शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

'साहित्य संमेलन भरविणे हे सरकारचे काम नाही';  अध्यक्षांनी पाठही थोपटली, दणकाही दिला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2023 18:47 IST

Wardha News साहित्य संमेलने आयोजित करणे ही सरकारची जबाबदारी नाही. स्वायत्त संस्थांच्या माध्यमातूनच संमेलनाचे आयोजन व्हावे, असे प्रतिपादन ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी करून सरकारची पाठही थोपटली अन् दणकाही दिला.

आनंद इंगोले

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्य नगरी (वर्धा) : बेळगावसारख्या सीमावर्ती भागामध्ये मायमराठीला समृद्ध करण्यासाठी शासनाने उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे; परंतु साहित्य संमेलने आयोजित करणे ही सरकारची जबाबदारी नाही. स्वायत्त संस्थांच्या माध्यमातूनच संमेलनाचे आयोजन व्हावे, असे प्रतिपादन ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी करून सरकारची पाठही थोपटली अन् दणकाही दिला.

 

९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तत्पूर्वी शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. संमेलनस्थळी ध्वजारोहण आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून थोडक्यात मनोगत व्यक्त करताना न्या. चपळगावकर बोलत होते. ‘साहित्य संमेलनाबाबत सरकारनेही पथ्ये पाळली पाहिजेत; तरच त्याची प्रतिष्ठा वाढेल, असे सांगताना या व्यासपीठावर हिंदी साहित्यिकांनाही निमंत्रित केल्याबद्दल संमेलनाध्यक्षांनी आयोजकांचे कौतुक केले. तसेच हिंदी-मराठी हे एकमेकांचे साहित्य वाचल्याशिवाय आपण खुजे राहू, असेही ते म्हणाले. संमेलनाध्यक्षांच्या भाषणापूर्वी मावळते अध्यक्ष भारत सासने यांनी गेल्या साहित्य संमेलनाच्या भाषणाचा आढावा घेत मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्रातील माणसांना साहित्य व संस्कृतीची भूक आहे. त्यांना काही बोलायचं आहे, त्यांना काही लिहायचं आहे; पण ते कुठं तरी कुंठत आहे. अशांना आधार देण्याचे काम, त्यांमध्ये आशावाद तेवत ठेवण्याचे काम आपल्याला करायचं आहे. सत्य हे अवध्य असतं, गांधीजींसारखं. उद्वेग आणि उन्माद समाजाला घातक असून साहित्यिकांनाही गांधीजींच्या भूमिकेकडे यावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

शब्द नसते तर जीवन अंधकारमय असते : विश्वनाथप्रसाद तिवारी

रामायण, महाभारताने पूर्ण देशाला एका सूत्रात बांधले. भाषा हा जीवनातील महत्त्वाचा आविष्कार आहे. मनुष्याला रूप परमेश्वराने दिले; पण नाव माणसाने दिले आहे. या माणसाला पशूपासून अलग करण्याचं काम भाषा करीत असते. या भाषेला शब्दांमुळे समृद्धता येते. जर शब्द नसते तर आपले जीवनच अंधकारमय झाले असते, असे मत हिंदी साहित्यिक विश्वनाथप्रसाद तिवारी यांनी व्यक्त केले.

...तर संमेलनाचे स्वरूप काही वेगळेच असते : प्रदीप दाते

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने वर्धानगरीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावे, ही विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांची इच्छा होती. त्यामुळेच आम्ही सर्व तयारीला लागलो. आज साहित्यनगरीत अखिल भारतीय साहित्य संमेलन होत आहे; पण ते आपल्यात नाहीत, याचे दु:ख आहे. ते आज असते तर या संमेलनाचे स्वरूप काही वेगळेच असते, असे मत कार्यवाह प्रदीप दाते यांनी व्यक्त केले. साहित्य साहित्यिकांपर्यंतच मर्यादित न राहता सर्वांपर्यंत पोहोचावे, यासाठी संमेलनाचे हे आयोजन असून ते चिरस्मरणीय ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तीर्थस्थळी येऊन स्वागत करण्याचं भाग्य लाभलं : उषा तांबे

वर्धा हे स्वातंत्र्यसैनिकांचे तीर्थस्थळ असून या ठिकाणी आयोजित साहित्य संमेलनाच्या भूमीलाही ‘महात्मा गांधी साहित्यनगरी’ व ‘आचार्य विनोबा भावे सभा मंडप’ असे नामकरण करण्यात आले. या तीर्थस्थळावर येऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्याचा मान मिळाला, हे भाग्यच आहे, असे मत अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांनी व्यक्त केले. तसेच शासनाने या संमेलनाकरिता दोन कोटींचा प्रचंड निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी शासनाने आभारही मानले.

 

 

टॅग्स :literatureसाहित्य