शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
2
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
4
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
5
VIDEO: रोहित शर्मा सुरक्षा रक्षकावर भडकला; मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेमकं काय घडलं? पाहा...
6
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
7
'मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात...', अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
8
गजकेसरीसह ३ राजयोगांचा वरदान काळ: ९ राशींचे मंगल, हाती पैसा खेळेल; सुख-समृद्धी, शुभ-भरभराट!
9
FD मध्ये गुंतवणूक करायचीय? हे आहेत 10 बेस्ट बँक ऑप्शन्स, येथे मिळतोय जवळपास 9% परतावा; जाणून घ्या सविस्तर
10
Diwali 2025: रांगोळीत दडलंय लक्ष्मी कृपेचं गूढ, एकदा समजून घ्याल तर स्टिकर वापरणार नाही!
11
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
12
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
13
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला
14
"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
15
जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली
16
सचिन तेंडुलकरची साद, माणिकराव कोकाटेंचा तत्काळ प्रतिसाद; खेळाडूंसाठी घेतला मोठा निर्णय
17
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
18
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
19
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
20
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई

२१० गावांत राबविणार जलयुक्त शिवार अभियान

By admin | Updated: February 17, 2016 01:48 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची निवड करताना माथा ते पायथा या प्रणालीनुसार पाणलोट विकासाची कामे घेण्याला

वर्धा : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावांची निवड करताना माथा ते पायथा या प्रणालीनुसार पाणलोट विकासाची कामे घेण्याला प्राधान्य देण्यात आले. यावर्षी याच तत्वानुसार २१० गावांची निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियानामध्ये निवड करण्यात आलेल्या प्रत्येक गावात शिवार फेरी घेवून पाण्याच्या ताळेबंदाबाबत गावकऱ्यांना विश्वासात घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्यात.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी संजय मिणा, अपर मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, जलतज्ज्ञ सोमनाथे, तसेच सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील गावात राबविण्यात येत असलेल्या गावांत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला असून त्यावर चर्चा झाली.ग्रामसभेच्या ठरावानंतरच जलयुक्तची देयके देण्याच्या सूचना ४जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गत वर्षी कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. यासाठी ४६ कोटी ९९ हजार रुपयांच्या निधीपैकी ३५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. विविध विभागातर्फे पूर्ण झालेल्या कामासंदर्भातील देयकांच्या मंजुरीपूर्वी ग्रामसभेच्या ठराव जोडणे आवश्यक आहे. ज्या देयकांसोबत ग्रामसभेचा ठराव आहे. अशी देयके तत्काळ मंजूर करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्या आहेत.४जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मागील वर्षी मंजूर झालेल्या कामाचा आढावा घेताना जिल्हाधिकारी सलील यांनी अपूर्ण कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना केल्या. पूर्ण झालेल्या कामासंदर्भातील देयके तात्काळ सादर करावीत. जिल्ह्यातील विविध यंत्रणांच्या कामांचे त्रयस्थ संस्थेमार्फत आॅडीट करण्यात आले असून आठ कामे प्रगतीपथावर आहेत. जलसंधारण विभागातर्फे ७८ कामांपैकी ६१ कामे प्रगतिपथावर आहेत. काही कामे जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे कामे ३१ मार्च पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. कृषी विभागातर्फे ५३९ कामांपैकी ३८४ कामे पूर्ण झाली असून ११० कामे प्रगतिपथावर आहेत. ४५ कामांना लवकरच सुरूवात होत आहे. ही सर्व कामे ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्यात यावीत. अशा सूचना देण्यात आल्या. अपूर्ण असलेल्या व या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, अशी कामे घेताना नाला खोलीकरण सिमेंट बांध तसेच शेततळ्यांची कामे प्राधान्याने घेण्याच्या सूचना यावेळी दिल्यात. प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भारती यांनी अभियानाअंतर्गत सर्व कामांची यंत्रणानिहाय माहिती दिली.