शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात नागरिकांना पायदळ चालणे मुश्किल, उघड्यावर कचरा टाकल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 18:01 IST

Wardha : शहरात अनेक समस्या, अधिकाऱ्यांचे सातत्याने दुर्लक्षच

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरातील नेहरू मार्केट, गोल बाजार, इंदिरा चौक, नेताजी मार्केट, आठवडी बाजारसह शहरातील अनेक भागात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहन तर सोडा पायदळ चालणे मुश्कील होत आहे. थोडा जरी धक्का लागला तरी वादविवाद होत आहेत.

अनेक भागात उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी या समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. तसेच नगरपालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर कोणाचेही अंकुश राहिले नाही. त्यामुळे अनेक विभागाचे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनमानी कामकाज सुरू ठेवले आहे. नगरपालिकेच्या विविध विषयांवरील प्रश्नांची उकलच होत नसल्याने नागरिकावर मुख्याधिकारी साहेब थोडा कार्यालय बाहेर येऊन बघा हो।, असे म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.

बगिचे पडले ओसशहरात प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचा वावर वाढला आहे. हे प्लास्टिक जनावरे त्या खात आहेत. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावरील विपरीत परिणाम होत आहे. शहरात अटलबिहारी उद्यान एकमेव बगिचा अनेक महिन्यांपासून बंद आहे. नगरपालिका क्षेत्रातील व बसस्थानकावरील बगिचासह इतर चार बगिचे ओस पडले आहेत. त्यात गाजर गवत आणि काटेरी झुडपे आहे.

शहरात कचऱ्याचे ढीग...शहरातील अनेक वार्डात कचरा पडलेला आहे. परंतु हा कचरा उचलण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देवून शहरातील साचलेले कचऱ्याचे ढीग उचलण्यात यावे व शहरातील जाम झालेल्या नाल्या मोकळ्या करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे

कचरा संकलन अद्यापही थंडबस्त्यातच !आर्वी शहरात मोकाट जनावराचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. पंधरा वर्षानंतर कोंढवाडा सुरू झाला होता. मात्र, मागील वर्षीपासून नगरपालिकेने तोही बंद केला. शहरात घंटागाडी कधी कधी शहरात फिरते. मात्र, कचरा संकलनाची प्रक्रिया २०१० पासून थंड बस्त्यातच आहे. याकडे मुख्याधिकारी यांची दुर्लक्ष असल्याची नागरिकांची ओरड आहे.

२३ वार्डशहरात २३ वार्ड आणि ११ प्रभाग आहेत. या सर्व प्रभागात मोठ्या प्रमाणात नाल्या तुंबल्या आहेत. या नाल्यातील गाळ काढल्या जात नाही तसेच थातूरमातूर काम करून पाण्याला वाट करून दिली जाते. शहरात साफसफाई केल्या जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे.

"आर्वी शहराला अनेक समस्येच्या विळखा आहे. स्वच्छता अभियाचा बोजवारा उडाला आहे. जागोजागी अनेक जागेवर अतिक्रमण आहे. मात्र, कर्मचारी अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. मुख्याधिकारी सर्व काही करू शकतात. मात्र, तेही गांधारीच्या भूमिकेत असल्याचे जाणवते."- रोहन हिवाळे, तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड

"शहरातील बगिचे ओस पडले आहेत. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे लक्ष नाही. नगरपालिका नेहमी नेमकी कोणती कामे करतात हेच कळत नाही. अनेक जण चहा टपरीवर पानठेल्यावर दिसतात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे."- पंकज गोडबोले, नागरिक, आर्वी

टॅग्स :wardha-acवर्धा