शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर तांबेरा रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 00:53 IST

तालुक्यातील शेतकºयांचे सोयाबीन हे मुख्य पीक आहे. या पिकावर अचानक तांबेºया रोगाने आक्रमण केले आहे. शिवाय व्हायरसने अटॅक केल्याने सोयाबीन पिवळे पडले आहे.

ठळक मुद्देनुकसान भरपाई देण्याची मागणी : जि.प. सदस्याचे प्रशासनाला साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील शेतकºयांचे सोयाबीन हे मुख्य पीक आहे. या पिकावर अचानक तांबेºया रोगाने आक्रमण केले आहे. शिवाय व्हायरसने अटॅक केल्याने सोयाबीन पिवळे पडले आहे. दानेही भरले नाहीत. परिणामी, संपूर्ण पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.लहरी निसर्गामुळे शेतकºयांवर अस्मानी संकट आले आहे. यातच व्याजाने पैसे घेऊन शेतकºयांनी शेतीचा खर्च केला. यामुळे त्वरित उपाययोजना करीत शेतकºयांना मदत करावी, अशी माणगी जि.प. सदस्य सुचिता कदम यांनी केली आहे. याबाबत संबंधित अधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यात १३ हजार ३०५ हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड झाली आहे. यंदाचा पाऊस सोयाबीनकरिता योग्य वेळी आल्याने पिके समाधानकारक होती. सप्टेंबर महिन्यात सोयाबीनची झाडे पल्लवीत झाली होती; पण मागील चार-पाच दिवसांपासून शेतातील हिरवेगार असलेली सोयाबीनची झाडे शेंड्यावर पिवळी पडत असल्याचे दिसून येत आहे. रोगांचे आक्रमण तीव्र असल्याने अनेक शेतजमिनी रोगाच्या जाळ्यात ओढल्या जात आहेत. यामुळे काही दिवसांतच घरी येणारे सोयाबीनचे पीक जागेवरच उद्ध्वस्त होत असल्याचे दिसते. शिरखेड सर्कलमध्ये देऊरवाडा, नांदपूर, टाकरखेडा, पिपरी, लाडेपूर, खुबगाव, बोरगाव, जळगाव, वर्धमनेरी, बाजारवाडा, टोना, राजापूर, सर्कसपूर, हरिसवाडा या शिवारात पिकांवर अधिक रोग दिसतो. यावर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी मनीष उभाड यांनी तालुका कृषी अधिकारी प्रशांत गुल्हाणे यांना निवेदनातून केली आहे.पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकºयांनी सहभाग घेतला आहे. शासनाने विमा कंपनी व कृषी विभागाला निर्देशित करीत रोगांची पाहणी करावी व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही जि.प सदस्य कदम, उभाड व शेतकºयांकडून करण्यात आली आहे.रोगट वातावरणामुळे पिकांवर येतेय मरगळमुसळधार पावसाची गरज असताना जिल्ह्यात अत्यल्प पावसाचे आगमण झाले. मागील १५ ते २० दिवसांपासून सातत्याने उन्ह तापत असून ढगाळ वातावरणाची केवळ निर्मिती होते. यामुळे रोगट वातावरणाची निर्मिती होत आहे. यामुळे पिकांवर विविध रोग तसेच अळ्यांचे आक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या सोयाबीनवर तांबेरा आणि व्हॉयरसने अटॅक केल्याने त्यावर उपाययोजना करताना शेतकरी त्रस्त आहे. शेतीचा खर्च वाढत असून उत्पादनाची अपेक्षा भंग होणार असल्याचेच चित्र आहे. सोयाबीनचे अद्याप दानेच भरले नसल्याने उत्पादन मिळणार की नाही, याबाबत साशंकताच आहे. शिवाय कपाशीवरही विविध रोगांनी आक्रमण केले आहेत. यामुळे पिकांवरच मरगळ आल्याचे दिसते. कृषी विभाग उपाययोजना सूचवित असले तरी यात खर्च मात्र वाढत आहे.तालुक्यातील अनेक भागात सोयाबीन पिकावर मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे झाडे उपटून त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. अन्यथा संपूर्ण शेतातील पीक रोगाच्या सपाट्यात येऊ शकते. ट्रायकोडर्मासोबत शेणाचे मिश्रण करून त्याची फवारणी केल्यास या रोगावर नियंत्रण मिळविता येईल.- प्रशांत गुल्हाणे, तालुका कृषी अधिकारी, आर्वी.पाणीटंचाईमुळे पिके वाळण्याच्या मार्गावरपिपरी (पोहणा) - मागील एक महिन्यापासून परिसरात पावसाचा थेंबही नाही. याचा पिकांसह मनुष्यावरही विपरित परिणाम होत आहे. पाण्याअभावी सोयाबीन तथा कपाशी वाळत आहे. दमट वातावरणामुळे चिमुकल्यांना व्हायरल फीव्हरने ग्रासले आहे. विविध आजार डोके वर काढत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.वातावरणातील या विचित्र बदलामुळे पिकेत हातची जाणार की काय, अशी भीती शेतकºयांना त्रस्त करीत आहे. सध्या सप्टेंबर महिना सुरू असून सोमवारी जिल्ह्यात काही भागात पावसाचे आगमण झाले; पण पिकांना तथा आजार दूर करण्यासाठी मुसळधार पापसाची गरज आहे.