शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

'साहित्य संमेलन भरविणे हे सरकारचे काम नाही';  अध्यक्षांनी पाठही थोपटली, दणकाही दिला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2023 18:47 IST

Wardha News साहित्य संमेलने आयोजित करणे ही सरकारची जबाबदारी नाही. स्वायत्त संस्थांच्या माध्यमातूनच संमेलनाचे आयोजन व्हावे, असे प्रतिपादन ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी करून सरकारची पाठही थोपटली अन् दणकाही दिला.

आनंद इंगोले

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी (वर्धा) : बेळगावसारख्या सीमावर्ती भागामध्ये मायमराठीला समृद्ध करण्यासाठी शासनाने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे; परंतु साहित्य संमेलने आयोजित करणे ही सरकारची जबाबदारी नाही. स्वायत्त संस्थांच्या माध्यमातूनच संमेलनाचे आयोजन व्हावे, असे प्रतिपादन ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी करून सरकारची पाठही थोपटली अन् दणकाही दिला.

 

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तत्पूर्वी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. संमेलनस्थळी ध्वजारोहण आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून थोडक्यात मनोगत व्यक्त करताना न्या. चपळगावकर बोलत होते. ‘साहित्य संमेलनाबाबत सरकारनेही पथ्ये पाळली पाहिजेत; तरच त्याची प्रतिष्ठा वाढेल, असे सांगताना या व्यासपीठावर हिंदी साहित्यिकांनाही निमंत्रित केल्याबद्दल संमेलनाध्यक्षांनी आयोजकांचे कौतुक केले. तसेच हिंदी-मराठी हे एकमेकांचे साहित्य वाचल्याशिवाय आपण खुजे राहू, असेही ते म्हणाले. संमेलनाध्यक्षांच्या भाषणापूर्वी मावळते अध्यक्ष भारत सासने यांनी गेल्या साहित्य संमेलनाच्या भाषणाचा आढावा घेत मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्रातील माणसांना साहित्य व संस्कृतीची भूक आहे. त्यांना काही बोलायचं आहे, त्यांना काही लिहायचं आहे; पण ते कुठं तरी कुंठत आहे. अशांना आधार देण्याचे काम, त्यांमध्ये आशावाद तेवत ठेवण्याचे काम आपल्याला करायचं आहे. सत्य हे अवध्य असतं, गांधीजींसारखं. उद्वेग आणि उन्माद समाजाला घातक असून साहित्यिकांनाही गांधीजींच्या भूमिकेकडे यावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

शब्द नसते तर जीवन अंधकारमय असते : विश्वनाथप्रसाद तिवारी

रामायण, महाभारताने पूर्ण देशाला एका सूत्रात बांधले. भाषा हा जीवनातील महत्त्वाचा आविष्कार आहे. मनुष्याला रूप परमेश्वराने दिले; पण नाव माणसाने दिले आहे. या माणसाला पशूपासून अलग करण्याचं काम भाषा करीत असते. या भाषेला शब्दांमुळे समृद्धता येते. जर शब्द नसते तर आपले जीवनच अंधकारमय झाले असते, असे मत हिंदी साहित्यिक विश्वनाथप्रसाद तिवारी यांनी व्यक्त केले.

...तर संमेलनाचे स्वरूप काही वेगळेच असते : प्रदीप दाते

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने वर्धानगरीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, ही विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांची इच्छा होती. त्यामुळेच आम्ही सर्व तयारीला लागलो. आज साहित्यनगरीत अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे; पण ते आपल्यात नाहीत, याचे दु:ख आहे. ते आज असते तर या संमेलनाचे स्वरूप काही वेगळेच असते, असे मत कार्यवाह प्रदीप दाते यांनी व्यक्त केले. साहित्य साहित्यिकांपर्यंतच मर्यादित न राहता सर्वांपर्यंत पोहोचावे, यासाठी संमेलनाचे हे आयोजन असून ते चिरस्मरणीय ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तीर्थस्थळी येऊन स्वागत करण्याचं भाग्य लाभलं : उषा तांबे

वर्धा हे स्वातंत्र्यसैनिकांचे तीर्थस्थळ असून या ठिकाणी आयोजित साहित्य संमेलनाच्या भूमीलाही ‘महात्मा गांधी साहित्यनगरी’ व ‘आचार्य विनोबा भावे सभा मंडप’ असे नामकरण करण्यात आले. या तीर्थस्थळावर येऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्याचा मान मिळाला, हे भाग्यच आहे, असे मत अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी व्यक्त केले. तसेच शासनाने या संमेलनाकरिता दोन कोटींचा प्रचंड निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी शासनाने आभारही मानले.

 

 

टॅग्स :literatureसाहित्य