शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
3
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
4
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
6
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
7
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
8
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
9
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
10
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
11
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
12
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
13
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
16
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
17
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
18
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
19
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
20
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   

सिंचन विहिरी चार वर्षांपासून रखडल्या

By admin | Updated: June 14, 2014 23:46 IST

धडक सिंचन योजनेंतर्गत आर्वी उपविभागातील मंजूर सिंचन विहिरीचे काम अनुदानाअभावी रखडले आहे. यात आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील लाभार्थी गत सहा वर्षापासून सिंचन विहिरीच्या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहे.

प्रतीक्षा कायम : आर्वी उपविभागात अनुदानच नाहीआर्वी : धडक सिंचन योजनेंतर्गत आर्वी उपविभागातील मंजूर सिंचन विहिरीचे काम अनुदानाअभावी रखडले आहे. यात आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील लाभार्थी गत सहा वर्षापासून सिंचन विहिरीच्या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहे. मात्र पावसाळ्यापूर्वी या सिंचन विहिरींचे काम पूर्ण करायचे असल्याने लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.पाटंबधारे विभागाच्या धडक सिंचन योजनेंतर्गत अनुसूचित जाती व जमाती यासह इतर लाभार्थ्यांना सिंचन विहिरीचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते. यात एक लाख रुपये दिले जाते. या योजनेअंतर्गत २००६-७, २००८-०९ या वर्षात मंजूर लाभार्थ्याना पाच वर्षापासून सिंचन विहिरीचे अनुदान मिळालेले नाही. या योजनेत आर्वी तालुक्यातील १०० विहिरींचा समावेश आहे. त्यापैकी ७० लाभार्थ्यांना विहिरींचे अनुदान मिळाले आहे. कारंजा तालुक्यात ५८ सिंचन विहिरी मंजूर आहे. त्यापैकी ३० विहिरीचे काम पूर्ण आहे. या सर्व विहिरी नरेगा अंतर्गत पूर्ण करण्याचे उदिष्ट असून ३० जून पर्यंत या विहिरी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शासनाकडून सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी विविध शासकीय योजना राबविल्या जाते. परंतु पाटबंधारे विभागाच्यावतीने धडक सिंचन विहिरी योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे अनुदान रखडले व सिंचन विहिरीचे बांधकाम रखडल्याने लाभार्थी अडचणीत आले आहे.पावसाळ्याच्या तोंडावर सिंचन विहिरीचे अनुदान व बांधकाम रखडले आहे. गेल्या पाच वर्षापासून हे अनुदान रखडल्याने लाभार्थी अडचणीत आले आहे. या सिंचन विहिरीचे नरेगा अंतर्गत बांधकाम करायचे आहे. परंतु कामाकरिता मजूर मिळत नसल्याने अनेक विहिरीचे काम रखडल्याची स्थिती आहे. विहिरीचे काम पूर्ण झाले लाभार्थ्यांना अनेक समस्या भेडसावत आहे. याबाबत शासनाने उपाययोजना करुन लाभार्थ्यांना विहिरीचे बांधकाम करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)