शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

पूरपीडितांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचे निर्देश

By admin | Updated: January 24, 2015 01:43 IST

वणा नदीकाठावरील पूरग्रस्त नागरिकांचे शहराच्या विविध भागात पूनर्वसन झालेले आहे. मात्र या कारवाईला ३५ वर्षे लोटूनही अद्याप त्यांना या भूखंडांचा मालकी हक्क प्राप्त झालेला नव्हता.

हिंगणघाट : वणा नदीकाठावरील पूरग्रस्त नागरिकांचे शहराच्या विविध भागात पूनर्वसन झालेले आहे. मात्र या कारवाईला ३५ वर्षे लोटूनही अद्याप त्यांना या भूखंडांचा मालकी हक्क प्राप्त झालेला नव्हता. किसान अधिकार अभियानने प्रशासनाकडे हा प्रश्न रेटून धरला. त्याची फलश्रुती म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी एका आदेशान्वये नगर भूमापनाद्वारे आखीव पत्रिका तयार करून भूखंडधारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचे निर्देश येथील भूमी अभिलेख कार्यालयाला दिले आहेत.१९७९ मध्ये वणा नदीला आलेल्या महापुरानंतर शहरातील ब्लू झोन ब्लॉक क्रमांक १४ आणि १५ मधील पूरग्रस्तांचे मौजा नांदगाव आणि पिंपळगाव येथील पूरपीडित वसाहतीत पुनर्र्वसन करण्यात आले. येथील भूखंड पूरग्रस्त भागामधील संबंधीतांच्या मालमत्तेच्या मोबदल्यात मिळालेल्या आहे. पूरग्रस्त नागरिकांकडे सात-बारा, आखीव पत्रिका हे शासकीय दस्तावेज नसल्यामुळे या भूखंडांचे कोणत्याही प्रकारचे व्यवहार करणे त्यांना शक्य नव्हते. ३५ वर्षात प्रशासनाचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले. पुनर्वसन झालेल्या नागरिकांनी याकरिता शासनाकडे निवेदने दिली. मात्र त्याला आजवर केराचीच टोपली दाखविण्यात आली. याबाबत किसान अधिकार अभियानने ३ मे २०१४ ला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मालकी हक्क मिळकतीची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी उलट टपाली तीन जूनला उपविभागीय अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाबाबत विचारणा केली. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना वाटप केलेल्या भूखंडांचा सिटी सर्व्हे करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश तहसीलदार आणि भूमी अभिलेख कार्यालयाला दिले. या सर्व प्रक्रियेत विलंब होत असल्याचे लक्षात येताच उपासे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला. या प्रकरणात १३ जून २०१४ ला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन आणि आंदोलनाकर्त्यांची एकत्रित सभा झाली. सभेत तालुकाध्यक्ष प्रवीण उपासे, सचिन चरडे, प्रवीण कटारे, दीपक धोटे आणि दिलीप ठवरे यांनी भूखंडधारकांच्या व्यथा वारंवार मांडल्या. यावेळी तहसीलदार दीपक करंडे, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक झेंडे, एस. पी. राऊत यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.(तालुका प्रतिनिधी)