शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पंचधारा नदीवरील बंधाऱ्याचे लोखंडी गेट बेवारस

By admin | Updated: June 26, 2014 23:27 IST

ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या बिकट आहे़ शिवाय सिंचनाचीही फारशी सोय नाही़ ही समस्या दूर करण्याकरिता पाणी अडवा पाणी जिरवा योजना राबविण्यात आली़ या अंतर्गत बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली;

झडशी : ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या बिकट आहे़ शिवाय सिंचनाचीही फारशी सोय नाही़ ही समस्या दूर करण्याकरिता पाणी अडवा पाणी जिरवा योजना राबविण्यात आली़ या अंतर्गत बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली; पण हे बंधारे सध्या निकामी झाले आहे़ बंधाऱ्याचे लोखंडी गेट, पाट्या चोरीला गेल्या असून अनेक ठिकाणी हे साहित्य बेवारस पडले आहे़ असा प्रकार पंचधारा नदीवरील बंधाऱ्याबाबत घडत असून तेथे पाणीच अडत नसल्याचे दिसते़लघु पांटबंधारे विभाग व पाटबंधारे विभाग यांच्यामार्फत ग्रामीण तसेच जंगल भागातील नदी नाल्यावर वनराई बंधारे व साठवण बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले़ शेत शिवारातील नदी नाल्यावरही बंधाऱ्यांची निर्मिती करून पाणी अडविण्यात आले़ यामुळे पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली़ गुरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्याही निकाली निघाली़ शिवाय शेतातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली़ यामुळे ओलिताची सोय झाली़ शेत शिवारातील नदीवर बंधारे बांधत असताना परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र करून समिती स्थापन करण्यात आली़ बंधारा देखभालीसह गेट उघडणे, बंद करणे, ही कामे या समितीकडे सोपविण्यात आली़काही वर्षांपूर्वी पंचधारा नदीवर हिवरा येथे मोठा साठवण बंधारा बांधण्यात आला़ यास लोखंडी गेट लावण्यात आले़ या गेटच्या देखभालीची जबाबदारी परिसरातील समितीवर सोपविण्यात आली; पण समिती व लघु पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे बंधाऱ्याचे काही लोखंडी गेट वाहून गेले तर काही वाहून जाण्याच्या मार्गावर आहे़ समिती व संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. हिवरा येथील बंधाऱ्यात पाणीच अडच नसल्याने तो निरूपयोगी ठरत आहे़ या बंधाऱ्याचे गेट बेवारस आहेत़ संबंधितांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़(वार्ताहर)