शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

२१० गावांत राबविणार जलयुक्त शिवार अभियान

By admin | Updated: February 17, 2016 01:48 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची निवड करताना माथा ते पायथा या प्रणालीनुसार पाणलोट विकासाची कामे घेण्याला

वर्धा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची निवड करताना माथा ते पायथा या प्रणालीनुसार पाणलोट विकासाची कामे घेण्याला प्राधान्य देण्यात आले. यावर्षी याच तत्वानुसार २१० गावांची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियानामध्ये निवड करण्यात आलेल्या प्रत्येक गावात शिवार फेरी घेवून पाण्याच्या ताळेबंदाबाबत गावकऱ्यांना विश्वासात घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मिणा, अपर मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जलतज्ज्ञ सोमनाथे, तसेच सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील गावात राबविण्यात येत असलेल्या गावांत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला असून त्यावर चर्चा झाली.ग्रामसभेच्या ठरावानंतरच जलयुक्तची देयके देण्याच्या सूचना ४जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत वर्षी कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यासाठी ४६ कोटी ९९ हजार रुपयांच्या निधीपैकी ३५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. विविध विभागातर्फे पूर्ण झालेल्या कामासंदर्भातील देयकांच्या मंजुरीपूर्वी ग्रामसभेच्या ठराव जोडणे आवश्यक आहे. ज्या देयकांसोबत ग्रामसभेचा ठराव आहे. अशी देयके तत्काळ मंजूर करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्या आहेत.४जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागील वर्षी मंजूर झालेल्या कामाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी सलील यांनी अपूर्ण कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना केल्या. पूर्ण झालेल्या कामासंदर्भातील देयके तात्काळ सादर करावीत. जिल्ह्यातील विविध यंत्रणांच्या कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत आॅडीट करण्यात आले असून आठ कामे प्रगतीपथावर आहेत. जलसंधारण विभागातर्फे ७८ कामांपैकी ६१ कामे प्रगतिपथावर आहेत. काही कामे जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे कामे ३१ मार्च पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. कृषी विभागातर्फे ५३९ कामांपैकी ३८४ कामे पूर्ण झाली असून ११० कामे प्रगतिपथावर आहेत. ४५ कामांना लवकरच सुरूवात होत आहे. ही सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्यात यावीत. अशा सूचना देण्यात आल्या. अपूर्ण असलेल्या व या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, अशी कामे घेताना नाला खोलीकरण सिमेंट बांध तसेच शेततळ्यांची कामे प्राधान्याने घेण्याच्या सूचना यावेळी दिल्यात. प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भारती यांनी अभियानाअंतर्गत सर्व कामांची यंत्रणानिहाय माहिती दिली.