शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

तीळगूळ न घेताही गोड बोलणे सहज सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 22:11 IST

तीळगूळ घ्या आणि गोड-गोड बोला मकर संक्रांतीनिमित्त या विधानाची पुनरावृत्ती वर्षा-नुवर्षापासून सातत्याने होत आली आणि येत राहिली. ती केवळ औपचारिकता राहू नये, तीळगूळ न घेताही गोड बोलणे सहज सोपे आहे, मत मानसशास्त्रज्ञ डॉ. के.पी. निंबाळकर यांनी व्यक्त केले. आपल्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द इतरांना न दुखावणारे असावेत.

ठळक मुद्देके. पी. निंबाळकर म्हणाले,

तीळगूळ घ्या आणि गोड-गोड बोला मकर संक्रांतीनिमित्त या विधानाची पुनरावृत्ती वर्षा-नुवर्षापासून सातत्याने होत आली आणि येत राहिली. ती केवळ औपचारिकता राहू नये, तीळगूळ न घेताही गोड बोलणे सहज सोपे आहे, मत मानसशास्त्रज्ञ डॉ. के.पी. निंबाळकर यांनी व्यक्त केले. आपल्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द इतरांना न दुखावणारे असावेत. म्हणजे खऱ्या अर्थाने स्नेह, आपुलकीचे, प्रेमाचे नाते जोडले जाऊ शकते, हे सहज शक्य आणि बिनखर्चाचे आहे. दुसऱ्यांशी रागाने बोलणारी माणसे अनेक आहेत. राग अनावर झाला असताना व्यक्ती आपली भावना व्यक्त करीत असते, तेव्हा ती बाह्य लक्षणांवरून सुंदर न दिसता विकृत दिसते. राग ही नकारार्थी भावना असून त्याचे शरीरावर नकारार्थीच परिणाम होतात. म्हणून स्वत:च्या भावनांचे संयमन साधत नकारार्थी भावनांना दूर ठेवून सकारात्मक जीवन जगणे शक्य आणि सोपे आहे. त्याकरिता अभिवृत्तीमध्ये बदल करणे महत्त्वाचे ठरते. मन ही अमूर्त संकल्पना असल्याने व मनाला स्वत:चे शरीर नसल्याने रागामुळे जो ताणतणाव निर्माण होतो, त्याचे पडसाद शरीरावर उमटत असतात आणि त्यातूनच विविध प्रकारचे मनोशारीरिक आजार उद्भवतात असेही डॉ. निंबाळकर म्हणाले.आपल्याच मुखातून बाहेर पडणारे शब्द हे केवळ शब्द असले तरी ते इतरांसाठी असतात. शब्द माणसांना जोडतात अन् कायमचे दूरही सारतात. म्हणून शब्द तोलून, मापून बोलणे बरेचदा गरजेचे असते. बऱ्याच गोष्टी मनाला पटत नसल्या तरी वागण्या-बोलण्याशी सुसमायोजन साधून गोड बोलण्यात गैर काय? जग, समाज सुंदर आहे. आपण स्वास्थ्य जपले पाहिजे.