शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

जनहित मंच ही खऱ्या अर्थाने वर्धेकरांचे हित जोपासणारी संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 01:02 IST

जनहीत मंच मागील ६ वर्षांपासून समाज कार्यात काम करणारी वर्ध्याची संस्था आहे. संस्थेने स्वछता अभियान, वाहतूक व्यवस्था व त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, बालकावर होणारे लैंगिक आत्याचार याबदलच्या कार्यशाळा, गरजुंना साहित्य वाटप, कपडा बँक,........

ठळक मुद्देसतीश बावसे : विविध कार्याची दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जनहीत मंच मागील ६ वर्षांपासून समाज कार्यात काम करणारी वर्ध्याची संस्था आहे. संस्थेने स्वछता अभियान, वाहतूक व्यवस्था व त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, बालकावर होणारे लैंगिक आत्याचार याबदलच्या कार्यशाळा, गरजुंना साहित्य वाटप, कपडा बँक, नवरात्री उत्सव दरम्यान रात्री स्वछता मोहीम, यासारखे जनहितार्थ कार्य केले असून ते सध्याही सुरू आहेत. जनहित मंच खºया अर्थाने नागरिकांचे हित जोपासणारी संस्था आहे, असे प्रतिपादन जनहीत मंचाचे अध्यक्ष सतीश बावसे यांनी केले.जनहित मंच वर्धाच्यावतीने आयोजित विशेष कार्यक्रम मुक्तांगण टेकडीवर पार पडला. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक चोधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जनहीत मंचाचे सचिव डॉ. आसमवार यांनी जनहीत मंचाच्या महत्वाकाशी प्रोजेक्ट बद्दल माहीती देताना महावीर उद्यान यांची उत्पती व त्यावर जनहित मंचाने केलेले कार्य व महावीर उद्यान याची आजची स्थिती या विषयी माहीती दिली. जनहीत मंचाच्या कार्याची दखल मुख्यमंत्र्यांनीही कशी घेतली या बद्दल सांगताना ते म्हणाले, वर्धा नागपूर टूरीझम कोरीडोओरची कल्पना सर्वप्रथम जनहित मंचाने अभ्यास करून प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे पाठविला. त्याच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्र्यानी त्याचे नामकरण हिंगणी-हिंगणा टूरीझम कोरीडोओर करून त्याचावर समिती स्थापन केली. मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेसी यांना त्याची कामगीरी सोपावली आहे. या प्रोजेक्ट वर सध्या काम सुरु आहे. महाराष्ट्र शासनाच्या २ कोटी, ४ कोटी व १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमामध्ये जनहीत मंचाने सहभाग घेवुन वर्धेकरिता एक सुंदर क्षेत्र निर्माण केले. त्याचे फलीत म्हणून मुक्तांगण आज सर्वासमोर उभे आहे, असे सांगितले.यावेळी ठाणेदार अशोक चोधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार डॉ. मकरदे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी बहारदार शायरीही सादर केली. कार्यक्रमाला पवन बोधनकार यांच्यासह जनहित मंचाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी एका पेक्षा एक बहारदार गितांचा कार्यक्रमही पार पडला. कार्यक्रमाला वर्धेकरांची उपस्थिती होती.