शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

जनहित मंच ही खऱ्या अर्थाने वर्धेकरांचे हित जोपासणारी संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:02 IST

जनहीत मंच मागील ६ वर्षांपासून समाज कार्यात काम करणारी वर्ध्याची संस्था आहे. संस्थेने स्वछता अभियान, वाहतूक व्यवस्था व त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, बालकावर होणारे लैंगिक आत्याचार याबदलच्या कार्यशाळा, गरजुंना साहित्य वाटप, कपडा बँक,........

ठळक मुद्देसतीश बावसे : विविध कार्याची दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जनहीत मंच मागील ६ वर्षांपासून समाज कार्यात काम करणारी वर्ध्याची संस्था आहे. संस्थेने स्वछता अभियान, वाहतूक व्यवस्था व त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, बालकावर होणारे लैंगिक आत्याचार याबदलच्या कार्यशाळा, गरजुंना साहित्य वाटप, कपडा बँक, नवरात्री उत्सव दरम्यान रात्री स्वछता मोहीम, यासारखे जनहितार्थ कार्य केले असून ते सध्याही सुरू आहेत. जनहित मंच खºया अर्थाने नागरिकांचे हित जोपासणारी संस्था आहे, असे प्रतिपादन जनहीत मंचाचे अध्यक्ष सतीश बावसे यांनी केले.जनहित मंच वर्धाच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रम मुक्तांगण टेकडीवर पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक चोधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जनहीत मंचाचे सचिव डॉ. आसमवार यांनी जनहीत मंचाच्या महत्वाकाशी प्रोजेक्ट बद्दल माहीती देताना महावीर उद्यान यांची उत्पती व त्यावर जनहित मंचाने केलेले कार्य व महावीर उद्यान याची आजची स्थिती या विषयी माहीती दिली. जनहीत मंचाच्या कार्याची दखल मुख्यमंत्र्यांनीही कशी घेतली या बद्दल सांगताना ते म्हणाले, वर्धा नागपूर टूरीझम कोरीडोओरची कल्पना सर्वप्रथम जनहित मंचाने अभ्यास करून प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे पाठविला. त्याच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्र्यानी त्याचे नामकरण हिंगणी-हिंगणा टूरीझम कोरीडोओर करून त्याचावर समिती स्थापन केली. मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेसी यांना त्याची कामगीरी सोपावली आहे. या प्रोजेक्ट वर सध्या काम सुरु आहे. महाराष्ट्र शासनाच्या २ कोटी, ४ कोटी व १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमामध्ये जनहीत मंचाने सहभाग घेवुन वर्धेकरिता एक सुंदर क्षेत्र निर्माण केले. त्याचे फलीत म्हणून मुक्तांगण आज सर्वासमोर उभे आहे, असे सांगितले.यावेळी ठाणेदार अशोक चोधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार डॉ. मकरदे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी बहारदार शायरीही सादर केली. कार्यक्रमाला पवन बोधनकार यांच्यासह जनहित मंचाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी एका पेक्षा एक बहारदार गितांचा कार्यक्रमही पार पडला. कार्यक्रमाला वर्धेकरांची उपस्थिती होती.