शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

उभ्या पिकांवर किटकांसह किडींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 05:00 IST

यंदाच्या वर्षी वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला. त्यामुळे सध्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची बऱ्यापैकी वाढही झाली आहे. मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण असल्याने सध्या तापमानही कमी आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात २१,२,९९४.९ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून सध्या निंदन, खत देणे आदी कामे युद्धपातळीवर केली जात आहेत.

ठळक मुद्देढगाळी वातावरणाचा फटका : शेतकऱ्यांच्या अडचणीत भर, कृषी विभाग सुस्तच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम आहे. अशातच उभ्या पिकांवर सध्या किटकांसह किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून कृषी विभागानेही हवालदिल शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करण्याची गरज आहे.यंदाच्या वर्षी वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला. त्यामुळे सध्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची बऱ्यापैकी वाढही झाली आहे. मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण असल्याने सध्या तापमानही कमी आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात २१,२,९९४.९ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून सध्या निंदन, खत देणे आदी कामे युद्धपातळीवर केली जात आहेत. काही ठिकाणी कपाशी पात्या व फुल येण्याच्या अवस्थेत असली तरी आर्वी तालुक्यात काही ठिकाणी या पिकावर मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहेत. तर जिल्ह्यातील आठही तालुक्यात कमी अधिक प्रमाणात कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकाची वाढ बऱ्यापैकी झाल्यावर किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.अशा कराव्या उपाययोजनाज्या भागात कपाशी पिकांवर मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत त्या भागातील शेतकºयांनी अ‍ॅसीफेट ७५ एस.पी. किंवा क्लोरोपायरीफॉस २० ईसी २० मि.ली. प्रती १० लि. पाण्यात मिसळून पिकांवर फवारणी करावी. तसेच सायोबीन पिकांवर चक्रीभूंगा आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास ट्रायझोफॉस २० मि.ली. प्रती १० लि. पाण्यात मिसळून त्याची फवारणी शेतकऱ्यांनी फवारणी करावी, असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.५६,२२२.२ हेक्टरवर तुरीची लागवडजिल्ह्यात यंदा ५६,२२२.२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केली आहे. योग्य निगा राखल्या गेल्याने या पिकांची वाढ सध्या समाधानकारक झाली आहे. निंदन, खत देण्याचे काम सध्या शेतकऱ्यांकडून पूर्णत्त्वास नेले जात आहे.सोयाबीनवर चक्रीभंूगा, खोडमाशीचा प्रादुर्भाव१३,८,८८१.०५ हेक्टरवर यंदा सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. हे पीक वाढीच्या अवस्थेत असून पीक फुलोरा अवस्थेत येत आहे. असे असले तरी आर्वी तालुक्यातील काही भागासह जिल्ह्यातील इतर काही ठिकाणी सोयाबीन पिकांवर चक्रीभूंगा व खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

टॅग्स :agricultureशेती