शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

गांधीजींच्या चष्मा चोरीतील आरोपीची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 18:06 IST

देशात खळबळ उडवून देणा-या महात्मा गांधी यांच्या चष्मा चोरी प्रकरणातील आरोपी कुणाल राजाभाऊ वैद्य याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

वर्धा : देशात खळबळ उडवून देणा-या महात्मा गांधी यांच्या चष्मा चोरी प्रकरणातील आरोपी कुणाल राजाभाऊ वैद्य याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. हा निर्वाळा मुख्य न्याय दंडाधिकारी ए. ए. अयाचित यांनी दिला. सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमातील बापू कुटीत त्यांच्या नित्य वापरातील वस्तू ठेवलेल्या आहेत. त्यापैकी त्यांचा चष्मा चोरी गेल्याने जिल्ह्यासह देशात खळबळ उडाली होती.या चष्माचोरीबद्दल आश्रम प्रतिष्ठानने सुरुवातीला कमालीची गुप्तता पाळली होती. परंतु वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आश्रम प्रतिष्ठानचे तत्कालीन अध्यक्ष मारुती म. गडकरी व प्रतिष्ठानच्या पदाधिका-यांनी बैठक घेऊन १३ जून २०११ ला सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर बराच काळ प्रकरणाचा उलगडा न झाल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला. सीआयडीने या प्रकरणी कुणाल राजाभाऊ वैद्य (रा. हिंदनगर) याला अटक केली होती.तेव्हा कुणाल हा तांत्रिक अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून कोर्स करीत होता. त्याला अटक झाल्यानंतर उच्च न्यायालयातून जामिनावर त्याची सुटका झाली होती. या प्रकरणाचे दोषारोपपत्र मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले. सरकारी वकिलांनी या प्रकरणात बरेच साक्षीदार तपासले. आरोपी कुणालच्या वतीने अ‍ॅड. रोशन राठी यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून मुख्य दंडाधिकारी ए. ए. अयाचित यांनी सबळ पुराव्यांअभावी कुणालची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी