शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर तांबेरा रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:53 IST

तालुक्यातील शेतकºयांचे सोयाबीन हे मुख्य पीक आहे. या पिकावर अचानक तांबेºया रोगाने आक्रमण केले आहे. शिवाय व्हायरसने अटॅक केल्याने सोयाबीन पिवळे पडले आहे.

ठळक मुद्देनुकसान भरपाई देण्याची मागणी : जि.प. सदस्याचे प्रशासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील शेतकºयांचे सोयाबीन हे मुख्य पीक आहे. या पिकावर अचानक तांबेºया रोगाने आक्रमण केले आहे. शिवाय व्हायरसने अटॅक केल्याने सोयाबीन पिवळे पडले आहे. दानेही भरले नाहीत. परिणामी, संपूर्ण पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.लहरी निसर्गामुळे शेतकºयांवर अस्मानी संकट आले आहे. यातच व्याजाने पैसे घेऊन शेतकºयांनी शेतीचा खर्च केला. यामुळे त्वरित उपाययोजना करीत शेतकºयांना मदत करावी, अशी माणगी जि.प. सदस्य सुचिता कदम यांनी केली आहे. याबाबत संबंधित अधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यात १३ हजार ३०५ हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड झाली आहे. यंदाचा पाऊस सोयाबीनकरिता योग्य वेळी आल्याने पिके समाधानकारक होती. सप्टेंबर महिन्यात सोयाबीनची झाडे पल्लवीत झाली होती; पण मागील चार-पाच दिवसांपासून शेतातील हिरवेगार असलेली सोयाबीनची झाडे शेंड्यावर पिवळी पडत असल्याचे दिसून येत आहे. रोगांचे आक्रमण तीव्र असल्याने अनेक शेतजमिनी रोगाच्या जाळ्यात ओढल्या जात आहेत. यामुळे काही दिवसांतच घरी येणारे सोयाबीनचे पीक जागेवरच उद्ध्वस्त होत असल्याचे दिसते. शिरखेड सर्कलमध्ये देऊरवाडा, नांदपूर, टाकरखेडा, पिपरी, लाडेपूर, खुबगाव, बोरगाव, जळगाव, वर्धमनेरी, बाजारवाडा, टोना, राजापूर, सर्कसपूर, हरिसवाडा या शिवारात पिकांवर अधिक रोग दिसतो. यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी मनीष उभाड यांनी तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाणे यांना निवेदनातून केली आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकºयांनी सहभाग घेतला आहे. शासनाने विमा कंपनी व कृषी विभागाला निर्देशित करीत रोगांची पाहणी करावी व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही जि.प सदस्य कदम, उभाड व शेतकºयांकडून करण्यात आली आहे.रोगट वातावरणामुळे पिकांवर येतेय मरगळमुसळधार पावसाची गरज असताना जिल्ह्यात अत्यल्प पावसाचे आगमण झाले. मागील १५ ते २० दिवसांपासून सातत्याने उन्ह तापत असून ढगाळ वातावरणाची केवळ निर्मिती होते. यामुळे रोगट वातावरणाची निर्मिती होत आहे. यामुळे पिकांवर विविध रोग तसेच अळ्यांचे आक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या सोयाबीनवर तांबेरा आणि व्हॉयरसने अटॅक केल्याने त्यावर उपाययोजना करताना शेतकरी त्रस्त आहे. शेतीचा खर्च वाढत असून उत्पादनाची अपेक्षा भंग होणार असल्याचेच चित्र आहे. सोयाबीनचे अद्याप दानेच भरले नसल्याने उत्पादन मिळणार की नाही, याबाबत साशंकताच आहे. शिवाय कपाशीवरही विविध रोगांनी आक्रमण केले आहेत. यामुळे पिकांवरच मरगळ आल्याचे दिसते. कृषी विभाग उपाययोजना सूचवित असले तरी यात खर्च मात्र वाढत आहे.तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन पिकावर मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे झाडे उपटून त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. अन्यथा संपूर्ण शेतातील पीक रोगाच्या सपाट्यात येऊ शकते. ट्रायकोडर्मासोबत शेणाचे मिश्रण करून त्याची फवारणी केल्यास या रोगावर नियंत्रण मिळविता येईल.- प्रशांत गुल्हाणे, तालुका कृषी अधिकारी, आर्वी.पाणीटंचाईमुळे पिके वाळण्याच्या मार्गावरपिपरी (पोहणा) - मागील एक महिन्यापासून परिसरात पावसाचा थेंबही नाही. याचा पिकांसह मनुष्यावरही विपरित परिणाम होत आहे. पाण्याअभावी सोयाबीन तथा कपाशी वाळत आहे. दमट वातावरणामुळे चिमुकल्यांना व्हायरल फीव्हरने ग्रासले आहे. विविध आजार डोके वर काढत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.वातावरणातील या विचित्र बदलामुळे पिकेत हातची जाणार की काय, अशी भीती शेतकºयांना त्रस्त करीत आहे. सध्या सप्टेंबर महिना सुरू असून सोमवारी जिल्ह्यात काही भागात पावसाचे आगमण झाले; पण पिकांना तथा आजार दूर करण्यासाठी मुसळधार पापसाची गरज आहे.