शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

कागदाला काळं करण्याइतकं सोपं असतं का मातीला हिरवं करणं

By admin | Updated: January 21, 2016 02:07 IST

‘कागदाला काळं करण्याइतकं सोप असतं का मातीला हिरवं करणं, इथे मढं झाकून जीवच वापश्यावर पेरावा लागतो.

सुरेश शिंदे : ‘एक रात्र कवितेची’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्धहिंगणघाट : ‘कागदाला काळं करण्याइतकं सोप असतं का मातीला हिरवं करणं, इथे मढं झाकून जीवच वापश्यावर पेरावा लागतो. बाबांनो तुमच्या आकड्यांना आणि अक्षरांना जर कणसं आली असती तर आमच्या डिग्य्रांना वाळकी लागली नसती.’ प्राचार्य सुरेश शिंदे यांनी आपल्या कवितेतून शेतकऱ्यांची मांडलेली भेदक व्यथा सर्वांनाच अंतर्मुख करून गेली. प्रसंग होता लोकसाहित्य परिषदेने आयोजित केलेल्या ‘एक रात्र कवितेची’ या कार्यक्रमाचा. हिंगणघाट येथे आयोजित काव्यमैफलीमध्ये अशोक नायगावकर, मुंबई, प्रा. सुरेश शिंदे, मंगळवेढा, शंकर बढे व जयंत चावरे, यवतमाळ यांनी आपल्या कविता व किस्स्यांनी श्रोत्यांना मनमुराद हसविले आणि रडविलेही.स्व. शरद जोशी परिसर व स्व. मंगेश पाडगावकर वैचारिकपीठावर आयोजित काव्यमैफलीचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे यांनी केले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्रा. उषा थुटे, नायब तहसीलदार अरविंद हिंगे, डॉ. राजेंद्र कडुकर, नितीन पखाले, प्रा. शेषकुमार येरलेकर, राजेंद्र डागा, यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक लोकसाहित्य परिषदेचे सचिव ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले. शंकर बढे यांनी मैफलीचे संचालन करीत वऱ्हाडी बोलीतून कविता सादर केल्या. कवी जयंत चावरे यांनी नव्या दमाच्या कविता सादर करीत मैफलीत रंग भरला.‘पिल्लू ठेऊन खोप्यात, चिऊ निघते चाऱ्याले, कोठ्यामंदी काळी गाय चाटे वासराले, हे पाहून वाटते माय असावी साऱ्याले’, तसेच ‘माय देवकीचा पान्हा माय यशोदेचा कान्हा, लेक असो किती मोठा मायेसाठी तो तान्हा’ ही आईवरची कविता जयंत चावरे यांनी सादर करून आई आणि लेकरांचे प्रेम व्यक्त केले. प्रा. सुरेश शिंदे यांनी ‘मताचे पीक भरघोस हवे असेल तर दुष्काळात कायम होरपळणारी जमीन निवडावी, कणसात दाणे भरू लागल्यात, शंभर शंभर शंभर किंवा पाचशे पाचशे पाचशे रासायनिक खतांची शेवटची मात्रा देऊन प्रवाही करावी म्हणजे मतांचे पीक भरघोस येते’ ही कविता सादर करून शेतकरी आत्महत्येचे वास्तव मांडले. कवी अशोक नायगावकर यांनी श्रोत्यांना मनमुराद हसविले. मुंबई पुण्याचे अनेक किस्से सांगताना त्यांच्या समस्याही मांडल्या. माझ्या कविता स्वप्न रंजन करणाऱ्या नाही तर वास्तविकता मांडणाऱ्या आहेत. दररोजच्या जगण्यातल्या असल्याचे अनेक कवितांमधून मांडले. संचालन लोकसाहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. अभिजित डाखोरे, तर आभार मनोहर ढगे यांनी मानले. यशस्वीतेसाठी राजेंद्र चाफले, राजेंद्र कोंडावार, गिरीधर काचोळे, नितीन सिंगरू, दुर्गा सहारे, आशिष भोयर, प्रा. महेंद्र घुले, चंद्रकांत उटाणे, संजय मानकर, विकास मानकर, विजया ढगे, सुमन शेंडे आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)