शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

तीळगूळ न घेताही गोड बोलणे सहज सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:11 IST

तीळगूळ घ्या आणि गोड-गोड बोला मकर संक्रांतीनिमित्त या विधानाची पुनरावृत्ती वर्षा-नुवर्षापासून सातत्याने होत आली आणि येत राहिली. ती केवळ औपचारिकता राहू नये, तीळगूळ न घेताही गोड बोलणे सहज सोपे आहे, मत मानसशास्त्रज्ञ डॉ. के.पी. निंबाळकर यांनी व्यक्त केले. आपल्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द इतरांना न दुखावणारे असावेत.

ठळक मुद्देके. पी. निंबाळकर म्हणाले,

तीळगूळ घ्या आणि गोड-गोड बोला मकर संक्रांतीनिमित्त या विधानाची पुनरावृत्ती वर्षा-नुवर्षापासून सातत्याने होत आली आणि येत राहिली. ती केवळ औपचारिकता राहू नये, तीळगूळ न घेताही गोड बोलणे सहज सोपे आहे, मत मानसशास्त्रज्ञ डॉ. के.पी. निंबाळकर यांनी व्यक्त केले. आपल्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द इतरांना न दुखावणारे असावेत. म्हणजे खऱ्या अर्थाने स्नेह, आपुलकीचे, प्रेमाचे नाते जोडले जाऊ शकते, हे सहज शक्य आणि बिनखर्चाचे आहे. दुसऱ्यांशी रागाने बोलणारी माणसे अनेक आहेत. राग अनावर झाला असताना व्यक्ती आपली भावना व्यक्त करीत असते, तेव्हा ती बाह्य लक्षणांवरून सुंदर न दिसता विकृत दिसते. राग ही नकारार्थी भावना असून त्याचे शरीरावर नकारार्थीच परिणाम होतात. म्हणून स्वत:च्या भावनांचे संयमन साधत नकारार्थी भावनांना दूर ठेवून सकारात्मक जीवन जगणे शक्य आणि सोपे आहे. त्याकरिता अभिवृत्तीमध्ये बदल करणे महत्त्वाचे ठरते. मन ही अमूर्त संकल्पना असल्याने व मनाला स्वत:चे शरीर नसल्याने रागामुळे जो ताणतणाव निर्माण होतो, त्याचे पडसाद शरीरावर उमटत असतात आणि त्यातूनच विविध प्रकारचे मनोशारीरिक आजार उद्भवतात असेही डॉ. निंबाळकर म्हणाले.आपल्याच मुखातून बाहेर पडणारे शब्द हे केवळ शब्द असले तरी ते इतरांसाठी असतात. शब्द माणसांना जोडतात अन् कायमचे दूरही सारतात. म्हणून शब्द तोलून, मापून बोलणे बरेचदा गरजेचे असते. बऱ्याच गोष्टी मनाला पटत नसल्या तरी वागण्या-बोलण्याशी सुसमायोजन साधून गोड बोलण्यात गैर काय? जग, समाज सुंदर आहे. आपण स्वास्थ्य जपले पाहिजे.