शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात नागरिकांना पायदळ चालणे मुश्किल, उघड्यावर कचरा टाकल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 18:01 IST

Wardha : शहरात अनेक समस्या, अधिकाऱ्यांचे सातत्याने दुर्लक्षच

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरातील नेहरू मार्केट, गोल बाजार, इंदिरा चौक, नेताजी मार्केट, आठवडी बाजारसह शहरातील अनेक भागात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहन तर सोडा पायदळ चालणे मुश्कील होत आहे. थोडा जरी धक्का लागला तरी वादविवाद होत आहेत.

अनेक भागात उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी या समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. तसेच नगरपालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर कोणाचेही अंकुश राहिले नाही. त्यामुळे अनेक विभागाचे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनमानी कामकाज सुरू ठेवले आहे. नगरपालिकेच्या विविध विषयांवरील प्रश्नांची उकलच होत नसल्याने नागरिकावर मुख्याधिकारी साहेब थोडा कार्यालय बाहेर येऊन बघा हो।, असे म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.

बगिचे पडले ओसशहरात प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचा वावर वाढला आहे. हे प्लास्टिक जनावरे त्या खात आहेत. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावरील विपरीत परिणाम होत आहे. शहरात अटलबिहारी उद्यान एकमेव बगिचा अनेक महिन्यांपासून बंद आहे. नगरपालिका क्षेत्रातील व बसस्थानकावरील बगिचासह इतर चार बगिचे ओस पडले आहेत. त्यात गाजर गवत आणि काटेरी झुडपे आहे.

शहरात कचऱ्याचे ढीग...शहरातील अनेक वार्डात कचरा पडलेला आहे. परंतु हा कचरा उचलण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देवून शहरातील साचलेले कचऱ्याचे ढीग उचलण्यात यावे व शहरातील जाम झालेल्या नाल्या मोकळ्या करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे

कचरा संकलन अद्यापही थंडबस्त्यातच !आर्वी शहरात मोकाट जनावराचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. पंधरा वर्षानंतर कोंढवाडा सुरू झाला होता. मात्र, मागील वर्षीपासून नगरपालिकेने तोही बंद केला. शहरात घंटागाडी कधी कधी शहरात फिरते. मात्र, कचरा संकलनाची प्रक्रिया २०१० पासून थंड बस्त्यातच आहे. याकडे मुख्याधिकारी यांची दुर्लक्ष असल्याची नागरिकांची ओरड आहे.

२३ वार्डशहरात २३ वार्ड आणि ११ प्रभाग आहेत. या सर्व प्रभागात मोठ्या प्रमाणात नाल्या तुंबल्या आहेत. या नाल्यातील गाळ काढल्या जात नाही तसेच थातूरमातूर काम करून पाण्याला वाट करून दिली जाते. शहरात साफसफाई केल्या जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे.

"आर्वी शहराला अनेक समस्येच्या विळखा आहे. स्वच्छता अभियाचा बोजवारा उडाला आहे. जागोजागी अनेक जागेवर अतिक्रमण आहे. मात्र, कर्मचारी अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. मुख्याधिकारी सर्व काही करू शकतात. मात्र, तेही गांधारीच्या भूमिकेत असल्याचे जाणवते."- रोहन हिवाळे, तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड

"शहरातील बगिचे ओस पडले आहेत. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे लक्ष नाही. नगरपालिका नेहमी नेमकी कोणती कामे करतात हेच कळत नाही. अनेक जण चहा टपरीवर पानठेल्यावर दिसतात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे."- पंकज गोडबोले, नागरिक, आर्वी

टॅग्स :wardha-acवर्धा