शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
3
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
4
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
5
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
6
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
7
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
8
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
9
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
10
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
11
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
12
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
13
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
14
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
16
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
17
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
18
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
19
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
20
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार

पूरपीडितांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचे निर्देश

By admin | Updated: January 24, 2015 01:43 IST

वणा नदीकाठावरील पूरग्रस्त नागरिकांचे शहराच्या विविध भागात पूनर्वसन झालेले आहे. मात्र या कारवाईला ३५ वर्षे लोटूनही अद्याप त्यांना या भूखंडांचा मालकी हक्क प्राप्त झालेला नव्हता.

हिंगणघाट : वणा नदीकाठावरील पूरग्रस्त नागरिकांचे शहराच्या विविध भागात पूनर्वसन झालेले आहे. मात्र या कारवाईला ३५ वर्षे लोटूनही अद्याप त्यांना या भूखंडांचा मालकी हक्क प्राप्त झालेला नव्हता. किसान अधिकार अभियानने प्रशासनाकडे हा प्रश्न रेटून धरला. त्याची फलश्रुती म्हणून अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी एका आदेशान्वये नगर भूमापनाद्वारे आखीव पत्रिका तयार करून भूखंडधारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचे निर्देश येथील भूमी अभिलेख कार्यालयाला दिले आहेत.१९७९ मध्ये वणा नदीला आलेल्या महापुरानंतर शहरातील ब्लू झोन ब्लॉक क्रमांक १४ आणि १५ मधील पूरग्रस्तांचे मौजा नांदगाव आणि पिंपळगाव येथील पूरपीडित वसाहतीत पुनर्र्वसन करण्यात आले. येथील भूखंड पूरग्रस्त भागामधील संबंधीतांच्या मालमत्तेच्या मोबदल्यात मिळालेल्या आहे. पूरग्रस्त नागरिकांकडे सात-बारा, आखीव पत्रिका हे शासकीय दस्तावेज नसल्यामुळे या भूखंडांचे कोणत्याही प्रकारचे व्यवहार करणे त्यांना शक्य नव्हते. ३५ वर्षात प्रशासनाचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले. पुनर्वसन झालेल्या नागरिकांनी याकरिता शासनाकडे निवेदने दिली. मात्र त्याला आजवर केराचीच टोपली दाखविण्यात आली. याबाबत किसान अधिकार अभियानने ३ मे २०१४ ला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मालकी हक्क मिळकतीची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी उलट टपाली तीन जूनला उपविभागीय अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाबाबत विचारणा केली. त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी पूरग्रस्तांना वाटप केलेल्या भूखंडांचा सिटी सर्व्हे करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश तहसीलदार आणि भूमी अभिलेख कार्यालयाला दिले. या सर्व प्रक्रियेत विलंब होत असल्याचे लक्षात येताच उपासे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला. या प्रकरणात १३ जून २०१४ ला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासन आणि आंदोलनाकर्त्यांची एकत्रित सभा झाली. सभेत तालुकाध्यक्ष प्रवीण उपासे, सचिन चरडे, प्रवीण कटारे, दीपक धोटे आणि दिलीप ठवरे यांनी भूखंडधारकांच्या व्यथा वारंवार मांडल्या. यावेळी तहसीलदार दीपक करंडे, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक झेंडे, एस. पी. राऊत यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे.(तालुका प्रतिनिधी)