शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

जिल्ह्यात एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची जबाबदारी माझी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 6:41 PM

वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यांना भेट देऊन पालकमंत्री सुनील केदार यांनी प्रत्येक तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सदर सूचना सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांना दिल्यात.

ठळक मुद्देआठही तालुक्याला भेट देऊन घेतला आढावाडॉक्टरांचे केले कौतुककोणत्याही नळ योजनेचे वीज कनेक्शन तोडू नये

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिल्ह्यात एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची जबाबदारी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी आहे. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाहीत पण ते शिधा मिळण्यास पात्र आहेत, आणि ज्यांच्याकडे शिधा पत्रिका आहेत मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांना शिधा मिळत नाही अशा सर्वांची गाव, नगरपंचायत आणि नगरपरिषदनिहाय तात्काळ यादी तयार करुन त्यांना कार्ड वितरित करण्याचे आदेश पालकमंत्री सुनील केदार यांनी आज दिलेत.जिल्ह्यातील आठही तालुक्यांना भेट देऊन त्यांनी प्रत्येक तालुक्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सदर सूचना सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांना दिल्यात.कोरोना संसगार्मुळे संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय , कामे बंद आहेत. अशा परिस्थितीत गरीब, मजूर, कामगार, छोटे दुकानदार, स्टॉल धारक ज्यांचा उदरनिर्वाह रोजच्या रोजंदारीवर चालतो त्या सर्वांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्यांची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे. त्यासाठी गाव निहाय शिधा पत्रिका धारकांची यादी करताना गावातील शिधापत्रिका धारकांची संख्या, शिधा मिळणारे आणि न मिळणारे, तसेच ज्यांच्याकडे शिधापत्रिकाच नाही मात्र ते शिधा मिळण्यास पात्र आहेत, आणि रेशनकार्ड आहे मात्र तांत्रिक कारणामुळे ज्यांना शिधा मिळत नाही, तसेच शिधा मिळण्यास अपात्र असणारे रेशनकार्ड धारक अशी विभागणी करून यादी दोन दिवसात तयार करण्यास त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. ज्यांच्याकडे कार्ड आहे आणि रेशन मिळत आहे अशांचा जास्त प्रश्न नाही मात्र ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्यांना तातडीने रेशनकार्ड तयार करून देण्याच्या सूचना केदार यांनी यावेळी दिल्यात.उन्हाळा सुरू झाला असून या काळात ग्रामपंचायत, नगरपंचायत यांच्याकडे वीज देयक भरण्यास निधी नसल्यास अशा परिस्थितीत कोणत्याही गावातील, शहरातील पाणी पुरवठा योजनेचे वीज देयक न भरल्यामुळे वीज कनेक्शन कापण्यात येऊ नये.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात औषधाचा पुरेसा साठा करावा. औषधें उपलब्ध नसेल तर तात्काळ जिल्हा परिषदेने उपलब्ध करून देण्याचा सूचनाही त्यांनी दिल्यात. यावेळी त्यांनी जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याबद्दल समाधान व्यक्त करून सर्व सरकारी डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सहाययक आणि आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचा-यांच्या कामाचे कौतुक केले. आज खाजगी डॉक्टर त्यांचे दवाखाने बंद करून बसलेले असताना आपले डॉक्टर सैनिकांसारखे युद्धभूमीवर आघाडी सांभाळत आहेत याबद्दल त्यांनी सर्व डॉक्टरांचे आभारही मानले.यावेळी, आमदार दादाराव केचे, रणजित कांबळे, पंकज भोयर खासदार रामदास तडस, अमर काळे, त्या त्या तालुक्याच्या आढावा बैठकीत उपस्थित होते . तर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक बसवराज तेली आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Sunil Kedarसुनील केदार