शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

वर्ध्यातही सीसीआयच्या कापूस खरेदीची सहकार विभागाकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 19:58 IST

सहकार विभागाकडून सीसीआयकडे नाव नोंदविलेल्या प्रत्येक शेतकऱ्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ‘आपला कापूस विकला काय, नसेल तर किती कापूस शिल्लक आहे?’ अशी विचारणा सुरू केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा खणखणतोय भ्रमणध्वनीनोंदणी केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची विचारणा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पावसाळा सुरू झाला तरी सीसीआयकडे नाव नोंदविलेल्या शेतकऱ्यांची कापूस खरेदी संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. अपेक्षित कापसाची खरेदी पूर्ण झाली, तरीही आकडा मात्र फुगलेलाच दिसून येत असल्याने सहकार विभागाकडून आता चौकशीला प्रारंभ झाला आहे. सहकार विभागाकडून सीसीआयकडे नाव नोंदविलेल्या प्रत्येक शेतकऱ्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून ‘आपला कापूस विकला काय, नसेल तर किती कापूस शिल्लक आहे?’ अशी विचारणा सुरू केली आहे.जिल्ह्यामध्ये गतवर्षी २ लाख ३४ हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यामध्ये सरासरी २५ लाख ६७ हजार क्विंटल कापसाचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला होता. लॉकडाऊनपूर्वी सीसीआय, महाकॉट व खासगी व्यापाऱ्यांनी २३ लाख क्विंटल कापसाची खरेदी पूर्ण केली. लॉकडाऊनमुळे खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी करण्याकरिता नोंदणी करण्यात आले. आठही तालुक्यातील ५० हजार १३४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. दरम्यानच्या काळात ३३ खरेदी केंद्रांवरून कापूस खरेदी सुरू केली असून एकूण २९ लाख ५० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. तरीही २३ हजार २८२ शेतकऱ्यांकडे २ लाख ५० हजार क्विंटल कापूस शिल्लक असल्याचे सांगितले जात असल्याने या नोंदणीतील सत्यता पडताळून पाहण्याकरिता सहकार विभागाने चौकशी आरंभली आहे. या चौकशीच्या पहिल्याच टप्प्यात ८ हजार ७०५ शेतकऱ्यांची नोंदणी रद्द करण्यात आली. शेवटपर्यंत जवळपास २० हजार शेतकऱ्यांची नावे बाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. त्यामुळे आता या चौकशीअंती सीसीआय केंद्रही अडचणीत येण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील कापसाचे उत्पादन आणि विकलेला कापूस यात तफावत असल्याने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून विचारपूस सुरू आहे. पहिल्याच टप्प्यात ८ हजार ७०५ शेतकरी बाद झालेत. हा आकडा आणखी वाढणार आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी आणि सीसीआय व महाकॉटने खरेदी केलेल्या कापूस उत्पादकांची यादी तपासली जाणार आहे. यात नोंदणी नसलेल्या व्यक्तीचा कापूस खरेदी केल्याचे निदर्शनास आल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक, वर्धा.

टॅग्स :cottonकापूस