शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

जेष्ठ गांधीवादी, सर्वोदयी व सेवाग्राम आश्रमचे माजी अध्यक्ष जयवंत मठकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 13:05 IST

गांधी विनोबा आणि जयप्रकाश यांची विचार सरणी आणि सर्वोदयाचा विचार घेऊन आयुष्यभर त्यांनी काम केलेले आहे. साने गुरूजी कथामाला,राष्ट्रसेवा दल,सर्व सेवा संघ,सर्वोदय मंडळ,खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघ, महात्मा गांधी लोकसेवा संघ, महाराष्ट्र सेवा संघ, महाराष्ट्र ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष,सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान इ.संस्थेत त्यांनी विविध पदांवर कार्य केले आहे.

सेवाग्राम (वर्धा) :    गांधी विनोबा जयप्रकाश  यांच्या विचारांचे पाईक असलेले सर्वोदयी आणि विविध संस्थांच्या माध्यमातून भारतभर सतत कार्यरत असणारे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान चे माजी अध्यक्ष जयवंत गंगाराम मठकर यांचे पुण्यात सोमवारला निधन झाले.ते ८५  वर्षाचे होते.ते गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते.

    गांधी विनोबा आणि जयप्रकाश यांची विचार सरणी आणि सर्वोदयाचा विचार घेऊन आयुष्यभर त्यांनी काम केलेले आहे. साने गुरूजी कथामाला,राष्ट्रसेवा दल,सर्व सेवा संघ,सर्वोदय मंडळ,खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघ, महात्मा गांधी लोकसेवा संघ, महाराष्ट्र सेवा संघ, महाराष्ट्र ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष,सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान इ.संस्थेत त्यांनी विविध पदांवर कार्य केले आहे.जयवंत मठकर हे मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मठ या गावचे.त्यांचा जीवन प्रवास हा खडतर असाच राहिला आहे.मठकर यांचा परिचय सर्वोदय जगतात "काका"म्हणूनच सदैव राहिला आहे.त्यांच्या विचार व कार्यांची छाप नी प्रत्यक्ष अनुभव सेवाग्राम सह वर्धा येथील अनेक संस्था नी लोकांनी अनुभवला आहे.माणसे जोडणे,कार्यक्रम,युवकांना सक्रीय करणे, जबाबदारी देणे यामधून ते सर्वांमध्ये लोकप्रिय बणले होते.

      त्यांच्या पाच वर्षांचा काळ हा आश्रम वासियांसाठी तसेच सेवाग्राम वासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा नी स्मरणीय असाच राहिला आहे.कापूस ते कापड हा उपक्रम सुरू केला.यातून आश्रमातच खादीला चालणा दिली.पर्यटकही सूतकताई व विनाई पाहून गांधीजींच्या काळातील खादी चे काम प्रत्यक्ष पाहता येऊ लागले.सेवाग्राम येथील दारूबंदी महिलांना सक्रीय करणे,सर्वोपरी मदत करीत असल्याने दारूविक्रेत्यांवर नियंत्रण आले होते.महिला सुध्दा जोमाने सक्रीय झाल्या होत्या.मठकर यांच्या पुढाकारातून माजी खासदार ,उद्योगपती राहूल बजाज यांनी फंड सुध्दा दिला होता.सर्वोदय समाज संमेलन घेण्यात त्यांचा विशेष पुढाकार होता.गांधीजींचे नातू प्रा.जगमोहन गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू एड.प्रकाश आंबेडकर यांना एकाच विचार पिठावर आश्रमात आणून गांधी आंबेडकर वाद हा कधीच नव्हता तर ती वैचारिक लढाई होती हे त्यांनी दाखवून दिले.

      सेवाग्राम आश्रमातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संबंध प्रेमवत आणि पारिवारिक असाच राहिला आहे.कार्यकर्त्यांना नेहमीच ते मान सन्मान देत असे.आस्थेने चौकशी करीत असे.त्यामुळे जयवंत मठकर यांची आठवण आजही केल्या जात असून त्यांचा कार्यकाळ खुप चांगला होता असे कार्यकर्ते म्हणतात.त्यांच्या निधनाने एक सक्रिय कार्यकर्ता गमावला आहे.त्यांच्या मागे पत्नी,दोन मुली,जावाई,एक मुलगा,सून, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे.पुण्यात मंगळवारला सकाळी अंतसंस्कार पार पडला.