावा आहे. विदर्भात विक्रीला येणारे जांभूळ हे गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातून येतात. याची अनेकांना माहिती नाही. कोरची तालुक्यातील जांभुळे दर्जेदार आहेत. नागपूरसह राज्याच्या कानाकोपऱ्यात ते विक्रीसाठी पाठविले जातात. व नागपूरवरून वर्धा, यवतमाळ आदी भागात ते पुरवठा केले जातात.चार जातीच्या जांभळाचे होते उत्पन्नकोकण बहाडोली, गोकाक जातीच्या तीन प्रजातीत जांभळाचे उत्पन्न होते. जांभुळ औषधी गुणधर्माची असून यांचा उत्पन्न निसर्गाच्या वातावरणात जंगलात होत असल्याने यामध्ये कुठल्याही प्रकारची रासायनिक मूलद्रव्य जात नाहीत. त्यामुळे या कोरचीच्या जांभुळाला विशेष महत्त्व आहे.जांभुळ उपचारजांभुळ फळापासून मधुमेह, अंथरून ओले करणे, रक्ती हगवण, जुलाब, दात आणि हिरड्या दुखी, जंत, घसा त्रास, मुळव्याध, ऊलटी, फुफ्फुस, मूतखडा, जखम, पांढरे जळालेले डाग, कीडा चावल्यावर आदी आजारांवर उपचार करता येतो.या आजारांवर जांभुळ रामबाण औषधजांभुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. रक्ताच्या शुद्धीकरणासाठी, पांडुरोग, कावीळ आदी विकारांवर जांभुळ उपयुक्त आहे.जांभुळाची साल पाचक व जंतुनाशक असते. या सालीचा उकाळा करून प्यायला असता अतिसार व मुरड्यावर उपयोग होतो.जांभुळामुळे पित्त कमी होते. उलटीवाटे पित्त निधून जाण्यासाठी जांभळाच्या ताज्या सालीचा रस दुधातून घ्यावा.पित्तामुळे उलटी होत असल्यास जांभळाची दोन-तीन पाने पाण्यातून उकळून व गाळून घ्यावी. मधासोबत ते प्यायल्याने पित्तशमन होते.पिकलेली जांभुळे खाल्ल्याने पित्तामुळे होणारे जुलाबही बंद होतात.हातापायांची जळजळ होत असल्यास जांभळाचा रस लावावा, त्यामुळे रक्त थांबते.जांभुळाची बी पाण्यात उगाळून घामोळ््यावर लावले असता घामोळे कमी होते.जांभुळाच्या सालीची राख मधातून दिल्याने आंबट उलट्या होण्याचे थांबते.जांभळाच्या सालीचा काढा करून त्याच्या गुळण्या केल्या असता हिरड्यांची सूज कमी होते.

जांभुळ वृक्षाचा उपयोगजांभुळ वृक्षाचे लाकुड मजबुत आणि पाणी रोधक आहे, कृषी अवजारे, बैलगाडी चाके, घरकाम आदीकरीता लाकडाचा उपयोग होतो. पाण्याच्या संपर्कात येणाऱ्या ठिकाणी जसे डिझेलपंपाच्या खाली, विहिरीमध्ये पाट्या वापरतात, प्रक्रियायुक्त पदार्थ- जॅम, जेली, चिप्स, वाईन, विनेगार, स्क्वॅश, लोणचे आदी, रेल्वे गाड्यांमध्ये आसने तयार करण्याकरीता, इंधन आणि कोळसा निर्मितीकरीता, पानांच्या उपयोग दंतमंजन तयार करण्याकरीता, पशुखाद्याकरीता, टसर अळ््यांचे अन्न, तेलाचा उपयोग साबण आणि अत्तर करीता, औषधी निर्मितीकरीता, कापड उद्योगामध्ये रंगकाम आणि कातण्याकरीता जांभुळ मध्य-मधमाशी पालन यात वृक्षाचा उपयोग होतो.