नव्या फिडरची मागणी : जुन्या फिडरमुळे शेतकऱ्यांना मनस्तापहिंगणघाट : शेकापूर गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाच्या मोटारी कमी वीजदाबामुळे व जुन्या ट्रान्सफार्मरमुळे सुरू होत नाही. त्यामुळे येथे नवीन फिडर व जनित्र बसविण्याची मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी महावितरणचे हिंगणघाट येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदनाद्वारे केली. निवेदनानुसार कमी वीजदाबामुळे शेतकऱ्यांच्या मोटारी वारंवार बंद पडतात. बंद पडल्यावर त्या लवकर सुरू होत नाही. कमी दाबामुळे आतापर्यंत परिसरातील २५ ते ३० मोटारी जळाल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत कापूस, तूर या पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. सोबतच गहू, चना, भुईमूग आदी रबी पिकांनाही पाण्याची गरज पडणार आहे. त्यामुळे शेतात लावलेले ट्रान्सफार्मर बदलवावे तसेच एका फिडरवर अतिरिक्त ताण येत असल्याने आणखी एक फिडर बसवावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी राजू शिवणकर, सुधाकर वैरागडे, महेंद्र खेकारे यासह परिसरातील इतरही शेतकरी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
कमी वीजदाबामुळे सिंचन प्रभावित
By admin | Updated: October 17, 2015 02:53 IST