शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

जेष्ठ गांधीवादी, सर्वोदयी व सेवाग्राम आश्रमचे माजी अध्यक्ष जयवंत मठकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 13:05 IST

गांधी विनोबा आणि जयप्रकाश यांची विचार सरणी आणि सर्वोदयाचा विचार घेऊन आयुष्यभर त्यांनी काम केलेले आहे. साने गुरूजी कथामाला,राष्ट्रसेवा दल,सर्व सेवा संघ,सर्वोदय मंडळ,खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघ, महात्मा गांधी लोकसेवा संघ, महाराष्ट्र सेवा संघ, महाराष्ट्र ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष,सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान इ.संस्थेत त्यांनी विविध पदांवर कार्य केले आहे.

सेवाग्राम (वर्धा) :    गांधी विनोबा जयप्रकाश  यांच्या विचारांचे पाईक असलेले सर्वोदयी आणि विविध संस्थांच्या माध्यमातून भारतभर सतत कार्यरत असणारे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान चे माजी अध्यक्ष जयवंत गंगाराम मठकर यांचे पुण्यात सोमवारला निधन झाले.ते ८५  वर्षाचे होते.ते गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते.

    गांधी विनोबा आणि जयप्रकाश यांची विचार सरणी आणि सर्वोदयाचा विचार घेऊन आयुष्यभर त्यांनी काम केलेले आहे. साने गुरूजी कथामाला,राष्ट्रसेवा दल,सर्व सेवा संघ,सर्वोदय मंडळ,खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघ, महात्मा गांधी लोकसेवा संघ, महाराष्ट्र सेवा संघ, महाराष्ट्र ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष,सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान इ.संस्थेत त्यांनी विविध पदांवर कार्य केले आहे.जयवंत मठकर हे मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मठ या गावचे.त्यांचा जीवन प्रवास हा खडतर असाच राहिला आहे.मठकर यांचा परिचय सर्वोदय जगतात "काका"म्हणूनच सदैव राहिला आहे.त्यांच्या विचार व कार्यांची छाप नी प्रत्यक्ष अनुभव सेवाग्राम सह वर्धा येथील अनेक संस्था नी लोकांनी अनुभवला आहे.माणसे जोडणे,कार्यक्रम,युवकांना सक्रीय करणे, जबाबदारी देणे यामधून ते सर्वांमध्ये लोकप्रिय बणले होते.

      त्यांच्या पाच वर्षांचा काळ हा आश्रम वासियांसाठी तसेच सेवाग्राम वासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा नी स्मरणीय असाच राहिला आहे.कापूस ते कापड हा उपक्रम सुरू केला.यातून आश्रमातच खादीला चालणा दिली.पर्यटकही सूतकताई व विनाई पाहून गांधीजींच्या काळातील खादी चे काम प्रत्यक्ष पाहता येऊ लागले.सेवाग्राम येथील दारूबंदी महिलांना सक्रीय करणे,सर्वोपरी मदत करीत असल्याने दारूविक्रेत्यांवर नियंत्रण आले होते.महिला सुध्दा जोमाने सक्रीय झाल्या होत्या.मठकर यांच्या पुढाकारातून माजी खासदार ,उद्योगपती राहूल बजाज यांनी फंड सुध्दा दिला होता.सर्वोदय समाज संमेलन घेण्यात त्यांचा विशेष पुढाकार होता.गांधीजींचे नातू प्रा.जगमोहन गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू एड.प्रकाश आंबेडकर यांना एकाच विचार पिठावर आश्रमात आणून गांधी आंबेडकर वाद हा कधीच नव्हता तर ती वैचारिक लढाई होती हे त्यांनी दाखवून दिले.

      सेवाग्राम आश्रमातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संबंध प्रेमवत आणि पारिवारिक असाच राहिला आहे.कार्यकर्त्यांना नेहमीच ते मान सन्मान देत असे.आस्थेने चौकशी करीत असे.त्यामुळे जयवंत मठकर यांची आठवण आजही केल्या जात असून त्यांचा कार्यकाळ खुप चांगला होता असे कार्यकर्ते म्हणतात.त्यांच्या निधनाने एक सक्रिय कार्यकर्ता गमावला आहे.त्यांच्या मागे पत्नी,दोन मुली,जावाई,एक मुलगा,सून, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे.पुण्यात मंगळवारला सकाळी अंतसंस्कार पार पडला.