शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

कागदाला काळं करण्याइतकं सोपं असतं का मातीला हिरवं करणं

By admin | Updated: January 21, 2016 02:07 IST

‘कागदाला काळं करण्याइतकं सोप असतं का मातीला हिरवं करणं, इथे मढं झाकून जीवच वापश्यावर पेरावा लागतो.

सुरेश शिंदे : ‘एक रात्र कवितेची’ कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्धहिंगणघाट : ‘कागदाला काळं करण्याइतकं सोप असतं का मातीला हिरवं करणं, इथे मढं झाकून जीवच वापश्यावर पेरावा लागतो. बाबांनो तुमच्या आकड्यांना आणि अक्षरांना जर कणसं आली असती तर आमच्या डिग्य्रांना वाळकी लागली नसती.’ प्राचार्य सुरेश शिंदे यांनी आपल्या कवितेतून शेतकऱ्यांची मांडलेली भेदक व्यथा सर्वांनाच अंतर्मुख करून गेली. प्रसंग होता लोकसाहित्य परिषदेने आयोजित केलेल्या ‘एक रात्र कवितेची’ या कार्यक्रमाचा. हिंगणघाट येथे आयोजित काव्यमैफलीमध्ये अशोक नायगावकर, मुंबई, प्रा. सुरेश शिंदे, मंगळवेढा, शंकर बढे व जयंत चावरे, यवतमाळ यांनी आपल्या कविता व किस्स्यांनी श्रोत्यांना मनमुराद हसविले आणि रडविलेही.स्व. शरद जोशी परिसर व स्व. मंगेश पाडगावकर वैचारिकपीठावर आयोजित काव्यमैफलीचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे यांनी केले. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्रा. उषा थुटे, नायब तहसीलदार अरविंद हिंगे, डॉ. राजेंद्र कडुकर, नितीन पखाले, प्रा. शेषकुमार येरलेकर, राजेंद्र डागा, यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक लोकसाहित्य परिषदेचे सचिव ज्ञानेश्वर चौधरी यांनी केले. शंकर बढे यांनी मैफलीचे संचालन करीत वऱ्हाडी बोलीतून कविता सादर केल्या. कवी जयंत चावरे यांनी नव्या दमाच्या कविता सादर करीत मैफलीत रंग भरला.‘पिल्लू ठेऊन खोप्यात, चिऊ निघते चाऱ्याले, कोठ्यामंदी काळी गाय चाटे वासराले, हे पाहून वाटते माय असावी साऱ्याले’, तसेच ‘माय देवकीचा पान्हा माय यशोदेचा कान्हा, लेक असो किती मोठा मायेसाठी तो तान्हा’ ही आईवरची कविता जयंत चावरे यांनी सादर करून आई आणि लेकरांचे प्रेम व्यक्त केले. प्रा. सुरेश शिंदे यांनी ‘मताचे पीक भरघोस हवे असेल तर दुष्काळात कायम होरपळणारी जमीन निवडावी, कणसात दाणे भरू लागल्यात, शंभर शंभर शंभर किंवा पाचशे पाचशे पाचशे रासायनिक खतांची शेवटची मात्रा देऊन प्रवाही करावी म्हणजे मतांचे पीक भरघोस येते’ ही कविता सादर करून शेतकरी आत्महत्येचे वास्तव मांडले. कवी अशोक नायगावकर यांनी श्रोत्यांना मनमुराद हसविले. मुंबई पुण्याचे अनेक किस्से सांगताना त्यांच्या समस्याही मांडल्या. माझ्या कविता स्वप्न रंजन करणाऱ्या नाही तर वास्तविकता मांडणाऱ्या आहेत. दररोजच्या जगण्यातल्या असल्याचे अनेक कवितांमधून मांडले. संचालन लोकसाहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. अभिजित डाखोरे, तर आभार मनोहर ढगे यांनी मानले. यशस्वीतेसाठी राजेंद्र चाफले, राजेंद्र कोंडावार, गिरीधर काचोळे, नितीन सिंगरू, दुर्गा सहारे, आशिष भोयर, प्रा. महेंद्र घुले, चंद्रकांत उटाणे, संजय मानकर, विकास मानकर, विजया ढगे, सुमन शेंडे आदींनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)