शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

वर्ध्यात नागरिकांना पायदळ चालणे मुश्किल, उघड्यावर कचरा टाकल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 18:01 IST

Wardha : शहरात अनेक समस्या, अधिकाऱ्यांचे सातत्याने दुर्लक्षच

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शहरातील नेहरू मार्केट, गोल बाजार, इंदिरा चौक, नेताजी मार्केट, आठवडी बाजारसह शहरातील अनेक भागात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहन तर सोडा पायदळ चालणे मुश्कील होत आहे. थोडा जरी धक्का लागला तरी वादविवाद होत आहेत.

अनेक भागात उघड्यावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी या समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. तसेच नगरपालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर कोणाचेही अंकुश राहिले नाही. त्यामुळे अनेक विभागाचे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनमानी कामकाज सुरू ठेवले आहे. नगरपालिकेच्या विविध विषयांवरील प्रश्नांची उकलच होत नसल्याने नागरिकावर मुख्याधिकारी साहेब थोडा कार्यालय बाहेर येऊन बघा हो।, असे म्हणण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे.

बगिचे पडले ओसशहरात प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचा वावर वाढला आहे. हे प्लास्टिक जनावरे त्या खात आहेत. त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावरील विपरीत परिणाम होत आहे. शहरात अटलबिहारी उद्यान एकमेव बगिचा अनेक महिन्यांपासून बंद आहे. नगरपालिका क्षेत्रातील व बसस्थानकावरील बगिचासह इतर चार बगिचे ओस पडले आहेत. त्यात गाजर गवत आणि काटेरी झुडपे आहे.

शहरात कचऱ्याचे ढीग...शहरातील अनेक वार्डात कचरा पडलेला आहे. परंतु हा कचरा उचलण्यास कोणी तयार नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देवून शहरातील साचलेले कचऱ्याचे ढीग उचलण्यात यावे व शहरातील जाम झालेल्या नाल्या मोकळ्या करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे

कचरा संकलन अद्यापही थंडबस्त्यातच !आर्वी शहरात मोकाट जनावराचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. पंधरा वर्षानंतर कोंढवाडा सुरू झाला होता. मात्र, मागील वर्षीपासून नगरपालिकेने तोही बंद केला. शहरात घंटागाडी कधी कधी शहरात फिरते. मात्र, कचरा संकलनाची प्रक्रिया २०१० पासून थंड बस्त्यातच आहे. याकडे मुख्याधिकारी यांची दुर्लक्ष असल्याची नागरिकांची ओरड आहे.

२३ वार्डशहरात २३ वार्ड आणि ११ प्रभाग आहेत. या सर्व प्रभागात मोठ्या प्रमाणात नाल्या तुंबल्या आहेत. या नाल्यातील गाळ काढल्या जात नाही तसेच थातूरमातूर काम करून पाण्याला वाट करून दिली जाते. शहरात साफसफाई केल्या जात नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आहे.

"आर्वी शहराला अनेक समस्येच्या विळखा आहे. स्वच्छता अभियाचा बोजवारा उडाला आहे. जागोजागी अनेक जागेवर अतिक्रमण आहे. मात्र, कर्मचारी अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. मुख्याधिकारी सर्व काही करू शकतात. मात्र, तेही गांधारीच्या भूमिकेत असल्याचे जाणवते."- रोहन हिवाळे, तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड

"शहरातील बगिचे ओस पडले आहेत. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांचे याकडे लक्ष नाही. नगरपालिका नेहमी नेमकी कोणती कामे करतात हेच कळत नाही. अनेक जण चहा टपरीवर पानठेल्यावर दिसतात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे."- पंकज गोडबोले, नागरिक, आर्वी

टॅग्स :wardha-acवर्धा