शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

गांधींच्या विचारातील भारत घडविण्याचे काम भाजपानेच केले; जाहीर सभेतून विरोधकांवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2023 22:21 IST

Wardha News भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारनेच खऱ्या अर्थाने गांधींजींच्या विचाराचा भारत घडविला, असा घणाघात केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा कार्यक्रम व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी केला.

वर्धा: वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. त्यांनी देशाला एक विचारसरणी दिली आहे. त्यांच्या विचारानुसारच ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना भाजपाने देशात रुजविली. इतकेच नाही तर खादीला प्रोत्साहन देऊन मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मितीचे कामही केले आहे. काँग्रेसने केवळ गांधीजींच्या नावाचा वापर करुन राजकारण केले असून, भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारनेच खऱ्या अर्थाने गांधींजींच्या विचाराचा भारत घडविला, असा घणाघात केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा कार्यक्रम व क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या ९ वर्षानिमित्त महा-जनसंपर्क अभियानांतर्गत केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सरकारच्या कार्याचा आढावा घेताना ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, सर्व काही संभव आहे, त्याकरिता देशाचा नेता सच्चा आणि कर्तव्यदक्ष असणे आवश्यक आहे. आता या मोदी सरकारला रोखण्याकरिता घोटाळेबाज एकत्र यायला लागले आहे. कुणी जनावरांचा चारा गिळला, कुणी भूखंड हडपले, कुणी नोकरीच्या बहाण्याने पैसा लाटला तर कुणी जीजा घोटाळाही केला आहे. पण, या ९ वर्षांमध्ये कोणताही घोटाळा झाला नसून एक इमानदार सरकार दिली आहे. तब्बल साडेतीन कोटी नागरिकांना पक्के घरे दिली आहे. ९ कोटी ६० लाख महिलांची चूल फुंकण्यातून सुटका करून उज्ज्वला गॅस योजनेतून मोफत सिलिंडर दिले आहेत. १२ कोटी घरांना नल से जल दिलं आहे. इतकेच नाही तर कोरोनाकाळामध्ये ८० कोटी नागरिकांना दुप्पट रेशन पुरविण्याचे कामही या सरकारने केले आहे. असंभव असं कामही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने संभव करून हे जनतेचं सरकार आहे, असा विश्वास दिला आहे, असेही अनुराग ठाकूर या वेळी म्हणाले.

या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, लोकसभा संपर्कप्रमुख सुमित वानखेडे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, आमदार दादाराव केचे, आमदार डॉ. रामदास आंबटकर, आ. समीर कुणावार, आ. प्रताप अडसड, माजी जि.प. अध्यक्ष सरिता गाखरे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, राजेश बकाणे, माजी खासदार सुरेश वाघमारे, संजय गाते, आशिष कुचेवार यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुर