शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

जेष्ठ गांधीवादी, सर्वोदयी व सेवाग्राम आश्रमचे माजी अध्यक्ष जयवंत मठकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 13:05 IST

गांधी विनोबा आणि जयप्रकाश यांची विचार सरणी आणि सर्वोदयाचा विचार घेऊन आयुष्यभर त्यांनी काम केलेले आहे. साने गुरूजी कथामाला,राष्ट्रसेवा दल,सर्व सेवा संघ,सर्वोदय मंडळ,खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघ, महात्मा गांधी लोकसेवा संघ, महाराष्ट्र सेवा संघ, महाराष्ट्र ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष,सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान इ.संस्थेत त्यांनी विविध पदांवर कार्य केले आहे.

सेवाग्राम (वर्धा) :    गांधी विनोबा जयप्रकाश  यांच्या विचारांचे पाईक असलेले सर्वोदयी आणि विविध संस्थांच्या माध्यमातून भारतभर सतत कार्यरत असणारे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान चे माजी अध्यक्ष जयवंत गंगाराम मठकर यांचे पुण्यात सोमवारला निधन झाले.ते ८५  वर्षाचे होते.ते गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते.

    गांधी विनोबा आणि जयप्रकाश यांची विचार सरणी आणि सर्वोदयाचा विचार घेऊन आयुष्यभर त्यांनी काम केलेले आहे. साने गुरूजी कथामाला,राष्ट्रसेवा दल,सर्व सेवा संघ,सर्वोदय मंडळ,खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघ, महात्मा गांधी लोकसेवा संघ, महाराष्ट्र सेवा संघ, महाराष्ट्र ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष,सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान इ.संस्थेत त्यांनी विविध पदांवर कार्य केले आहे.जयवंत मठकर हे मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मठ या गावचे.त्यांचा जीवन प्रवास हा खडतर असाच राहिला आहे.मठकर यांचा परिचय सर्वोदय जगतात "काका"म्हणूनच सदैव राहिला आहे.त्यांच्या विचार व कार्यांची छाप नी प्रत्यक्ष अनुभव सेवाग्राम सह वर्धा येथील अनेक संस्था नी लोकांनी अनुभवला आहे.माणसे जोडणे,कार्यक्रम,युवकांना सक्रीय करणे, जबाबदारी देणे यामधून ते सर्वांमध्ये लोकप्रिय बणले होते.

      त्यांच्या पाच वर्षांचा काळ हा आश्रम वासियांसाठी तसेच सेवाग्राम वासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा नी स्मरणीय असाच राहिला आहे.कापूस ते कापड हा उपक्रम सुरू केला.यातून आश्रमातच खादीला चालणा दिली.पर्यटकही सूतकताई व विनाई पाहून गांधीजींच्या काळातील खादी चे काम प्रत्यक्ष पाहता येऊ लागले.सेवाग्राम येथील दारूबंदी महिलांना सक्रीय करणे,सर्वोपरी मदत करीत असल्याने दारूविक्रेत्यांवर नियंत्रण आले होते.महिला सुध्दा जोमाने सक्रीय झाल्या होत्या.मठकर यांच्या पुढाकारातून माजी खासदार ,उद्योगपती राहूल बजाज यांनी फंड सुध्दा दिला होता.सर्वोदय समाज संमेलन घेण्यात त्यांचा विशेष पुढाकार होता.गांधीजींचे नातू प्रा.जगमोहन गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू एड.प्रकाश आंबेडकर यांना एकाच विचार पिठावर आश्रमात आणून गांधी आंबेडकर वाद हा कधीच नव्हता तर ती वैचारिक लढाई होती हे त्यांनी दाखवून दिले.

      सेवाग्राम आश्रमातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संबंध प्रेमवत आणि पारिवारिक असाच राहिला आहे.कार्यकर्त्यांना नेहमीच ते मान सन्मान देत असे.आस्थेने चौकशी करीत असे.त्यामुळे जयवंत मठकर यांची आठवण आजही केल्या जात असून त्यांचा कार्यकाळ खुप चांगला होता असे कार्यकर्ते म्हणतात.त्यांच्या निधनाने एक सक्रिय कार्यकर्ता गमावला आहे.त्यांच्या मागे पत्नी,दोन मुली,जावाई,एक मुलगा,सून, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे.पुण्यात मंगळवारला सकाळी अंतसंस्कार पार पडला.