शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

तीळगूळ न घेताही गोड बोलणे सहज सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:11 IST

तीळगूळ घ्या आणि गोड-गोड बोला मकर संक्रांतीनिमित्त या विधानाची पुनरावृत्ती वर्षा-नुवर्षापासून सातत्याने होत आली आणि येत राहिली. ती केवळ औपचारिकता राहू नये, तीळगूळ न घेताही गोड बोलणे सहज सोपे आहे, मत मानसशास्त्रज्ञ डॉ. के.पी. निंबाळकर यांनी व्यक्त केले. आपल्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द इतरांना न दुखावणारे असावेत.

ठळक मुद्देके. पी. निंबाळकर म्हणाले,

तीळगूळ घ्या आणि गोड-गोड बोला मकर संक्रांतीनिमित्त या विधानाची पुनरावृत्ती वर्षा-नुवर्षापासून सातत्याने होत आली आणि येत राहिली. ती केवळ औपचारिकता राहू नये, तीळगूळ न घेताही गोड बोलणे सहज सोपे आहे, मत मानसशास्त्रज्ञ डॉ. के.पी. निंबाळकर यांनी व्यक्त केले. आपल्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द इतरांना न दुखावणारे असावेत. म्हणजे खऱ्या अर्थाने स्नेह, आपुलकीचे, प्रेमाचे नाते जोडले जाऊ शकते, हे सहज शक्य आणि बिनखर्चाचे आहे. दुसऱ्यांशी रागाने बोलणारी माणसे अनेक आहेत. राग अनावर झाला असताना व्यक्ती आपली भावना व्यक्त करीत असते, तेव्हा ती बाह्य लक्षणांवरून सुंदर न दिसता विकृत दिसते. राग ही नकारार्थी भावना असून त्याचे शरीरावर नकारार्थीच परिणाम होतात. म्हणून स्वत:च्या भावनांचे संयमन साधत नकारार्थी भावनांना दूर ठेवून सकारात्मक जीवन जगणे शक्य आणि सोपे आहे. त्याकरिता अभिवृत्तीमध्ये बदल करणे महत्त्वाचे ठरते. मन ही अमूर्त संकल्पना असल्याने व मनाला स्वत:चे शरीर नसल्याने रागामुळे जो ताणतणाव निर्माण होतो, त्याचे पडसाद शरीरावर उमटत असतात आणि त्यातूनच विविध प्रकारचे मनोशारीरिक आजार उद्भवतात असेही डॉ. निंबाळकर म्हणाले.आपल्याच मुखातून बाहेर पडणारे शब्द हे केवळ शब्द असले तरी ते इतरांसाठी असतात. शब्द माणसांना जोडतात अन् कायमचे दूरही सारतात. म्हणून शब्द तोलून, मापून बोलणे बरेचदा गरजेचे असते. बऱ्याच गोष्टी मनाला पटत नसल्या तरी वागण्या-बोलण्याशी सुसमायोजन साधून गोड बोलण्यात गैर काय? जग, समाज सुंदर आहे. आपण स्वास्थ्य जपले पाहिजे.