शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

गांधींच्या विचारातील भारत घडविण्याचे काम भाजपानेच केले; जाहीर सभेतून विरोधकांवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2023 22:21 IST

Wardha News भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारनेच खऱ्या अर्थाने गांधींजींच्या विचाराचा भारत घडविला, असा घणाघात केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा कार्यक्रम व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी केला.

वर्धा: वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. त्यांनी देशाला एक विचारसरणी दिली आहे. त्यांच्या विचारानुसारच ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना भाजपाने देशात रुजविली. इतकेच नाही तर खादीला प्रोत्साहन देऊन मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मितीचे कामही केले आहे. काँग्रेसने केवळ गांधीजींच्या नावाचा वापर करुन राजकारण केले असून, भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारनेच खऱ्या अर्थाने गांधींजींच्या विचाराचा भारत घडविला, असा घणाघात केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा कार्यक्रम व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ९ वर्षानिमित्त महा-जनसंपर्क अभियानांतर्गत केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सरकारच्या कार्याचा आढावा घेताना ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, सर्व काही संभव आहे, त्याकरिता देशाचा नेता सच्चा आणि कर्तव्यदक्ष असणे आवश्यक आहे. आता या मोदी सरकारला रोखण्याकरिता घोटाळेबाज एकत्र यायला लागले आहे. कुणी जनावरांचा चारा गिळला, कुणी भूखंड हडपले, कुणी नोकरीच्या बहाण्याने पैसा लाटला तर कुणी जीजा घोटाळाही केला आहे. पण, या ९ वर्षांमध्ये कोणताही घोटाळा झाला नसून एक इमानदार सरकार दिली आहे. तब्बल साडेतीन कोटी नागरिकांना पक्के घरे दिली आहे. ९ कोटी ६० लाख महिलांची चूल फुंकण्यातून सुटका करून उज्ज्वला गॅस योजनेतून मोफत सिलिंडर दिले आहेत. १२ कोटी घरांना नल से जल दिलं आहे. इतकेच नाही तर कोरोनाकाळामध्ये ८० कोटी नागरिकांना दुप्पट रेशन पुरविण्याचे कामही या सरकारने केले आहे. असंभव असं कामही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने संभव करून हे जनतेचं सरकार आहे, असा विश्वास दिला आहे, असेही अनुराग ठाकूर या वेळी म्हणाले.

या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, लोकसभा संपर्कप्रमुख सुमित वानखेडे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, आमदार दादाराव केचे, आमदार डॉ. रामदास आंबटकर, आ. समीर कुणावार, आ. प्रताप अडसड, माजी जि.प. अध्यक्ष सरिता गाखरे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, राजेश बकाणे, माजी खासदार सुरेश वाघमारे, संजय गाते, आशिष कुचेवार यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुर