शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

साचलेल्या पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 05:00 IST

आलोडीतील सुखकर्तानगर येथील खुल्या जागेत मागील चार महिन्यांपासून पाणी साचले असून प्रचंड दुर्गंधी सुटलेली आहे. डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले. भ्रमणध्वनीवरून सूचित केले. दरम्यान, प्रशासक चौधरी आणि ग्रामसेवक चव्हाण यांनी पाहणी करीत ४ इंचाचे प्लास्टिक पाइप टाकून देतो, असे सांगितले.

ठळक मुद्देआलोडीतील चित्र : साटोडा ग्रा.पं. प्रशासनाची डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायतीअंतर्गत आलोडीतील वॉर्ड क्रमांक सुखकर्तानगर, बुरांडे ले-आउट येथे खुल्या जागेत साचलेल्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. याविषयी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही ग्रामसेवकाकडून समस्या सोडविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.आलोडीतील सुखकर्तानगर येथील खुल्या जागेत मागील चार महिन्यांपासून पाणी साचले असून प्रचंड दुर्गंधी सुटलेली आहे. डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले. भ्रमणध्वनीवरून सूचित केले. दरम्यान, प्रशासक चौधरी आणि ग्रामसेवक चव्हाण यांनी पाहणी करीत ४ इंचाचे प्लास्टिक पाइप टाकून देतो, असे सांगितले. २ एकराच्या खुल्या जागेतील पाणी प्लास्टिक पाइपमधून निघणार नसल्याचे नागरिकांनी प्रशासक आणि ग्रामसेवकाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर नागरिकांनी लोकवर्गणीतून १ फूट डायमीटरचे सिमेंट पाइप आणून दिले. मात्र, ग्रामसेवकाने आडमुठे धोरण अवलंबवित पाइप टाकण्यास टाळाटाळ केली. सिमेट पाइपमधून जात असलेले पाणी पुढे काढण्याकरिता शासकीय जागेतून नाली खोदकामाची मागणी केली. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाची अनास्था कायम आहे. यामुळे ४० ते ५० घरांच्या आरोग्याचा प्रश्न चव्हाटयावर आला आहे.सुखकर्तानगरात मूलभूत सुविधांचा प्रचंड दुष्काळ आहे. नाल्यांची नियमित स्वच्छता आणि खुल्या जागेतील पाण्याची विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी, नागरिकांच्या घरात पाणी शिरते. मात्र, ग्रामपंचायतीकडून कायम दुर्लक्ष केले जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे यापुढे गृह व इतर कर न भरण्याचा नागरिकांनी पवित्रा घेतला आहे.ग्रामसेवक, प्रशासकाच्या अनागोदी कारभाराची चौकशी करीत साचलेल्या पाण्याची तातडीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनावर सुधा सहारे, मनीषा डाखोरे, विनोद ठिकरे, राजेश गारोडे, गजानन कुंभारे, किशोर चरडे, प्रवीण गंगासागर, रवी कापरे यांच्यासह २६ नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.साटोडयाचे प्रशासक बेपत्तासाटोडा ग्रामपंचायतीची मुदत संपली असून ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.मात्र, प्रशासक चौधरी आठ ते दहा दिवसांपासून बेपत्ता असून भ्रमणध्वनीही बंद असल्याने कामाचा खोळंबा झालेला आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतRainपाऊस